ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुतीकरण व ग्रामीण जीवन उंचावण्यासाठी भाजपा कटिबद्ध- आ.सावरकर
अकोला
शेतकऱ्यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार खंबीरपणे उभे असून केवळ समाजामध्ये द्वेष निर्माण करणे गप्पांचा राजकारण करणे स्वतःला ज्ञानी समजणे त्यापेक्षा समाजात व मतदारांनी दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडणे व आपल्या मतदाराला त्यांच्या समस्या निराकरणासाठी कटिबद्ध असते हीच भारतीय जनता पक्षाची संस्कृती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळाली. साठ वर्षाचा कालखंड आणि दहा वर्षाचा कालखंड याचा विचार करून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुतीकरण करणे, ग्रामीण माणसाच्या जीवन उंच होणे, हे एकमेव उद्देश घेऊन सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
ग्रामीण आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची किमया परंपरा स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर स्वर्गीय गोवर्धन शर्मा स्वर्गीय विठ्ठलराव सालपिकर, स्वर्गीय वसंतराव देशमुख, अण्णासाहेब मुडगावकर देशमुख मोतीरामजी लहाने यांनी जोपासली व याला संवर्धन देण्याचं काम खासदार संजय भाऊ धोत्रे, तेजराव थोरात शंकरराव राजनकर , गोविंदराव आंधळे व असंख्य कार्यकर्त्यांनी, व भाजपालोकप्रतिनिधी यांनी जोपासल्यामुळे सातत्याने अकोला लोकसभा मतदारसंघात सहा वेळा भारतीय जनता पक्ष विजयी झाले व सातत्याने 35 वर्षापासून भारतीय जनता पक्षाला प्रेम करणारा वर्ग असल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी करून केवळ नवटंकी नाटक बाजी न करता चमकोगिरी न करता सर्वसामान्यांना आधार मिळावा त्यांच्या प्रश्नाला राज्य शासनापासून तर जिल्हास्तरापर्यंत आवाज उठून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने जनसंपर्क करून केवळ निवडणूक आली म्हणून देवधर्म, ज्या धर्माचं धर्मावर नाव ठेवतात त्या धर्माचा पूजन करणे ज्याच्यावर टीका करतात त्या त्या गोष्टी करणे व राष्ट्र राष्ट्रीय विचारसरणी सोडून सत्तेसाठी हात मिळवणी करणाऱ्या तत्व वेगवेगळे रूप घेऊन जिल्ह्यात फिरत आहे त्यापासून सावध राहण्याची गरज आहे त्यांची वृत्ती त्यांची कृती केवळ सत्तेसाठी असल्याचा जनतेला माहित आहे त्यामुळे ग्रामीण जनता नाटक बाज करणाऱ्या पासून सावध राहते अकोला जिल्ह्याचा हा इतिहास आहे अशी ही आमदार सावरकर याप्रसंगी सांगितले सातत्याने 18 तास काम करून शहरी व ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधणारा व सर्वसामान्यांच्या संवेदना जाणून त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणे हीच शिकवण घेऊन आपण राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याचीही यावेळी आमदार सावरकर म्हणाले
यावेळी आमदार सावरकर यांच्यासोबत राजेश बेले, अनिल पागृत, राजू कामटे, जय लहरिया साहेबराव मातुरकर भरत काळमेघ गोपाल कांगटे, खडसे भालचंद पागृत कैलास पागृत, सचिन पागृत, रमाकांत पागृत, श्रीकांत पाटील दादाराव पाटील सुभाष रायबोले श्रीकांत पाटील, गोदावरी भगत संतोष कोळंबे रवींद्र पाठक किशोर रामगिरी, कीशोर रामागरे, आधी सोबत होते.
घुसर कट्यार ला कोंडा या गावांना भेटी देऊन आमदार सावरकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या.
सविस्तर वृत्त येथे डोम 👆पहा...
लाकोंडा इथे शेतकरी पुरुषोत्तम रामदास भगत यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या संवेदना व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली तसेच घुसर येथील अनिल बंडू गालफाडे या परिवाराला सुद्धा भेट देऊन त्यांच्या परिवारांना दुखद घटना बद्दल शोक संवेदना व्यक्त केली. तसेच कट्यार येथे मीना भास्कर नावकार यांची सुद्धा भेट घेऊन संवेदना व्यक्त केली
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या