Ticker

6/recent/ticker-posts

संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीत, माजी जि.प.अध्यक्षा ज्योतिताई गणेशपूरे यांनी धरला ठेका

संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीत, माजी जि.प.अध्यक्षा ज्योतिताई गणेशपूरे यांनी धरला ठेका

प्रतीनीधी- संजय कडोळे
 कारंजा : धार्मिक कार्यात नेहमी सहभागी असणारे राजकिय कार्यकर्ते आपण नेहमीच बघतो परंतु ज्योतीताई गणेशपुरे ह्या इतर लोकांना अपवाद असून त्यांची सातत्याने सामाजिक, आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात धडपड सुरु असते. आणि कोणत्याही सेवाकार्यात त्या हिरीरीने आणि तन मन धनाने सहभागी होत असतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा काजळेश्वर येथील संत सेवालाल महाराज जयंती समारोहात बघायला मिळाला आहे.जगद्गुरु संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्ताने निघालेल्या मिवरणूकी मध्ये सहभागी होऊन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ ज्योतिताई गणेशपुरे यांनी बंजारा समाजाचे आराध्य दैवत जगदगुरु संत सेवालाल महाराजांची पूजा आरती केली.यावेळी काजळेश्वर येथील तमाम बंजारा समाज बंधु भगीनी ह्या उपस्थित होत्या.


 भिमा नायक आणि धरमणी या गोर दांपत्याच्या घरी क्रांतीकारी सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपुर जिल्ह्यात तसेच गुत्ती तालुक्यातील गोलालडोडी या ठिकाणी झाला . ते लहानपणापासूनच आपला परिवार आणि तांड्याप्रती प्रामाणिक, चाणाक्ष, बुद्धिमान आणि शुरविर होते. त्यांनी जीवनभर ब्रम्हचर्य व्रत धारण केले होते. निसर्ग आणि प्राणीमात्रांवर त्यांचे अतोनात प्रेम होते. " सेन सायी वेस, कीडी मुंगीनं सायी वेस" ही विश्व व्यापी कल्याणकारी प्रार्थना केली. त्यांच्याकडे लहान-थोर, उच्च-निच, गरीब-श्रीमंत हा भेदभाव नव्हता. लहानपणापासूनच गुरे राखण्याचे काम करुन वडीलांच्या प्रतिष्ठेला कुठल्याही प्रकारचा धक्का पोहोचणार नाही, याची काळजी घ्यायचे. त्यांनी मुर्ती पुजेऐवजी निसर्ग पुजेला महत्त्व दिले. त्यांच्याकडे एक गोपालक आणि तांड्याचे नायक म्हणून फार मोठी दुरदृष्टी होती. समाजाचे हित शिक्षणात आहे, हे हेरूनच तांड्यातील प्रत्येक मुला मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे. व्यसनांपासून लोक परावृत्त झाले पाहिजे याकरिता त्यांनी गित, लडी आणि भजनाच्या माध्यमातून आयुष्यभर प्रबोधन केले. 


    जेव्हा क्रांतीकारी सेवालाल महाराज जन्माला आले तेव्हा वैदिक परंपरेचा काळ होता. या काळात भांडवलशाही, सरंजामशाही आणि निजामशाहीने जणू कहरच केला होता. अंधश्रध्दा आणि वैदिक कर्मकांडात सर्वसामान्य माणूस होरपळून निघत होता. पुढे देखील हिच परिस्थिती राहिली तर देव, देऊळ आणि धर्माच्या नावाखाली वैदिक परंपरावादी आयतखाऊ लोकांकडून समाज लुटला जाईल. म्हणून समाजाला यातून बाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी समाजावरील भविष्यातील संकट ओळखून क्रांतीकारी सेवालाल महाराजांनी वैदिक परंपरेविरोधात दंड थोपटले. " केनी भजो मत केनी पूजो मत" असे सांगून "करणी करेर सीको" "तमार जीवणेमं तमज वजाळो कर सको छो", हा आर्थिक विकासाचा मुलमंत्र दिला. शिवाय माझ्या समाजाकडे उदरनिर्वाह चालविण्यासाठी शेतीवाडी नसल्यामुळे पुढे चालून त्याची आर्थिक परिस्थिती खालावण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सेवालाल महाराजांनी रपीयार तेरं चणा वकजाये, मलकेर वात पलकेम कळजाये, रपीया कटोरो पाणी वकजाये, वानावानार दक आये, लंडीरो राज आये .अशी अनेक भाकीते वर्तवली. ती आज प्रत्यक्षात खरी ठरली जात आहेत. महाराजांनी केलेल्या भाकीतांचे लोकांनी तंतोतंत पालन केले असते तर गोर बंजारा समाजाचे चित्र आज काही औरच दिसले असते. पण तसे झाले नाही हे समाजाचे फार मोठे दुर्दैवच म्हणावे लागेल.
         याशिवाय व्यसनमुक्त समाजाची निर्मिती व्हावी म्हणून सेवालाल महाराजांनी समाजाला " पाच पारा" नावाचे तत्वज्ञान सांगितले . त्याचे पालन केल्यास मानवी जीवन सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही, हे ठणकावून सांगितले. परंतु अंधश्रध्दा आणि वैदिक कर्मकांडात आकंठ बुडालेल्या भारतीय समाजाने सेवालाल महाराजांनी सांगितलेल्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. इतकेच नाही तर त्यांनी विज्ञानवादी विचारांचा प्रचार प्रसार केला. निसर्गाच्या सान्निध्यात राहून नैसर्गिक जीवन जगा, कोणत्याही विषयात भेदभाव करू नका, सगळ्यांशी प्रामाणिक राहून सन्मानाने जगा, स्त्री ही मातेसमान असून तिच्यावर सन्मानाने जगा, चोरी करु नका, व्यसनमुक्त जीवन जगा, भुकेलेल्यांना अन्न द्या आणि गरजूंना मदत करा, वडिलधारी लोकांचा आदर करा आणि सगळ्या प्राणीमात्रांना प्रेम द्या, आधुनिक जीवनशैली आणि सांत्वन देऊन आमिषाला बळी घेऊ नका, माणसाला हानी पोहोचेल असे कोणतेही सण उत्सव साजरे करु नका, आई वडिलांची सेवा करा, बोलीभाषा आणि संस्कृती यांचे जतन आणि संवर्धन करा, दिसण्यावर जाऊ नका तर दिसते त्याच्यामागे काय दडले आहे त्याचा शोध घ्या असा साधा आणि सोप्या भाषेत उपदेश दिला. इतकेच नव्हे तर मुघलांच्या अघोरी राजवटीत अनेक लढाया जिंकून त्यांचे साम्राज्य मुळासकट उखडून टाकले. म्हणून त्यांच्याकडे महान तत्वज्ञानी, भविष्यवेत्ता, थोर समाजसुधारक, क्रांतीकारी योध्दा आणि विज्ञान प्रामाण्यवादी म्हणून पाहिले जाते.अशा या थोर क्रांतीकारी सेवालाल महाराजांनी ४ डिसेंबर १८०६ ला जीवंत समाधी घेतली. क्रांतीकारी सेवालाल महाराज यांच्या मृत्यु बाबतची अधिकृत तारीख नाही.संशोधक व अभ्यासक मृत्युच्या तारखेचा अभ्यास करीत आहे . वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे त्यांची समाधी आहे, जी देश विदेशातील गोर बंजारा समाजाची काशी म्हणून नावारूपास आलेली आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक सेवालाल महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी करतात.अशा जगदगुरु संत सेवालाल महाराज यांची जयंती काजळेश्वर येथे समाजबांधवाकडून मोठ्या आनंदोत्साहात साजरी करण्यात आल्याचे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांना मिळाले असून या धार्मिक उत्सवात माजी अध्यक्षा सौ ज्योतिताई गणेशपुरे यांनी सहभाग घेऊन धार्मिक लोकगीते आणि पारंपारिक नृत्यावर ठेका धरल्याचे वृत्त मिळाले आहे .


नागपूर येथे आयोजित मॉडल मेकिंग कॉम्पिटिशन साठी यावर्डीच्या प्रोजेक्टची निवड
कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ नागपूर द्वारा नागपूर येथील अंजुमन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या कॉम्पिटिशन साठी श्री बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथील वर्ग नववीचा अभिषेक कैलास कापसे व वर्ग दहावीच्या विश्वास सिद्धार्थ इंगोले यांनी तयार केलेल्या "स्टेअर लिफ्ट चेअर" या विज्ञान प्रोजेक्ट निवड करण्यात आली आहे. विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ द्वारा मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन 2024 च्या आयोजन दिनांक 17 ते 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत नागपूर येथे करण्यात आले आहे. सदर कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होण्यासाठी बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी येथील मुख्याध्यापक तथा विज्ञान शिक्षक विजय देविदास भड यांच्या मार्गदर्शनात अभिषेक व विश्वास इंगोले तयार केलेल्या स्टेअर लिफ्ट चेअर या वैज्ञानिक प्रोजेक्टची ऑनलाईन नोंदणी केली होती. विज्ञान भारती विदर्भ प्रदेश नागपूर तर्फे यावर्डीच्या विज्ञान प्रोजेक्टची निवड करण्यात आली, असा मेल प्राप्त झाला. त्यामुळे मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होण्यासाठी बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी विज्ञान शिक्षक तथा मुख्याध्यापक विजय भड व दोन विद्यार्थी अभिषेक कापसे आणि विश्वास इंगोले आपल्या प्रोजेक्टसह उपस्थित राहणार आहेत.
स्टेअर लिफ्ट चेअर हा प्रोजेक्ट लहान मुलापासून तर वृद्धापर्यंत तसेच दिव्यांगासाठी अतिशय उपयुक्त आहे. ज्यांना घरातील पायऱ्या चढणे कठीण आहे अशा व्यक्तीसाठी हा प्रोजेक्ट वरदान ठरणार आहे. या प्रोजेक्ट मुळे घरातील गृहिणींना पण फायदा होणार आहे, सिलेंडर सारख्या जड वस्तू स्टेअर लिफ्ट चेअरच्या सहाय्याने सहज दुसऱ्या मजल्यावर नेता येतील.
 बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीच्या विज्ञान प्रोजेक्टची निवड मॉडल मेकिंग कॉम्पिटिशन साठी झाल्याबद्दल विजय भड, अभिषेक कापसे व विश्वास इंगोले यांचे संस्थेचे अध्यक्ष योगेश खोपे व संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे शिक्षक राजेश शेंडेकर, गोपाल काकड, अनिल हजारे व शिक्षकेतर कर्मचारी देविदास काळबांडे, भालचंद्र कवाने, राजू लबडे, राजेश लिंगाटे, राजेंद्र उमाळे आदिनी अभिनंदन केले आहे. यावर्डीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर अंकुश लावण्याची मागणी!



कारंजा : (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)
   कारंजा शहरासह तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी . या हेतूने स्व. आ प्रकाशदादा डहाके यांच्या अथक प्रयत्नातून कारंजा येथे उपजिल्हा रुग्णालयाची भली मोठी इमारत बांधण्यात आली.परंतु काही सुविधा मात्र या रुग्णालयात अपुऱ्याच राहल्या परिणामी
रुग्णांना उपचारासाठी बाहेरगावी जावे लागते.शिवाय रुग्णालयातील कारभार दिवसेंदिवस ढिसाळ होत गेला. सदर रुग्णालय नेहमीच या ना त्या कारणाने नेहमीच चर्चित राहत आहे. कधी तेथील डॉक्टर नशेत कार्य करतांना आढळतात.तर कधी तेथील आरोग्य कर्मचारी कामचुकार पद्धतीने वागून एकमेकांविरुद्ध उभे राहताना दिसतात.तर कधी रुग्णालयात औषधोपचाराकरिता भरती केलेला रुग्ण रुग्णालया बाहेर जाऊन नशा करून आत मध्ये येण्याचा प्रयत्नात रुग्णाचा कधी मृत्यू होतो.हे सुद्धा येथील कर्मचाऱ्यांना माहित राहत नसण्याचा प्रकार घडला आहे. रुग्णालयातील अस्वच्छता सुद्धा प्रचलित आहे . त्यामुळे महत्त्वाचे विषय आज रोजी चर्चेत आहे. रुग्णालयामध्ये असलेल्या वॉशरूम मध्ये पाण्याच्या कमतरते मुळे तेथील रुग्णांचे हाल होत असल्याचे प्रकार नुकताच चर्चित राहला आहे.


   ज्या डॉक्टर ने कोरोणा काळात संपूर्ण हॉस्पिटल सांभाळले त्या डॉक्टरवर आज असंवैधानिक कारणाने आरोप होत असल्याचे दिसत आहे. म्हणजेच हॉस्पिटलमध्ये होत असलेला गैरप्रकार व भ्रष्टाचार रोखण्याला विरोध करणाऱ्या एका डॉक्टरला विरोध होत असल्याचे दिसत आहे.या सर्वा मागे जिल्हा रुग्णालय प्रशासन मात्र बघ्याची भूमिका निभावतांना दिसत आहे. 
   कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील कारभार चांगल्या डॉक्टरकडे यावा . त्याकरिता रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला भावनिक साद घालत उपजिल्हा रुग्णालय कारंजा मधील प्रशासनिक कार्यभार व रुग्नेसेसंदर्भात निवेदन दिले आहे. रमेश देशमुख यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,
"कारंजा उपजिल्हा रुग्णालयामध्ये येणाऱ्या पेशंटला योग्य सेवा देता यावी
याकरिता काही बाबींमध्ये महत्वपूर्ण बदल करणे अत्यावश्यक असल्याने सदर बाबी खालीलप्रमाणे नमुद करण्याचा प्रयत्न करित आहे.
१) शासकीय सेवेत असलेले सर्व डॉक्टर्स व अधिपारिचारिका यांच्या आपल्या स्तरावरुन
करण्यात आलेल्या प्रतिनियुक्त्या व आदेशाप्रमाणे कार्यप्रणाली तयार होईपर्यंत रुग्णसेवा देणे
कर्मचाऱ्यांना कठीण झाले असल्याने रुग्णांचे विनाकारण हाल होत असल्याने तात्काळ
प्रतिनियुक्त्या रद्द करुन उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे सदर कर्मचाऱ्यांच्या सेवा निरंतर
सुरु करण्याचे आदेश आपल्या स्तरावरुन देण्यात यावे.
२) कामरगांव येथे वैद्यकीय अधिक्षकाचे पद रिक्त असल्यामुळे सदर पद भरती करतांना
सेवाज्येष्ठता यादीनुसार सेवा ज्येष्ठ डॉ. जाधव येत असल्यामुळे त्यांची नियुक्ती कारमरगांव येथे वैद्यकीय अधिक्षक या पदावर करण्याची कृपा करावी.
३) सर्व डॉक्टर्स व अधिपारिचारिकांना अॅप्रन व नेमप्लेट लावून सेवा देण्याचा नियम असतांना सुद्धा तसे होतांना दिसत नाही त्यामुळे रुग्णांची तारांबळ उडते व डॉक्टर आणि पेशंट यामधले अंतर समजत नाही व ग्रामिण भागातील लोकांना याचा फार त्रास सहन करावा लागतो. करिता सर्व डॉक्टर्स व अधिपारिचारिकांना अॅप्रन व नेमप्लेट लावून सेवा
देण्याचे आपले स्तरावरुन आदेशित करावे 

४) ओ.पि.डी.चा वेळ ही नियमानुसार सकाळी ८ ते दु.१.०० व सायंकाळी ४ ते ६
वाजेपर्यंत सुरळीत करण्याकरिता आपल्या स्तरावरुन आदेशित करावे.
...२...
५) सद्य:स्थितीत असलेल्या २४ तास डॉक्टरांची सेवा ही नियमानुकुल नसल्यामुळे
सदर सेवास्वरूप खंडित करुन प्रत्येक डॉक्टरांना शासकीय नियमानुसार ८-८ तासानुसार सेवा देणेकरिता आपल्या स्तरावरुन आदेशित करण्यात यावे. विशेषतः रुग्णांकडे दुर्लक्ष करु नये असा सल्ला जाणीवपूर्वक वैद्यकीय अधिकाऱ्यांना देणे आवश्यक असल्याने आपल्या
स्तरावरुन सदर आदेश देण्यात यावे.
६) कारंजा ग्रामिण रुग्णालयातील बंद असलेले एन.आय.सी.यु.तात्काळ सुरु करण्याची कृपा करावी.
७) सर्व शासकीय सेवेत रुजु असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे आवश्यक असतांना सुद्धा सदर कर्मचारी मनमर्जी कारभार करित असल्याने आपल्या स्तरावरुन त्यांना आदेशित होणे आवश्यक आहे.
८)
अधिपारिचारिका यांच्या सहाय्यता करिता २-२ अधिपारिचारिका ठेवण्यात
आल्या आहेत. सदर बाब ही बेकायदेशीर असल्यामुळे तात्काळ त्यांची सेवा योग्य त्या
ठिकाणी सुरळीत करण्याचे आदेश देण्यात यावे तसेच प्रत्येक ज्येष्ठ अधिपारिचारिका यांना १ रात्रपाळी करण्याचे आपल्या स्तरावरुन आदेशित करावे.
९)
सदर ओ.पि.डी.मध्ये दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आवश्यक असून सुद्धा फक्त एन.आर.एच.एम, सेवेत असलेले वैद्यकीय अधिकारीच फक्त ओ.पी.डी.मध्ये हजर असतात आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिक्षक हे मात्र केव्हाच ओ.पी.डी.मध्ये दिसत नाहीत. त्यामुळे त्यांना तात्काळ आदेश देवून ओ.पि.डी. रुग्णसेवेकरिता सुरळीत होण्याकरिता आपले स्तरावरुन संबंधितांना आदेशित करण्यात यावे.
तरी मा.महोदय परिसरातील गोरगरिब जनतेच्या हिताकरिता व त्यांना
शासकीय सेवा उपलब्ध करुन देण्याकरिता शासनाने सर्वतोपरी साहित्य, साधन, सामुग्री, कर्मचारी उपलब्ध करुन दिलेले आहेत. परंतू केवळ सेवेत रुजू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे गोरगरिब जनतेला रुग्णसेवेपासून वंचित राहावे लागते व
त्यांना पुढील उपचाराकरिता विनाकारण रेफर लेटर देण्यात येत असल्याने त्यांना त्यांची परिस्थिती नसतांना सुद्धा नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
कोरोना काळात ज्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यापेक्षा तालुक्याचे नाव मोठं केलं
होतं अशा अधिकाऱ्याला त्रास देवून त्याची प्रतिनियुक्ती ही कामरगांवला देण्यात आली
आहे. तरी त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना त्यांचे मुळ सेवेत कारंजा येथे रुजू करण्याचे आपल्या स्तरावरुन आदेशित करणे अत्यंत महत्वाचे असल्याने सदर बाबीवर गांभीर्याने विचार करून संबंधितांना आदेशित करण्यात यावे .



तेजस्विनिच्या सेवाव्रती कविताताई सवाई यांचे धाडस : बेवारस मनोरुग्नाच्या मृतदेहावर केले या तेजस्विनीने अंत्यसंस्कार


कारंजा (लाड) : कारंजा येथील तरुण समाजसेविका कविताताई सवाई यांनी आपले आयुष्य गोरगरीब,निराधार,मनोरुग्न व वंचित घटकाच्या सेवासुश्रूषेकरीता वेचण्याचे ठरवून त्यादृष्टिने अनेक वर्षापासून आपली वाटचाल शुन्यामधून सुरू केली आहे.(आज आपण केवळ वाचतो,ऐकतो व बघतो सुद्धा की,अनाथाची माय पद्मश्री सिंधुताई संपकाळ,पद्मश्री बाबा आमटे इत्यादी समाजसेवकांनी आपली वाटचाल वंचित घटकांच्या सेवा सुश्रूमा करण्या मधूनच केली होती.अगदी त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून, सेवाव्रती कविताताई सवाई यांची सेवाकार्ये सुरु आहेत.) कविताताई यांनी वाशिम जिल्हा मुख्यालयाच्या वाशिम शहरापासून जवळच असलेल्या वाशिम ते कारंजा मार्गावरील, "सुपखेला" खेडेगावातील, सुपखेला फाटा येथे तेजस्विनी महिला बहुउदेशिय संस्थेच्या वतीने,मनोरुग्न,निराधार,वंचित घटकांकरीता "आपले घर-मनोरुग्न आश्रम." सुरु करून बेघर निवारा सेवाकार्य सुरु केले. परिसरातील मनोरुग्न,बेघर, निराधार,बेवारस वंचित घटकाचे पालन पोषण-औषधोपचार सुरू केले.सदर आश्रमात मनोरुग्नाची आंघोळ,कपडे बदलविणे,त्यांच्या करीता स्वतः स्वयंपाक करून त्यांना मायेची ऊब देत जेवणाचे घास भरवून पर्यंतची सर्व कामे, सेवाव्रती कविताताई सवाई ह्या अतिशय प्रेमाने व आनंदाने करीत असतात.त्यामुळे येथे येणारे अनेक मनोरूग्न ठणठणीत बरे होऊन त्यांच्या आप्तस्वकियांमध्ये सुद्धा परतत आहेत.असे त्यांचे सेवाकार्य सुरू असतांनाच,सदर आश्रमामधील एका बेवारस मनोरुग्नाचे निधन झाल्यामुळे, संपूर्ण शासकिय सोपस्कार पूर्ण होऊन बेवारस इसमाचे प्रेत ताब्यात मिळताच,संस्थेच्या सेवाव्रती अध्यक्षा कविताताई सवाई,सचिव गजानन भोयाळकर इत्यांदीनी - वाशिम ग्रामिण पोलीस स्टेशनचे ठाणेदार बांगर, बिट जमादार वाघमारे, सामान्य रुग्नालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.मुंढे,जय शंभो नारायण रुग्नवाहिकेचे संचालक कुणाल राठोड,इंद्रपाल ताजणे, सामाजिक युवा कार्यकर्ते निलेश सोमाणी यांच्या मदतीने,स्वतः महिला असूनही सेवाव्रती कविताताई सवाई यांनी अतुलनिय धाडसाने बेवारस मनोरुग्नाचे मृतदेहावर अंत्यसंस्कार करून, समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.त्यामुळे त्यांच्या धाडसाचे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन होत असल्याचे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे. *समाजातील दानशूर मंडळीनी तेजस्विनी कविताताई सवाई यांच्या बेघर मनोरुग्न आश्रमाला भेट देवून, तन मन धनाने सहाय्य करावे. -संजय कडोळे.* एक महिला असून,शुन्यातून, समाजातील बेघर,बेवारस, रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरूग्ण वंचित घटकांना मायेची ऊब देण्याकरीत सेवाश्रम चालविणाऱ्या कविताताई सवाई यांच्या सेवाकार्याला प्रोत्साहन देण्याकरीता समाजातील जागृत दानशूर व्यक्तिंनी स्वतःहून पुढे येऊन तन मन धनाने सहकार्य करण्याचे आवाहन कारंजा येथील दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी केले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या