Ticker

6/recent/ticker-posts

सायकल रॅलीद्वारे शहीद वीरांना अभिवादन

सायकल रॅलीद्वारे शहीद वीरांना अभिवादन


प्रतिनिधी- नागोराव तायडे  
मुर्तिजापूर: भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या थोर शहीद वीरांचा शहीद दिनानिमित्त अभिवादन सोहळा मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आला. मुर्तिजापूर स्वच्छता अभियान आणि सिटी तायक्वांडो क्लबच्या वतीने जुन्या शहरातील शहीद भगतसिंग चौकात असलेल्या शहीद भगतसिंग यांच्या पुतळा परिसरात स्वच्छता करून वीरांना आदरांजली वाहण्यात आली.
सकाळी स्वच्छता अभियानांतर्गत शहीद भगतसिंग चौकाची स्वच्छता करण्यात आली. स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन परिसर स्वच्छ केला. यावेळी उपस्थितांनी स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा आढावा घेत, शहीद वीरांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सायंकाळी जे. बी. हिंदी हायस्कूलपासून शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यापर्यंत तायक्वांडो क्लबच्या खेळाडूंनी सायकल रॅली काढली. हातात तिरंगा ध्वज घेऊन आणि राष्ट्रगीताचे घोषवाक्य देत खेळाडूंनी सायकल रॅलीद्वारे शहीद वीरांना कृतज्ञतापूर्वक नमन केले. रॅलीत मोठ्या संख्येने युवक आणि नागरिक सहभागी झाले होते.


या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुर्तिजापूर स्वच्छता अभियानाचे प्राचार्य सत्यनारायण तिवारी, विनायकभाऊ गुल्हाने, अक्षय प्रमुख शिवसेना, पत्रकार विलास नसले, दिनेश श्रीवास, ज्ञानेश टाले, रवी सर, वरघट सर, सर्पमित्र मुन्ना श्रीवास, विलास वानखडे, इम्रानभाई, सुनील भोजगडिया, पत्रकार रोहित सोळंके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तायक्वांडो क्लबच्या खेळाडूंनी या कार्यक्रमात विशेष सहभाग घेतला. त्यांनी शहीद भगतसिंग यांच्या योगदानावर भाष्य करताना देशभक्तीची भावना प्रकट केली. पालक आणि नागरिकांनी या उपक्रमाला पाठिंबा दर्शवत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वीरांच्या बलिदानाचा गौरव केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांचा त्याग सदैव स्मरणात राहावा, असे आवाहन केले.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या