Ticker

6/recent/ticker-posts

ठाणे व अकोला जिल्ह्यातील घटना वेदनादायी- आ. रणधीर सावरकर

ठाणे व अकोला जिल्ह्यातील घटना वेदनादायी- आ. रणधीर सावरकर


अकोला  
मातृशक्तीचा सन्मान व त्यांचा सुरक्षेचा प्रश्न व त्यांच्यासोबत अभद्र व्यवहार करणाऱ्यांना महायुती सरकार सोडणार नाही ठाणे जिल्ह्यातील अकोला जिल्ह्यातील घटना वेदनादायी व समाजाला खाली मान टाकणारी असून महायुती सरकार अशा आरोपींना सोडणार नाही यासाठी फास्ट न्यायालय च्या माध्यमातून त्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी कटिबद्ध असून समाजातील मातृ शक्तीला सन्मान देण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे परंतु आज बांगलादेशमध्ये व पश्चिम बंगालमध्ये रोज मातृ शक्तीवर अत्याचार होत आहे. यासंदर्भात महाविकास आघाडी यूपीए इंडिया आघाडी एकही शब्द बोलत नाही, त्याबद्दल एकही आवाज उचलत नाही, हे दुर्दैवी व समाजाला चेतना जागृती करण्याची वेळ असल्याची प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले. अकोला मेडिकल कॉलेज मधील विद्यार्थ्यांची भेट घेऊन पश्चिम बंगालच्या घटना व अकोल्याचे घटना संदर्भात त्यांच्याशी चर्चा विनिमय करून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस प्रशासन योग्य ती दाखल घेणार आहे व पश्चिम बंगाल येथील आरोपींना न्यायालय व सीबीआय सोडणार नाही असा विश्वास आंदोलन कार्य शी चर्चा करताना भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांनी सांगितले. 


वेगवेगळ्या घटना देशांमध्ये होत असून या तीन-चार महिन्यांमध्ये या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अस्थिर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय षडयंत्र सुरू असून अमेरिका आणि चीन यांची हस्तक या देशांमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून जाती धर्मामध्ये भांडण लावून काही तत्व कार्याला लागले आहे यापासून सावध राहण्याची गरज असल्याची आमदार सावरकर यांनी सांगितले. 
बाळापुर तालुक्यातील घटना अकोल्याला काळीमा फासणारी असून आरोपींना कठोर कारवाई करण्यासंदर्भात पोलीस प्रशासन कार्यरत असल्याची त्यांनी सांगितले त्यांच्यासोबत विवेक भरणे डॉक्टर शंकरराव वाकोडे, माधव मानकर अंबादास उमाळे पंकज वाडीवाले डॉक्टर अभय जैन , डॉक्टर किशोर मालोकार डॉक्टर राजेश देशपांडे डॉक्टर राजेश अग्रवाल, डॉक्टर प्रशांत अग्रवाल डॉक्टर पाटील आधी त्यांच्यासमवेत होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या