Ticker

6/recent/ticker-posts

मराठा आरक्षणावरील आंदोलनांचा भाजपला फटका- भागवत कराड

नवीन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महायुतीचा झेंडा फडकावण्याचे दृष्टीने कामाला लागावे- डॉ. भागवत कराड 


अकोला : आगामी विधानसभा, महानगर पालिका, नगर पालिका निवडणुकीमध्ये मतदारांशी संपर्क साधून नुने, जाणते, नवीन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महायुतीचा झेंडा फडकावण्याचे दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री व खासदार डॉ. भागवत कराड यांनी केले.


स्थानिक सेन्ट्रल प्लाझा येथे भजपा निवडणूक संचालन समिती व तालुका जिल्हा संचालन समिती, लोकप्रतिनिधी, मंडळ व आघाडी प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी किशोर पाटील होते तर मंचावर प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, महानगर अध्यक्ष जयंत मसने, वाशीम जिल्हाध्यक्ष श्याम बढे, तेजराव थोरात, अकोला लोकसभा निवडणूक संयोजक विजय अग्रवाल, कृष्णा शर्मा, देवाशिष काकड, माधव मानकर, अर्चना मसने, संजय गोट्‌फोडे, राधिका तिवारी, चंदा शर्मा, संतोष शिवरकर, मनिराम ताले, उमेश पवार, वैशाली निकम वसंत बाछुका आदी विराजमान होते.


      काय म्हाणालेत 👆 कराड....?

मराठा आरक्षणावरील आंदोलनांचा भाजपला फटका- भागवत कराड

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणावरील आंदोलनांचा फटका मराठवाड्यात काही प्रमाणात निश्चित बसला. आगामी काळात या मुद्याच्या अनुषंगाने सरकार योग्य तो निर्णय घेईल, असे सूचक विधान माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी अकोला येथे केले. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी डॉ. भागवत कराड गुरुवारी अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांची बैठक घेत आढावा घेतला. 

राज्यात लोकसभा निवडणुकीत आलेल्या यशापयशाचे चिंतन करण्यासाठी भाजपकडून प्रत्येक मतदार संघांचा आढावा घेतला जात आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करून  याबाबतचा अहवाल सादर करू. तसेच काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या काळात नकारात्मक प्रचार करीत मते मिळवण्याचा प्रयत्न केला. भाजपा सत्तेत आली तर संविधान बदलेल, असा खोटा प्रचार करण्यात आला. महिलांना वर्षाला लाख रुपये देण्याचे खोटे आश्वासन दिले. याचा थोडाफार फटका भाजपला बसला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षात अमुलाग्र बदल करण्याचे काम झाले असुन, देशाची अर्थव्यवस्था 14 व्या स्थानावर आली. आता जागतिक अर्थव्यवस्था बनवण्याचे प्रयत्न पंतप्रधान करीत आहेत, असे सुचक विधानही त्यांनी यावेळी केले .
यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, किशोर मांगटे पाटील, विजय अग्रवाल, जयंत मसने, गिरीश जोशी आदी उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या