जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि खासदारांच्या दुर्लक्ष्याने पालकमंत्र्यांकडून, शासकिय निमशासकिय समित्यांचे गेली पाच वर्ष गठन नाही
"जिल्हा वृद्ध साहित्यीक समितीचं नसल्याने पाचशे कलावंताचे पाच वर्षाचे झाले नुकसान."
वाशिम : सर्वसामान्य तळागाळातील मतदार नागरिकांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळण्या करीता लोक प्रतिनिधीच्या शासकिय निमशासकिय समित्यांचे गठन होणे अत्यावश्यक असतांनाही गेल्या सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकां पासून, जिल्ह्यातील एकाही आमदाराने किंवा खासदाराने या विषयाकडे गांभिर्याने लक्ष्यच न दिल्याने, पालकमंत्र्याकडून शासकिय निमशासकिय समित्याचे गठनच करण्यात आले नाही. परिणामी आधीच आकांक्षित असलेल्या वाशिम जिल्हयातील सामान्य मतदार नागरीक शासनाच्या लाभाच्या योजनां पासून वंचित राहात आहेत.मध्यंतरी सन 2019 ते 2022 पर्यंतचा काळ कोरोना महामारीचा म्हणून ओळखल्या गेला. अनेक नागरीकांचे रोजगार बुडाले. कलाक्षेत्रातील लोककलाकाराची उपासमार झाली. उल्लेखनिय म्हणजे जिल्ह्यात जर वृद्ध कलाकार निवड समितीचे गठन झाले असते तर दरवर्षी शंभर कलाकार याप्रमाणे पाचशे वयोवृद्ध व दुर्धर आजारग्रस्त कलाकारांना दरमहा मानधन मिळाले असते व त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला असता. परंतु दुदैवाने केवळ जिल्ह्यातील सर्वच आमदार ,खासदार , पालकमंत्री यांनी लोकहिताचा हा विषय गांभिर्याने घेतला नसल्याने व त्याकडे सपशेल दुर्लक्ष्य केल्यामुळे जिल्ह्यातील एकूण पाचशे कलावंताचे पाच वर्षाचे प्रचंड नुकसान झाले असल्याचा स्पष्ट आरोप, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त असलेले - विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
0 टिप्पण्या