अकोला पोलीस भरती एकाच दिवशी आलेली तारीख बदलून द्यावी
एकाच दिवशी आलेली तारीख बदलून देणे बाबत राज्य शासनाने दखल घेऊन पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांना न्याय द्यावा व विद्यार्थ्यांना वेळेवर होणारा त्रास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्रास होता कामा नये या दृष्टीने पोलीस आयुक्तांनी लक्ष केंद्रित करावे असे निर्णय भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांनी दिले.
पोलीस भरती करणारे विद्यार्थी यांना दिनांक 14 जून 2024 रोजी महाराष्ट्र पोलीस भरती सन 2022 - 23 चे मैदानी चाचणी प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहे. परंतु यावेळेस जिल्हा पोलीस, चालक पोलीस, राज्य राखीव पोलीस बल ( SRPF) बॅट्समन पोलीस व कारागृह पोलीस या सर्व घटकांची मैदानी चाचणी एकाच वेळेस सुरु होत आहे यामुळे महाराष्ट्रातील हजारो पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांचे एकाच दिवशी दोन ग्राउंड, किंवा आज जिल्हा पोलीस, उद्या SRPF, आणि परवा चालक पोलीस चे ग्राउंड असे लगातार आले आहेत यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे तसेच इथे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला पूर्ण एक दिवसाचा कालावधी हा प्रवासात जाणारच यासाठी आपण सखोल विचार करावा... अशी मागणी केली त्या संदर्भात अमरावती पोलीस आयुक्त तसेच पोलीस महासंचालक तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क साधून व्यथा व समस्या आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांनी मांडल्या व त्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन न्याय द्यावा अशी मागणी केली ताबडतोब विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन पोलीस मुख्यालय येथे जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणारे खासदार अनुप धोत्रे यांच्या कृतीचा अनेक विद्यार्थ्यांनी स्वागत केले.
सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे..
सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पाऊस पडत आहे व अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण आहे ज्या दिवशी मैदानी चाचणी असते तिथे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी हे एक दिवस अगोदरच येऊन थांबतात अशा वेळेस त्यांना पावसामुळे धावपळ होईल खूप त्रास होईल तसेच पावसात मैदानी चाचणी पार पाडणे देखील अवघड जाणार आहे. वरील या दोन्ही गोष्टींचा विचार करून महाराष्ट्रातील लाखो पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करावा हीच नम्र विनंती...
महाराष्ट्र पोलीस भरती विद्यार्थी केली असून या संदर्भात शासन निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देईल असा विश्वास आमदार सावरकर यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी दोन ठिकाणी फॉर्म भरल्यामुळे एका दिवशी परीक्षा होत असल्यामुळे या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा करून मंगळवारी यासंदर्भात परीक्षा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी घेण्याचे निर्देश देण्यात येईल असे अभिवचन दिले व विद्यार्थ्यांना दोन्ही ठिकाणी परीक्षा देत आहेत येईल अशी व्यवस्था करण्यात येईल असे अभिवचन दिले त्यामुळे महाराष्ट्रातून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी खासदार अनुप जत्रे व आमदार सावरकर व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.
0 टिप्पण्या