तळागाळातील राष्ट्रीय सप्तखंजेरी प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराजांना डावलून, "महाराष्ट्र भूषण पुरस्कार" सिने अभिनेते अशोक सराफ यांना जाहिर "हे सरकार धनदांडग्याचे आणि व्हिआयपीचे असल्याची,विदर्भ लोककलावंत संघटनेची तिखट प्रतिक्रिया
वाशिम/ अकोला: राष्ट्रसंत गुरुदेव तुकडोजी महाराजांचे परम शिष्य तथा आजिवन प्रचारक असलेल्या,अमरावती विभागातील,अकोला जिल्ह्याच्या,अकोट येथील बहुजन समाजातील,सर्वसामान्य असलेल्या,श्री सत्यपाल महाराज चिंचोलीकर यांनी गुरुदेवाच्या खंजेरी वाद्याला वेगळा आयाम देत,खंजेरीतून-सप्तखंजेरी वादनाची कला अवगत केली.व आपल्या निरंतर प्रबोधनाने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत भरात,कानाकोपऱ्यात, गावोगावी,खेडोपाडी,राष्ट्रसंत गुरुदेव आणि कर्मयोगी संत गाडगे महाराजांची विचारधारा आणि शाहू फुले आंबेडकर यांचा आदर्श तसेच महाराष्ट्रियन संस्कृती,राष्ट्रीय कार्यक्रम जनजागृती आणि व्यसनमुक्तीपर समाजप्रबोधन कार्यक्रम करून, देशातील अनेकांना कायमचे व्यसनमुक्तही केले.शिवाय सप्तखंजेरी कलेचा स्वतःपुरता न्यूनगंड (अहंकार) न बाळगता, सप्तखंजेरी वादन कलेचे प्रशिक्षण शिकवून आपल्या कलेचा प्रचार प्रसार करीत हजारो शिष्य घडवून, आपल्या शिष्याद्वारे सप्तखंजेरी वादन समाज प्रबोधनकारांची मोठी फौज उभी करून समाज प्रबोधनाचा पायंडा सुरु केला. तळागाळातील ह्या कष्टकरी समाज प्रबोधनकाराने आपल्या जीवनसंगीनीच्या मृत्युनंतर त्यांचा देह सुद्धा वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकरीता रुग्नालयाला दान दिला.त्यामुळे अशा सर्वसामान्य राष्ट्रिय प्रबोधनकाराचा गौरव म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक विभागाचा "महाराष्ट्र भूषण पुरस्कार" द्यावा.अशी महाराष्ट्रातील त्यांच्या तमाम चाहत्यांची इच्छा होती.व अनेक वर्षापासून तशी मागणीही होत आहे.नागपूर येथे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात तर त्यांच्या असंख्य शिष्यांनी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा म्हणून आंदोलनही केले होते.परंतु तरीसुद्धा सर्वसामान्य तळागाळातील ह्या प्रबोधन काराची दखल न घेता,महाराष्ट्र शासनाने विदर्भाच्या भूमितील,तळागाळाच्या सर्वसामान्य निःस्वार्थी व सच्च्या लोककलाकाराला डावलून, महाराष्ट्र शासनाचे विद्यमान मुख्यमंत्री यांनी ह्या पुरस्कारा करीता व्हिआयपी असलेल्या मराठी सिनेसृष्टीतील बड्या चित्रपट कलाकाराची अशोक सराफ यांची निवड केली. मुख्यमंत्र्याच्या ह्या निर्णयाने, तळागाळातील लोककलावंताना हा जबर धक्का बसला आहे. त्यावर विदर्भ लोककलावंत संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, "अशोक सराफ हे प्रचंड उंची असलेले,धनाढय,दिग्गज कलाकार आहेत.त्यांना चित्रपट सृष्टीने अनेकानेक बडे पुरस्कार मिळवून दिलेले आहेतच.त्यामुळे अशा बड्या अभिनेत्याला ,सर्वसामान्य प्रबोधनकार आणि लोककलाकाराच्या हक्काचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते.
मात्र सरकारने त्यांच्या नावाची घोषणा केली.सरकारच्या या निर्णयाने श्री सत्यपाल महाराजांना महाराष्ट्रभूषण पुरस्कारापासून डावलल्या गेले.ह्या शासनाने तळागाळातील सर्वसामान्य लोककलाकार प्रचंड अन्याय केला असून हे सरकार सर्वसामान्य जनतेचे नसून, धनदांडग्या व बड्या आसामीचे सरकार असल्याचे सिद्ध झाले आहे.आम्ही सच्च्या प्रबोधनकाराला डावलल्याबद्दल निषेध व्यक्त करीत आहोत." अशा शब्दात विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी आपला संताप जाहीर केला आहे.
0 टिप्पण्या