Ticker

6/recent/ticker-posts

दहशतवाद्यांचा समूळ नायनाट कराच! — मुर्तिजापूर व्यापारी महासंघाचा ज्वलंत आक्रोश

दहशतवाद्यांचा समूळ नायनाट कराच! — मुर्तिजापूर व्यापारी महासंघाचा ज्वलंत आक्रोश


मुर्तिजापूर (प्रतिनिधी): संतोष माने

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे भ्याड दहशतवाद्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्याने पुन्हा एकदा देश हादरला आहे. निर्दोष पर्यटकांच्या रक्ताने माखलेल्या त्या मातीत देशभक्तीची मशाल पेटली आहे. या संतप्त पार्श्वभूमीवर मुर्तिजापूरच्या व्यापारी महासंघाने ऐतिहासिक आक्रोश मोर्चा काढून संपूर्ण शहर दणाणून सोडले.


छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या या मोर्चात "भारत माता की जय" आणि "पाकिस्तान मुर्दाबाद" च्या गगनभेदी घोषणा आसमंतात घुमल्या. प्रत्येक घोषणेत एकच गर्जना — "देशद्रोहींना माफ करणार नाही!"


मोर्चात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अशोक भावनांनी, इब्राहीम घाणीवाले, ॲड. अविन अग्रवाल, पुरुषोत्तमभाऊ डागा, चंदन अग्रवाल, आनंद बांगर, संजय गुप्ता, भारत जेठवाणी, छबिले पाटील, कमलाकर गावंडे, बबलू भेलोंडे, शेख इमरान, शेख खलील, सतीश लालवानी, विनायक गुल्हाने, प्रशांत हजारी, विष्णू लोडम, दिनेश श्रीवास, भावेश झाला, अनुप अग्रवाल, रामा हजारे, रशीद चाऊस, मेजर घुगे, मोहम्मद तनवीर, आरिफ खटीक आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.


यावेळी मुस्लिम बांधवांचेही लक्षणीय आणि उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. शेख इमरान, शेख खलील, मोहम्मद तनवीर, आरिफ खटीक, रशीद चाऊस यांच्यासारख्या मुस्लिम बंधूंनी प्रखर निषेध व्यक्त केला. यामुळे 'दहशतवादाविरुद्ध लढ्यात हिंदू-मुस्लिम सर्व समाज एकत्र असून, देशाच्या अखंडतेसाठी सर्वजण एकच सैनिक आहेत' असा ठाम संदेश संपूर्ण परिसरात पोहोचला.


उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांना निवेदन सादर करताना एकच आवाज दुमदुमला — "दहशतवाद्यांच्या पाळेमुळे उखडून फेकली पाहिजेत, आता सहनशीलतेचा अंत झाला आहे!" यावेळी उपस्थित आमदार हरित पिंपळे यांनीही ठाम भूमिका घेत, म्हटले, "आता फक्त निवेदन नाही, तर निर्णायक कारवाईची आवश्यकता आहे." पोलीस अधिकारी अजीत जाधव व आशिष शिंदे यांच्यासमवेत विविध संघटनांचे पदाधिकारी या जागतिक दहशतवादाच्या विरोधात एकत्र उभे राहिले.


मोर्चाच्या दरम्यान, हल्ल्यात बळी पडलेल्या शूर देशबांधवांना डोळ्यात अश्रू दाटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या वेळी एकच भावना गगनात उसळली —
"हा देश आमच्या शूर मर्दानींनी रक्ताने घडवला आहे; कोणत्याही हरामखोर वृत्तीला त्याची राखरांगोळी करता येणार नाही!" देशभक्तांच्या मनातील धगधगता संताप, आक्रोशातुन प्रकट झाला —
"एकही निर्दोष नागरिक दहशतवादाचा बळी ठरू नये, यासाठी आता निर्णायक पाऊल उचलायलाच हवे!" "पाकिस्तानप्रेरित दहशतवादाचा कायमस्वरूपी बंदोबस्त न केल्यास, देशद्रोहींच्या मुळांसकट सफाया करण्याचा व्रत नागरिकांनी उचलले आहे!" संपूर्ण मुर्तिजापुरकरांनी आज एक सूर लावला — "शहिदांच्या रक्ताचा सूड घेईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही!"



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या