गोतस्करीचे गढ बनले अकोल्याचे तालुके!
मूर्तिजापुर, माना परिसर ‘गोतस्करांचा हायवे’ बनतोय, प्रशासन झोपेत?
मूर्तिजापुर/अकोला, दि. 4 मे:
गोवंश तस्करीचा थैमान थांबायचं नाव घेत नाही! 2 मे रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर तालुक्यात गोतस्करांकडून निर्दयतेने वाहतूक केली जात असलेली म्हैसवर्गीय जनावरे पकडण्यात आली होती. त्याच्या अवघ्या दोन दिवसांत, 4 मे रोजी पुन्हा एकदा माना पोलीस हद्दीत गोवंश तस्करी उघडकीस आली आहे. ही सलग कारवाई अकोला जिल्ह्यात ‘गोतस्करांचे मुक्त आवागमन’ असल्याची स्पष्ट साक्ष देते.
प्रश्न गभीर आहे:
मूर्तिजापुर, माना, अकोट व बाळापूर या तालुक्यांमधून गोवंशांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून, सत्ताधाऱ्यांची व स्थानिक प्रशासनाची संमिश्र भूमिका संशयास्पद ठरत आहे. कायदा आणि गोरक्षण यंत्रणा आहेत कुठे? की केवळ कारवाईच्या फाईल फडफडत राहणार?
2 मे रोजीची घटना:
मूर्तिजापुरात गोतस्करीसाठी वापरले जाणारे वाहन व म्हैसवर्गीय जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली. परंतु हे नेटवर्क केवळ वाहकांपुरते मर्यादित नाही, तर मागे कोणाचे संरक्षण आहे, हे अजूनही अस्पष्ट आहे.
4 मे रोजी पुन्हा मानात गोवंश वाहतूक पकडली:
शेलू फाटा येथे आज सकाळी 6 बैल निर्दयीपणे गाडीत बांधून नेत असलेल्या तिघांवर गुन्हा दाखल. वाहन, जनावरे जप्त. आरोपी मूर्तिजापुर व भातकुली तालुक्याचे. कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलीस सांगत असले तरी ही ‘कारवाई’ म्हणजे केवळ वरवरचा मलमपट्टी प्रयोग आहे, अशी नागरिकांची टीका.
गोवंश रक्षणासाठी गवगवा, पण जिल्ह्यात गोतस्करीचे वाहनं बेलगाम!
प्रशासन गप्प, राजकारण झोपेच्या आहारी… जनतेचा संताप उफाळला
गंभीर विचारणीय मुद्दे:
नेहमी वाहतूक होते त्याच रस्त्यांवरच पोलीस तपासणी का नसते? आरोपी दर वेळी छोटे-मोठे, पण सूत्रधार अजूनही अज्ञात कसे?मानावरील गोमांस विक्रीचे अड्डे आजही मुक्तपणे सुरू, त्यांना संरक्षण कोणाचे?आता जनता विचारते आहे:गोतस्करीचा आकडा वाढतोय, की प्रशासनाचा संयम?शेवटी कायदाच चालतो का, की कुणाच्यातरी ‘संकेतावर’ तो थांबतो?
0 टिप्पण्या