जिगाव प्रकल्पातून पाणी आरक्षण उपलब्ध करून देऊन अमृत योजना अशा दोन मंजुरीच्या कामाला गती
अकोला जिल्ह्याचे पालकत्व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे महाआरोग शिबिराच्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले होते वारंवार अकोल्याच्या विकासासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देऊन अकोलेकरांच्या समस्या निराकरणासाठी सदैव तत्पर राहतात यावरून त्यांनी पालक व राज्य प्रतिनिधी म्हणून आपल्या कर्तव्याचा पालन करून अकोलेकरांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. जिगाव प्रकल्पातून पाणी आरक्षण उपलब्ध करून देऊन अमृत योजना अशा दोन मंजुरीच्या कामाला गती दिली आहे त्यामुळे हद्द वाढ क्षेत्रातील भागातील नागरिकांना शुद्ध आणि भरपूर पाणी मिळण्याच्या दृष्टीने तसेच नवीन टाक्या निर्माण करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे या कामासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे.
आपले सहकारी आमदार वसंत खंडेलवाल माजी खासदार संजय भाऊ धोत्रे खासदार अनुप धोत्रे तसेच माजी महापौर विजय अग्रवाल माजी महापौर अर्चना जयंत मसने, तत्कालीन आयुक्त कविता द्रिवेदी तसेच सध्याचे आयुक्त सुधीर लहाने यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांचे अभिनंदन व आभार समस्त अकोलेकर यांच्या वतीने भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले आहे शहराच्या व जिल्ह्याच्या विकासात सर्व लोकप्रतिनिधी सहकार्याने जनतेला दिलेल्या अभिवचनाची पूर्तता करण्यासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी प्रतिबंध असल्याचीही लोकप्रतिनिधी कटीबद्ध असल्याची ही आमदार सावरकर यांनी सांगितले.
0 टिप्पण्या