धाबेकर महाविद्यालय येथील रोगनिदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद : 917 रुग्णांची तपासणी,गरजू रुग्णांवर होणार सावंगी मेघे येथे मोफत उपचार
वाशिम :-वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) शहरातील स्थानिक शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय येथे रविवारी पार पडलेल्या भव्य रोगनिदान शिबिरात 917 रूग्णांनी तपासणी केली.स.10 ते दुपारी 2 वाजे पर्यंत हे शिबिर चालले.शिबिराचा कारंजा (लाड) शहरातील तसेच तालुक्यातील रुग्णांनी लाभ घेतला.रुग्णांच्या तपासणी साठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी येथील आरोग्यपथक आले होते.तर श्री.संत रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलच्या आरोग्य पथकाने, शिबिरासाठी सहकार्य केले. डॉ. श्याम जाधव नाईक यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले.शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबारावजी खडसे पाटील यांच्या हस्ते ,तसेच माजी आमदार अनंत कुमारजी पाटील , बाबूसिंगजी नाईक,माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठीया, राजीक शेख, अमिर पठान, ॲडवोकेट संदेश जिंतूरकर, जिल्हा परिषद सदस्य सुनील धाबेकर,गजानन भाऊ अहमदाबादकर,डॉक्टर घाडगे, मनोज भाऊ कानकिरड, हाजी रुउफखॉ मामू,संतोष दुर्गे, व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.या शिबिरात हृदयरोग तज्ज्ञ, मेंदुरोग, पोटविकार, मूत्ररोग, प्रसूती व स्त्रीरोग, मेडिसीन, बालरोग, सर्जरी, अस्थिरोग, नेत्ररोग, दंतरोग तज्ञ, फिजिओथेरपी, त्वचारोग, कान, नाक व घसा इत्यादींची 917 रुग्णांनी लाभ घेतला यातील रुग्णांना सावंगी येथे मोफत उपचार करून दिला जाणार आहे.अशी माहिती डॉ.श्याम जाधव नाईक यांनी दिली.शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ,श्याम जाधव मित्रमंडळ कारंजा (लाड)मानोरा व आरोग्यधाम हॉस्पिटलचे कर्मचारी.यांनी परिश्रम घेतले.
पी.एस.खंदारे
डव्हा यात्रेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नाथनंगे महाराज वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रद्धा निर्मूलन समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न
(वाशीम)
रथसप्तमी निमित्ताने भव्य यात्रा महोत्सव नाथ नगरी श्रीक्षेत्र डव्हा येथे श्रीनाथ नंगे महाराज सार्वजनिक वाचनालय डव्हा व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते गाडगेबाबा फेम प्रबोधनकार पी.एस.खंदारे यांच्या विशेष कला कौशल्यातून उत्कृष्ट प्रबोधनात्मक राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित, कुटुंब नियोजन, साक्षरता अभियान, स्वच्छता अभियान, बेटी पढाव बेटी बचाव, अंधश्रद्धा निर्मूलन, मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार उद्घाटन मालेगाव तहसीलचे निवासी नायब तहसीलदार सुरज सागर यांच्या हस्ते, कार्यक्रमाध्यक्ष ग्रंथालयाचे संस्थापक अनिल बळी, प्रमुख अतिथी म्हणून परिवर्तन कला महासंघाचे शेषराव मेश्राम, झी टीव्ही चे प्रतिनिधी गणेश मोहळे,डव्हा ग्राम पंचायतचे माजी सरपंच संदीप डिघोळे, तसेच तमाम यात्रे करूच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी सर्वप्रथम कर्मयोगी संत गाडगेबाबा व संत सावता माळी यांच्या प्रतिमेचे पूजन करून हवेत तरंगणाऱ्या आधांतरी बाबांच्या पायाखालची खुर्ची काढून व फीत कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विचारपीठावरील मान्यवरांनी प्रस्तुत समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन कार्यक्रमाला रितसर सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राध्यापक सविता अनिल बळी यांनी तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सौ कुसुमताई यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते गाडगे बाबा फेम प्रबोधनकार पी.एस.खंदारे आणि त्यांच्या संचातील शाहीर दत्ता वानखेडे, हार्मोनियम वादक मधुकर ताजणे,नाल वादक नामदेव आवटे, खंजिरी वादक कुसुम सोनुने, शेषराव मेश्राम आदी मान्यवरांनी सतत तीन तास यात्रेकरूंचे प्रबोधन केले असून त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित वैज्ञानिक दृष्टिकोन विविध दृष्टांत व प्रयोग सादरीकरण व स्पष्टीकरण, अंधश्रद्धेतून होणारी फसवणूक, तसेच विविध शायरी गीतांचा आस्वाद यात्रे करू भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात घेतला.
हवेत तरंगणाऱ्या अधांतरी बाबाच्या भूमिकेत विदर्भ पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सोमेश अनिल बळी, हजारो भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काशिनाथ नागरे,लक्ष्मण गिऱ्हे, ग्रंथपाल सविता गवळी, सुचिता मुधमाळी, कु.रश्मी गुप्ता, सौ.एकता लाचुरे आदींनी अथक परिश्रम घेतले.
कारंजाचे विकास पुरुष माजी मंत्री स्व.बाबासाहेब धाबेकर हे जनतेच्या हृदयात असल्याची जयंतीदिनीच्या जनसागराने करून दिली जाणीव. "कुशल प्रशासक व योजना महर्षी होते."-माजी मंत्री संजय देशमुख
कारंजा [जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे] : "राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री स्व.बाबासाहेब धाबेकर हे शेवटपर्यंत राजाप्रमाणे जगले.ते कुशल प्रशासक तर होतेच तसेच प्रशासनातील गाढ अभ्यासक असल्याने त्यांचा अधिकारी वर्गावर मोठा दबदबा होता. त्यांनी जी कामे हाती घेतली ती पुर्णत्वास नेण्याचा पुर्ण प्रयत्न केला.म्हणून त्यांची ओळख संपूर्ण विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रात होती." असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री संजय देशमुख यांनी कारंजा येथे स्व.बाबासाहेब धाबेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत सभेत बोलतांना काढले.
याबाबत पुढे बोलतांना संजय देशमुख म्हणाले की, "स्व बाबासाहेब धाबेकर यांनी अकोला जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष असतांना राबविलेल्या योजना आजतागायत ग्रामीण जनतेच्या आठवणीत आहेत. ते मंत्री असतांना जलसंधारणाची कामे खूप मोठया प्रमाणात त्यांनी राज्यभर केली.त्यामुळेच सुशिलकुमार शिंदे यांच्या मंत्री मंडळात त्यांचे जलंसंधारणाचे काम पाहून बंधार्यांना धाबेकर बंधारा असे नाव शासनाच्या वतीने देण्यात आले." असे देशमुख म्हणाले. बाबासाहेब धाबेकर यांच्या प्रमाणेच त्यांचे सुपूत्र सुनिल पाटील धाबेकर यांचा जनसंपर्क देखिल दांडगा असून शेतकरी व शेतमजूर यांच्यासाठी त्यांनी सुरु केलेले काम निश्चितच प्रशंसनीय असल्याचे सांगतांना संजय देशमुख यांनी सुनिल धाबेकरांना राजकारणांसह समाजकारणाकडे आपण देत असलेले लक्ष देखिल वाखाणण्याजोगे असल्याचे सांगितले.
कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघातील सुनील पाटील धाबेकर मित्र परिवाराच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी स्थानिक धाबेकर सांस्कृतिक सभागृह येथे स्व.बाबासाहेब धाबेकर जयंती कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी व्यासपिठावर जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा अकोला जिल्हा परिषदेचे गटनेते सुनील पाटील धाबेकर, वीज मंडळाचे माजी सदस्य तथा कॉंग्रेस नेते अनिल राठोड, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, ज्येष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकिरड, वाशिम बाजार समितीचे सभापती दामुअण्णा गोटे, भाऊसाहेब काळे,माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया, माजी नगरसेवक एम.टी.खान,माजी उपनराध्यक्ष जुम्माभाई पप्पुवाले, माजी सभापती प्रकाश आप्पा निंबलवार,सुरेंद्र देशमुख माजी खरेदी विक्री अध्यक्ष मानोरा,रमेश जाधव,रा.काँ.पार्टी मानोरा,माजी पं.स.सदस्य किशोर पाटील लाहोरे, रामकृष्ण भगत, ता.अध्यक्ष काँग्रेस पार्टी, राज चौधरी, सुरेश पाटील पोले, गजानन अमदाबादकर, मानोराचे इफ्तेखार पटेल, डॉ.श्याम जाधव, जिल्हा परिषद सदस्य दत्ता पाटील तुरक, माजी सभापती अशोकराव मुंदे,कारजा पत्रकार मंचचे दिलीप रोकडे, बालचंद्र जाधव, संतोष दुर्गे, मनोज कानकीरड, सुरेश पारे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश दवंडे यांनी तर सूत्रसंचालन विजय मापारी यांनी केले. तर विजय पाटील काळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला राष्ट्रीय कॉंग्रेसचे कार्यकर्ते तथा बाबासाहेब धाबेकर यांचे चाहते बहुसंख्येने उपस्थित होते. "त्यांच्या हजारो चाहत्यांच्या सर्वपक्षीय जनसागरामुळे आजही स्व बाबासाहेब धाबेकर जनतेच्या हृदयात जीवंत असल्याचा प्रत्यय येत होता." असी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी यावेळी माध्यमाकडे व्यक्त केली. कार्यक्रमासाठी तुळशिराम तायडे,माजी बाजार समिती सचिव वाळके,अशोक पाटील दहातोंडे, अशोक पाटील वानखेडे,रमेश पाटील मुंदे, श्रीकृष्ण पाटील,विजय पाकडू, अण्णा पाटील मुंदे,राज चौधरी, संजय राठोड,वईद भाई,गजानन भुरे,जिवन जाधव,पांडूरंग तिकोडे,बाळू पा. इंगोले, गोपालराव दवतडे,विलास देशमुख,पद्माकर गोडसे, प्रदिप वानखेडे, संजय कडोळे, राजिक भाई, अशोकराव मुंदे,विलास सुरळकर,पांडूरंग पा. हिंगणकर, मनोज पा. दहातोंडे, विठ्ठलराव लाड रामदास व्यवहारे,भाऊराव पाटील चौधरी, मनोज कानकिरड रा.कॉ. तालुका अध्यक्ष ,बालचंद जाधव आदींनी अथक परिश्रम घेतले.
याप्रसंगी सुनील धाबेकर बोलताना म्हणाले की, "स्व.बाबासाहेबांनी शून्यातून विश्व निर्माण केले होते.एका माणसात किती शक्ती असू शकते,त्याचे ते मूर्तीमंत उदाहरण होते. सूतगिरणी असो की शैक्षणिक संस्था अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपली छाप सोडली.ज्या गोष्टीत त्यांनी हात घातला त्यात यश मिळवले असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते." असे बोलताना त्यांनी कॉंग्रेसचे निष्ठावंत नेते स्व.केशवराव खोपे यांच्याही कार्यकर्तृत्त्वाचा गौरवही केला. याप्रसंगी व्यासपिठावर उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
ईव्हीएम मशीनने मतदान बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी. -वंचित बहुजन आघाडीची मागणी
कारंजा : श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या तसेच जिल्हाध्यक्ष सौ. किरण ताई गिरे यांच्या आदेशाने दिनांक 20/ 02/ 2024 रोजी तहसीलदार कारंजा यांना निवेदन देण्यात आले. ईव्हीएम मशीन मध्ये काही तांत्रिक बिघाड करून मतांची चोरी केल्या जाते,त्यामुळे सदर मशीन बंद करून बॅलेट पेपरवरच येणाऱ्या सर्वच निवडणुका घेण्यात याव्या.तसेच "काही वर्षांपूर्वी दि. ८ ऑक्टोंबर 2013 रोजी सदर मशीन मध्ये काही तांत्रिक बिघाड करून मतांची हेराफेरी करण्यात आली होती." असा निकाल न्यायालयाने नुकताच जाहीर केला होता. त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्वच निवडणुका या ईव्हीम मशीन बंद करून बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात.अशी वंचित बहुजन आघाडी तालुक्याच्या वतीने मागणी करण्यात येत आहे . सदर मागणी पूर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडी चे मा. राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने तिव्र स्वरूपात स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी जिल्हा उपाध्यक्ष
किशोरभाऊ ऊके, तालुका महासचिव रविंद्र भुसारे, तालुका मार्गदर्शक देवराव कटके, युवा तालुका अध्यक्ष रुपेश शहाकार श्रीकांत बागडे उपाध्यक्ष युवा विलास डोंगरे शहर उपाध्यक्ष,शेषराव चव्हाण शहर संघटक, चंद्रमणी लांजेवार, सदानंद कटके,
मा. विनय सोनवणे, भारत भगत (पाटील), नंदू भाऊ आडोळे, सर्कल अध्यक्ष विलास वानखडे ( बामर्डा) मा. राहुल इंगळे ग्रा. सदस्य ( बामर्डा) नितेश वानखडे, गौतम बनसोड, बबन वानखडे तालुका उपाध्यक्ष गणेश मस्के तालुका उपाध्यक्ष महादेव खडसे, मनवर साहेब, मनोज ठोंबरे, सुमित भगत, संजय खाडे, माजी उपसरपंच मोसंबी बाई, विनोद नंदागवळी, मीना वानखडे, अनुराधा शेंडे, सुमन खंडारे, नर्मदाबाई गवई, प्रभाबाई जाधव, पुष्पाबाई भिसे, रेखा गजभिये, शिलाबाई राऊत, वंदना धनवे, शुभम शिरसाट व असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होते .
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती प्रतिष्ठान द्वारा साजरी
कारंजा लाड : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त,कारंजाचे माजी आमदार तथा माजी मंत्री गुलाबरावजी गावंडे व माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठीया यांच्या प्रमूख उपस्थित शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व आरती मा.गुलाबरावजी गावंडे व अरविंदजी लाठीया यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाला देवानंद देवळे ,मनोज पाटील कानकिरड, वाळके साहेब, विजय कडू , विनोद बाप्पू देशमुख ,जनार्धन पाटील बोबडे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने 1 क्विंटल खिचडीचे वाटप बायपास या ठिकाणी करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती प्रतिष्ठानचे संदेश देवळे, प्रतिक बोबडे, प्रफुल गवई, रूपेश देशमुख,शुभम कानकीरड अक्षय बनसोड,अभिजित कोहर , श्याम पावडे पाटील, रोहित सम्रत, धम्मपाल कुलकर्णी, गौरव करडे, ऋषभ रिठे, करण सोनोने, रोहित जाधव, रुपेश अंजणकर, आश्रय ढोक,सागर इंगळे , शुभम अलोने, वैभव ताठे, प्रशांत लुंगे , शुभम इंगले, कुनाल सोनोने,विक्की सावंत,किसना लाहे,हर्षल अंजनकर ,कासीम कुंडीवाले व इतर शिव प्रेमींनी केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषद कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांना देण्यात आली.
राष्ट्रवादी काॅग्रेस शरद गटाचे नेत्यांची सराफा बाजार कारंजा येथील फॅशन ज्वेलर्सला सदिच्छा भेट
कारंजा : कारंजा येथील सराफा लाईनमधील राष्ट्रवादी काॅग्रेस शरद पवार गटाचे,कारंजा शहर अध्यक्ष तथा आदर्श समाजसेवी हाजी रऊफखान यांच्या मुलाच्या फॅशन ज्वेलर्स कारंजा ह्या प्रतिष्ठानला, राष्ट्रवादी काॅग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी आमदार अनंतकुमार पाटील, सुनिल पाटील दहाञे नेते तथा माजी जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काॅग्रेस वाशीम जिल्हाध्यक्ष बाबुसिंग नाईक राष्ट्रवादी नेते, लिकेश बांडे,उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक, दिलीप पाटील रोकडे अध्यक्ष कारंजा तालुका ओबिसी राष्ट्रवादी काॅग्रेस ,प्रभाकरराव लव्हाळे लाडेगाव यांनी फॅशन ज्वेलर्सला सदिच्छा भेट दिली यावेळी हाजी रऊफखान मामु यांनी त्यांचे पुष्प गुच्छ देउन सत्कार केला त्यावेळी शहरातील स्थानिक गणमान्य नागरिक हजर होते
0 टिप्पण्या