Ticker

6/recent/ticker-posts

निष्काम पत्रकारीतेच्या क्षेत्रात होतोय असामाजिक तत्वाचा वावर : समाजासाठी मात्र घातक

निष्काम पत्रकारीतेच्या क्षेत्रात होतोय असामाजिक तत्वाचा वावर : समाजासाठी मात्र घातक


 वाशिम : लोकशाहीसत्ताक स्वतंत्र भारतात, "पत्रकारीतेला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ" म्हणून ओळखले जाते. पत्रकारीता स्वायत्त असून निष्काम कर्मयोग म्हणून पत्रकारीतेची खरी ओळख आहे. इंग्रजाच्या गुलामीपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पत्रकाराच्या लेखनीचा सिहांचा वाटा असून,स्वातंत्र्यानंतरही पत्रकाराची लेखनी ही शासन व मतदार नागरीक यांच्या मधील महत्वाचा दुवा असून लोकशाही समर्थपणे टिकवून ठेवण्याचे महत्कार्य करीत आहे. समाजातील दु:खितांचे अश्रू आपल्या डोळ्यांनी टिपून, आपल्या लेखनीद्वारे समाजातील लोकांच्या व्यथा शासन दरबारी मांडून त्यांना तातडीने त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याचे, सेवाव्रती कार्य पत्रकार निःस्वार्थीपणे करीत असतात. एक प्रकारे लोकशाही अबाधीत ठेवण्यासाठी पत्रकाराच्या लेखनिचा अंकुश अदृश्यपणे शासनावर असतो.असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. वास्तवत: पत्रकारीतेचे क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे.परंतु हल्ली आम्ही पाहतो की,आपल्या राजकिय क्षेत्राच्या यशस्वीतेकरीता स्वतःच्या प्रसिद्धीचा अट्टाहास पूर्ण व्हावा व राजकीय विजय प्राप्ती व्हावी, यासाठी अनेक राजकिय नेत्यांनी पत्रकारीतेची वाट धरली आहे. तर काही ठिकाणी दबावतंत्र टाकण्यासाठीह असामाजिक व्यक्तीही पत्रकारीता क्षेत्रात उतरली आहेत.त्यामुळे आज दिवसेंदिवस दगडाखाली पत्रकार अशी परिस्थिती निर्माण होत आहे.आज विज्ञानयुगाच्या काळात मुळ पत्रकारितेची व्याख्या बदलून,डिजीटल मिडीया इलेक्ट्रानिक्स मिडीया अशी निरनिराळी साधने निर्माण होऊन दूरदर्शन बातम्या,युट्यूब चॅनल्स असे प्रकार आले आहेत. शिवाय मोबाईलने पुढे जात प्रचंड प्रगती केल्याने फेसबुक, टेलिग्राम, व्हॉटस् एप,इन्स्टाग्राम, व्टिटर असली समाजमाध्यमे उदयास येवून,प्रिन्ट मिडीयावर बातमी प्रकाशीत होण्यापूर्वीच क्षणार्धात लोकांच्या मोबाईलवर उमटत आहे.व अशा हातघाईमध्ये असामाजिक तत्वांचा वाढता हस्तक्षेप असल्याने प्रिन्ट मिडीयाच्या हाडाच्या लढवय्या पत्रकारांची प्रतारणा होत आहे.आज जिल्ह्या जिल्ह्यात गावोगावी गाजरगवताप्रमाणे वाढत असलेल्या हौस्या गवस्या नवस्या पत्रकारांवर देखील अंकुश असायला हवा आहे.कारण अशा असामाजिक व्यक्तींकडून पत्रकारीतेच्या पवित्र सेवाव्रती कार्याला काळीमा लावण्याचेही षडयंत्र सुरु आहे.कुणीही एखादे पत्रकार असल्याचे ओळखपत्र घेऊन येतो. व एकीकडे तो पोलीस स्टेशन असो तहसिल किंवा न्यायालय येथे अक्षरशः दलाली करीत आहे.तर दुसरीकडे व्यावसायिक किंवा अवैध व्यावसायिक ; अधिकारी कर्मचारी यांचेवर दबावतंत्र आणून खंडणी उकडण्यावर भर देत आहे.त्यामुळे मायबाप शासनाने खऱ्या व खोट्या पत्रकारांची शोध मोहीम राबवून असामाजिक तत्वावर आपला अंकुश ठेवून हाडाच्या पत्रकारांना न्याय मिळवून देणे.अत्यावश्यक झाले आहे. तसेच समाजातील व्यक्तींनी सुद्धा खऱ्या व खोट्या पत्रकारांची पारख करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.असे परखड मनोगत ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी व्यक्त करीत वास्तव मांडले आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या