Ticker

6/recent/ticker-posts

स्नेह मिलन कार्यक्रम, सुखदुःखात सहभागी होणे ही महायुतीची परंपरा - खा. अनुप धोत्रे

स्नेह मिलन कार्यक्रम, सुखदुःखात सहभागी होणे ही महायुतीची परंपरा - खा. अनुप धोत्रे



अकोला: प्रभू रामचंद्राच्या लंका विजयानंतर अयोध्या आगमन प्रसंगी दीपोत्सव परंपरा सनातन धर्मापासून सुरू असून पाच दिवसीय उत्सवाला वैज्ञानिक आणि अध्यात्म परंपरा संस्कृतीचं महत्त्व असून परिवारामध्ये प्रेम निर्माण करणारे असल्याचा हा उत्सव स्नेहमिलनाच्या माध्यमातून आपण साजरा करत आहोत. ही प्रेरणादायी बाब असल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले आमदार रणधीर सावरकर विजय अग्रवाल अश्विन नवले श्रीरंग दादा पिंजरकर विलास शेळके जयंत मसने योगेश अग्रवाल कृष्णा शर्मा प्रतुल हातवळणे, शशिकांत चोपडे उषाताई विरक गण बहादूर, आदींच्या उपस्थितीमध्ये स्नेह मिलन कार्यक्रमात ते बोलत होते.


 सामाजिक तसेच सांस्कृतिक संवर्धनासाठी एकमेकांचे विचार आधानप्रधान करणे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे ही परंपरा महायुतीची असून या परंपरेला वृद्धिगत करण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील नागरिक यांची उपस्थिती ही प्रेरणादायी असल्याचीही खासदार अनुप धोत्रे यांनी सांगून दीपोत्सवाचे महत्व विशद केले यावेळी महायुतीच्या उमेदवारांना समाजातील सर्व स्तरातील नागरिक आशीर्वाद देऊन विजयी करणार असा विश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला तर संवाद आणि विकास च्या माध्यमातून भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुती विजय होईल अशा आशावाद श्रीरंग दादा पिंजरकर यांनी व्यक्त केला तर यावेळी अश्विन नवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात सरकारने केलेल्या कामाची माहिती दिली यावेळी योगेश अग्रवाल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर संचालन एडवोकेट देवाशिष काकड तर आभार प्रदर्शन उषा विरक यांनी केले


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या