पंचायत विभागाच्या आदेशाला केराची टोपली, २० दिवसापासून अपहाराची चौकशी रखडली
प्रतिनिधी नासीर शेख
पातूर : पातुर पंचायत समिती अंतर्गत वहाळा बु. येथे ग्राम पंचायत अंतर्गत केलेले विकास कामे व त्यावर काढलेले देयक याबाबत जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाने पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश ७ ऑक्टोबर रोजी दिले होते. परंतु २० दिवसांची कालावधी उलटूनही चौकशी करण्यात आली नसल्याने चौकशीकडे ग्रामस्थांचे डोळे लागले आहे.वहाळा बु. ग्राम पंचायत अंतर्गत कामाची चौकशी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, पातूरचे गटविकास अधिकारी, यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्यावरही चौकशी होत नसल्याने पाच ग्राम पंचायत सदस्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे सीएमओ, अमरावतीचे विभागीय आयुक्त यांच्याकडे धाव घेऊन तक्रार केली होती, सदर तक्रारीची दखल घेत चौकशी करून अहवाल मागविण्यासाठी आयुक्तांनी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठविले आहे.त्या पत्रावरून पंचायत विभागाने पातूरचे गटविकास अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. परंतु तीन आठवडे उलटूनही चौकशी करण्यात आली नसून,चौकशी रखडली आहे. चौकशीकडे वहाळा बु. वासीयांचे लक्ष लागले आहे.
आदेश असतानाही चौकशी करण्यास दिरंगाई का ?
ग्राम पंचायत अंतर्गत विकास कामे व त्यावर काढलेले देयक या प्रकारची चौकशीसाठी ग्राम पंचायत सदस्यांनी तीन महिन्यापासून वारंवार तक्रारी केल्या , आयुक्तांनी सीईओना पत्र पाठविले, पंचायत विभागाने सुद्धा पातूरचे गट विकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले, मात्र आदेशानंतरही २० दिवस उलटले तरीही चौकशी करण्यास दिरंगाई का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
0 टिप्पण्या