Ticker

6/recent/ticker-posts

कोळी समाजाला दुय्यम समजणाऱ्या भाजपचा समाज मतदान देतांना विचार करेल

कोळी समाजाला दुय्यम समजणाऱ्या भाजपचा समाज मतदान देतांना विचार करेल 


आजपासून कोळी समाजाचे आमरण उपोषण प्रारंभ 


अकोला. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी कोळी समाजाच्या विविध जाती ह्या आदिवासी बहुल आहेत त्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समावेश असलेल्या जातींचे प्रमाणपत्र व जात पडताळणी द्यावी यासाठी गेल्या अनेक वर्षेपासून समाज लढा देत आहे. मात्र विद्य. भाजपा आमदार ह्यांनी ह्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूक मध्ये कोळी समाजाने त्यांना मतदान करायचे की नाही याचा विचार करावा लागेल असा इशाराच आज कोळी समाजाच्या विविध मागण्यासाठी घुसरवाडी येथे आमरण उपोषण करणार असल्याची माहितीसाठी बोलविलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.


तत्कालीन मुख्यमंत्री ना. देवेद्र फडणवीस यांनी आणि इतर आमदारांनी राज्यातील ५० टक्के कोळी समाज बोगस असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले आणि जात पडताळणी दाखले दिले जात नाहीत. मात्र राज्यात १ कोटी ५ लाख कोळी समाजाचे मतदान असताना यांना या बोगस कोळी समाजाचे मतदान चालते आणि कोळी समाजाचे हक्काचे आरक्षण मात्र नाकारले जात आहे. मात्र याच मागणीसाठी घुसर वाडी येथे आज १४ ऑगस्ट पासून देवगाई च्या मंदिरात आमरण उपोषण प्रारंभ करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी उपोषण कर्ता विजय कुमार घावट, रामचंद्र घावट, कोळी समाज प्रदेश अध्यक्ष शिवा महाराज भांडे,युवा अध्यक्ष तुषार सिरसाट, तिरंदास धनी, शेषराव घावटआदींची उपस्थिती होती.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या