विश्वमांगल्य सभेद्वारा पहलगाम घटनेतील अमानवी कृत्याचा जाहिर निषेध
कारंजा (लाड) : अवघ्या काही दिवसांपूर्वी,काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील "हिंदु नरसंहार" या हृदयद्रावक घटनेचा संपूर्ण भारतभरात निषेध व्यक्त केला जात आहे.स्थानिक विश्वमांगल्य सभेद्वारा या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असल्याचे
समाजसेवक संजय कडोळे यांनी कळविले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,शहरातील श्री गुरु मंदिर संस्थान चौकामध्ये विश्वमांगल्य सभेने या घटनेचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाला एकत्रित येण्यासाठी आवाहन केले होते. त्याप्रमाणे गुरुवार दिनांक 24 एप्रिल रोजी संध्याकाळी सर्व हिंदू संघटनांचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले होते. त्यानंतर या घटनेत हत्या झालेल्या व्यक्तींसाठी दीप प्रज्वलित करून त्यांच्या आत्म्यास शांती प्राप्त व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली व त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच या घृणास्पद घटनेचा सर्वांनी घोषणा देऊन तीव्र निषेध व्यक्त केला.
या प्रसंगी विश्वमांगल्य सभेच्या सौ अंजली कोडापे यांनी सकल हिंदू समाजाला संघटित राहण्याचे आवाहन केले व या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. पंतप्रधान मोदीजी यांना विश्वमांगल्य सभेद्वारा शहरातीला तहसीलदार मार्फत पत्र देण्यात येणार आहे याची माहिती दिली. तसेच यापुढे अशा घटना घडू नये अशी प्रार्थना गुरुमहाराजांच्या चरणी करण्यात आली.
याप्रसंगी विश्वमांगल्य सभेची कारंजा शाखेची संपूर्ण कार्यकारणी, सर्व सदाचार सभेच्या समित्या, विश्व हिंदू परिषदेचे मंगेश भाऊ कडेल, रघुभाऊ वानखडे, नितीनभाऊ गढवाले, उमेश भाऊ माहितकर, भाजपचे जिग्नेश भाऊ लोढाया, भाजप शहर अध्यक्षा प्राजक्ता माहितकर, सविता काळे, राधा मुरकुटे, गुरु मंदिर संस्थानचे विश्वस्त प्रा.प्रकाशजी घुडे, मंदिर प्रशासक मोहनजी तांबोळकर, ए बी व्ही पी चे रुद्र लोटे, व इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या