महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही विवेकवादी चळवळ -प्रा.बालाजी कोंपलवार
——————————————
अकोला-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही विवेकवादी रचनात्मक राष्ट्र निर्मितीसाठी झटणारी चळवळ असल्याचे प्रतिपादन प्रा.बालाजी कोंपलवार यांनी केले.
संविधान बांधिलकी महोत्सवानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखा भेटप्रसंगी उद् बोधन करत होते.राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार,राज्य सरचिटणीस बबनराव कानकिरड,नाम फाऊंडेशनचे लक्ष्मीकांत मुळे अर्धापुर,ज्ञानेश्वर धायगुडे हिंगोली,वं.राष्ट्रसंत निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष डाॅ.गोवर्धनदादा खवले,समाजसेवक गजानन हरणे,रामदास बोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.संजय तिडके यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संविधान बांधिलकी महोत्सवानिमित्त जिल्ह्यात राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली.
जिल्हा शाखेचे पदाधिकारी किशोरजी मिश्रा,शहर शाखा प्रधानसचिव देवानंद शिरसाट,युवा कार्यवाह रोहन बुंदेले,विवेक वाहिनीचे वैभव चोपडे यांनी विविध कार्यक्रमाची माहिती दिली.राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार यांचे हस्ते सर्व अतिथींचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन आकाश इंगळे यांनी केले.हम होंगे कामयाब या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
0 टिप्पण्या