Ticker

6/recent/ticker-posts

सोयाबीन आणि कापूस खरेदी साठी शासनाने खरेदी केंद्र आताच जाहीर करावे- आ. सावरकर

सोयाबीन आणि कापूस खरेदी साठी शासनाने खरेदी केंद्र आताच जाहीर करावे- आ. सावरकर


अकोला
शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकांचे वन्य प्राण्या मुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचविण्यासाठी ५०% कुंपणासाठी मदत द्यावी व सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर खरेदीसाठी भावांतर हमी योजना सुरु करून १५ सप्टे २०२४ व १ ऑक्टोबर पासून सोयाबीन आणि कापूस खरेदी शासनाने खरेदी व खरेदी केंद्र आताच जाहीर करावे. विदर्भातील शेतकऱ्यांना वीज पुरवठ्यासाठी सौर उर्जा प्रकल्पाची सक्ती करून नये व विदर्भ मराठवाडा भागातील खारपाण पट्ट्यातील भागातील शेतकऱ्याच्या विकासासाठी उणीवा दूर करून कृषी विभागामार्फत राबविण्यात याव्या. महाबीजला कायमस्वरूपी आय.अ.एस अधिकारी नियुक्त करण्यात यावा, पिक विमा योजनेतील उणीवा दूर करण्यात याव्यात, राष्ट्रीय कृत बंकापासून होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी उपाय योजनासह राज्यातील महायुतीचे सरकार शेतकरी व सर्व सामान्य जनतेचे कल्याण, नारी व युवा शक्तीला प्राधान्य देणारा असल्याचे विधिमंडळात राज्य शासनाचे वतीने २९३ वर चर्चेचि सुरवात करतांना सरकारच्या चांगल्या कामांचे कौतुक व उणीवा संदर्भात शेतकऱ्यांच्या व्यथा व भावना प्रभावीपणे शेतकरी चळवळीतील आमदार रणधीर सावरकर यांनी पश्चिम विदर्भ व विदर्भातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून शासनाचे लक्ष वेधले.


  विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थ संकल्पा विषयी आमदार रणधीर सावरकर यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करून स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना व आधुनिक संत्र प्रक्रिया केंद्र, सौर उर्जा पंप तसेच लादली बहिण योजना, तीर्थयात्रा योजना या संदर्भात शासनाचे कौतुक करून व शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याच्या निर्णयाचे अभिनंदन आ. रणधीर सावरकर यांनी केले. एक डिग्री तापमान वाढल्यास २३% पाउस जास्त होतो व पावसाचे दिवस कमी होतात. २२ तासात अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अकोला शहर व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले व सर्व सामान्य नागरिक व शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी करून ग्राम मंडळाचा प्रश्न उपस्थित केला. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत अनेक शेतकऱ्यांनी भाग घेतला. त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांची शेती संबंधी अनेक अडचणी येत असल्याचे सांगून तेथील निवडणूक हात वर करून होत असल्याने सदर पद्धत बदलून गुप्त मतदान पद्धत अवलंबिण्यात यावी, अधिनियमात बदल करावा. अकोला जिल्ह्यातील केलीवेळी ताराळा गावांचा उल्लेख केला . सौर उर्जा प्रकल्प हा विदर्भ साठी यशस्वी नसून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मध्ये शेतकरी शेतात राहतो तर विदर्भ , मराठवाडील शेतकरी गावात व शहरात राहतो त्यामुळे सौर उर्जा संयंत्राची चोरी होते व pannel ची तोडफोड होते. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होऊन त्याचा वीज पुरवठा खंडित होते. त्यामुळे त विदर्भातील २००० शेतकऱ्यांना त्वरित वीज पंप जोडणी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.


महाबीज ला कायमचा सनदी अधिकारी नेमावा-
 शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळावर आय.ए.एस अधिकारी याची नेमणूक करण्यात यावी. एकीकडे महामंडळे तोट्यात असतांना महाबीज ४० कोटी रुपये नफ्यात आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार व स्वस्त व भावात बियाणे उपलब्ध करून देणारे महामंडळ १०० कोटी रु नफ्यामध्ये जात असतांना बदली मागणी नसतांना सचिन कळंत्रे या सनदी अधिकार्याची बदली करण्याचा मंत्रालयातील अधिकार्यांचा उद्देश का असा सवाल आमदार रणधीर सावरकर यांनी चर्चेत भाग घेतांना आपल्या प्रभावी भाषणात केला. 
एक रुपया पिक विमा योजनेमधील अडचणी तसेच राष्ट्रीयकृत बंका पिक विमा भरून घेत नाहीत या संदर्भात शेतकऱ्यांना होणारा त्रास या बद्दल आमदार सावरकर यांनी शासनाचे लक्ष वेधले. व दुध उत्पादक शेतकरी यांच्या समस्यांसह पिक विमा योजनेचा लाभ पूर्वी ७ लाख शेतकरी घेत होते आता ६९ लाख शेतकरी शेत आहेत. अशा अनेक विषयांवर शासनाचे अभिनंदन करून सरकारच्या योजनांमधील दुरुस्ती बाबत प्रस्ताव प्रभावीपणे मांडून शासनाचे लक्ष वेधले. शेतकरी आत्महत्या करण्यामध्ये वन्य प्राण्यांमुळे होणारे शेतकऱ्याचे नुकसान हे प्रमुख कारण असून हरीण, रानडुक्कर, कालवीट यांची नसबंदी करण्यात यावी व जंगली प्रनांमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान होते त्यासाठी वनमंत्री यांनी ७०० एकर मनीवर कुंपण घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्याची व्याप्ती वाढवून ना. एकनाथ शिंदे, ना देवेंद्र फडणवीस व ना. अजित दादा पवार यांनी पुढाकार घेऊन राज्यातील ३९ हजार हेक्टर शेतकऱ्यांच्या शेतावर कुंपण लावण्यासाठी ५० टक्के मदत द्यावी व शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. विरोधकांनी नकारात्मक बाबींपेक्षा शासनाच्या चांगल्या योजनांचा प्रचार प्रसार करावा असे ही आमदार सावरकर यांनी आपल्या विधिमंडळात प्रस्ताव मांडतांना विरोधकांना टोला लावला. आमदार रणधीर सावरकर यांच्या शेतकरी विषयी अभ्यासपूर्ण विशेषतः विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा व्यथा व समस्यांचा व सरकारच्या चांगल्या गोष्टींचे अभिनंदन केले.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या