Ticker

6/recent/ticker-posts

विज्ञान आणि तंत्रज्ञानच नव्या युगाच्या वाटा : पी.एस. खंदारे

विज्ञान आणि तंत्रज्ञानच नव्या युगाच्या वाटा : पी.एस. खंदारे


बाल कल्याण समिती, वाशिमचे आयोजन

वाशिम: विज्ञान आणि तंत्रज्ञानातून विद्यार्थ्यांना पैलू पाडण्याचे काम होत असुन विद्यार्थ्यांनी जीवनातील समस्या सोडविण्यासाठी अंधश्रद्धा, बुआबाजीचा त्याग करुन विज्ञानाची कास धरावी या करीता बाल कल्याण समिती, वाशिमचे वतीने स्थानिक दिशा मुलींचे निरीक्षण/बालीकागृह, वाशिम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बाल कल्याण समिती अध्यक्ष डाॅ. अलका मकासरे, बाल कल्याण समिती सदस्य, विनोद पट्टेबहादुर, बालाजी गंगावणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली मेश्राम, दिशा मुलींचे निरीक्षण गृह अधिक्षक गोपाल मोरे, गौरी शंकर विद्यालयाचे शिक्षक वाठोरे, जिनसाजी चौधरी, विधी मेश्राम आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रबोधनकार आधुनिक गाडगेबाबा पि.एस. खंदारे यांनी सप्रयोग विज्ञान आणि तंत्रज्ञानावर प्रात्यक्षिके करुन समाजातील फोफावलेली अंधश्रद्धा दुर सारुन आपले जिवन उंचावण्यासाठी विज्ञानाचा, तक॔शास्त्राचा स्विकार करण्याचे आवाहन यावेळी केले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आजही बालके ही उद्याच्या उज्जवल भारताचे निर्माते असल्याने ती चिकीत्सकबुध्दीची असणे आवश्यक आहेत. आजच्या तरुणाईने विज्ञानाचा आधार घेत वाटचाल केली तर विज्ञान आणि तंत्रज्ञानच नव्या युगाच्या वाटा निर्माण करेल असे प्रतिपादन आधुनिक गाडगेबाबा पि. एस. खंदारे कार्यक्रमा दरम्यान केले. पाण्याने दिवा लावणे, विभक्त कापडातून एकात्मतेला संदेश देणे, पाण्याची साखर तयार करणे, अचूक चिठ्ठीतील नावे ओळखणे, तिन पत्त्यातून राणिचे रुपांतर हिरोईनच्या फोटोत करणे, बकेटीतील पाणी दुर वरुन बोटाच्या सहाय्याने नाक, कान, दुस-या हाताच्या बोटातून काढणे, गोट्याला थांबते-चालते ठेवणे, हाताच्या सहाय्याने पाऊस पाडणे अशी विविध प्रात्यक्षीके बालकांना करुन दाखविले. अंध्दश्रध्देला बळी न पडता विज्ञानाच्या कसोटीवर सर्व गोष्टी तपासून पहाल्यास सत्याची मिमासा करता येईल याकरिता पुस्तकाचे वाचन करण्या संबंधी खंदारे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे आयोजनाकरीता बाल कल्याण समिती सदस्य विनोद पट्टेबहादुर, बालाजी गंगावणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, दिशा मुलींचे निरीक्षण गृह, अधिक्षक गोपाल मोरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अजय यादव, एकनाथ राठोड, सुजात खान, दिशा मुलींचे निरीक्षण गृहाचे जानराव वाघ, राजु सनिसे, ज्योती इंगळे, संगिता बेले यांच्यासह बालीकागृहातील बालीका व गौरी शंकर शाळेचे बालक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार दिशा मुलींचे निरीक्षण गृहातील मुलींनी केले. असे वृत्त मिळाल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे .

राज्य परिवहन महामंडळाच्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची होणार महत्वाची सभा


 मंगरूळपीर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मंगरुळपीर आगाराच्या,मंगरूळपिर मानोरा तालुक्यातील सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या विविध समस्या सोडविण्याचे दृष्टिने,गुरुवार दि.25/01/2024 ला दुपारी ठिक 02:00 वाजता,श्री.हनुमान मंदिर,बस स्थानक मंगरुळपिर येथे महत्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आलेली आहे. सदर सभे मध्ये अकोला विभागीय पदाधिकारी व केंद्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत. या मध्ये सेवानिवृत्त कामगार कर्मचारी यांचे वाढीव पेन्शन,मोफत पास व प्रलंबित कामे इत्यादी बाबत माहिती मिळणार आहे. शिवाय त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे बरीच वर्ष एकमेकाच्या सोबतीने काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सदिच्छा भेटी आणि सुख दुःखात एकमेकांना साथ दिली परंतु सेवानिवृत्ती नंतर त्यांची भेट दुर्लभ झाली.या निमित्ताने जुन्या आठवणीचा उजाळा मिळावा, आणि नेहमी भेटी व्हाव्या या करीता मासिक सभेची सुद्धा तारीख नक्की करणे व मंगरुळपिर व मानोरा करीता, राज्य परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कार्यकारिणी जाहिर करण्याचे ठरवीले आहे, त्या करीता सर्वांनी या सभेला न चुकता हजर राहावे असे आवाहन अनिल भंगाडे, सुभाष राठोड, सी ए ठाकरे इत्यादीनी केले आहे . असे वृत्त राजाराम राऊत यांनी आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांना कळवीले आहे.

माजी विद्यार्थी मेळाव्यात झाल्या महाराष्ट्रातील विविध नामवंतांच्या भेटी



कारंजा : स्वा.से.श्री.क.रा. इन्नानी महाविद्यालय, कारंजा येथे नुकताच माजी विद्यार्थी मेळावा दि.७ जानेवारी रविवार रोजी यशस्वीरीत्या संपन्न झाला. सकाळी ठीक ९.३० वाजता नोंदणीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक माजी विद्यार्थी या मेळाव्यात उपस्थित होते.
उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.पी.आर. राजपूत व अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक देवरे तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालय व्यवस्थापन समिती सदस्या उर्मिलाताई ठाकूर, उपप्राचार्य डॉ. आर. ए पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर राऊत, कार्यरत अध्यक्ष देवानंद बोन्ते, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा. अतुल बरडे, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. दत्तात्रय हळवे, माजी विद्यार्थी संघटनेचे माजी सचिव सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. डी टी.डोंगरे, सेवानिवृत्त प्रा. डॉ. राजीव गुल्हाने, सेवानिवृत्त प्राध्यापक वसंतराव घुले, सेवानिवृत्त प्राध्यापक विजय ताठे, प्रा. के.जी राजपूत, माजी विद्यार्थी नायब तहसीलदार विनोद हरणे आदी मान्यवर उपस्थित होते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष देवानंद बोन्ते यांनी माजी विद्यार्थी संघटनेचा इतिहास कथन केला. तर माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्राध्यापक अतुल बरडे यांनी उपस्थित सर्व माजी विद्यार्थी यांचे शब्द सुमनानी स्वागत केले. सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर पी.आर राजपूत आपल्या उद्घाटन भाषणात म्हणाले की, माजी विद्यार्थी संघटनेचे कार्य अतिशय उत्कृष्ट आहे. या संघटनेच्या सहकार्याने कॉलेजला अ + दर्जा प्राप्त झाला. विद्यार्थ्यांनी समाजात कसे राहावे?याबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर श्रीमती उर्मिलाताई ठाकूर, सेवानिवृत्त प्राचार्य दत्तात्रय हळवे, डॉक्टर डी टी डोंगरे, प्राध्यापक के. जी राजपुत, नायब तहसीलदार विनोद हरणे आदींनी आपल्या मनोगतात उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.


अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य अशोक देवरे यांनी 1983 पासूनच्या आठवणींना उजाळा दिला. त्यामधील काही निवडक अनुभव कथन केले. कॉलेजच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. उद्घाटन कार्यक्रमाचे आभार माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष विलास कथले यांनी मानले. जेवणानंतर दुसऱ्या सत्राची सुरुवात विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मनोगताने झाली. यामध्ये मुंबई येथुन आलेले आयटी डायरेक्टर संजय वैद्य,अकोलाचे प्राचार्य आर. के गायकवाड,पुसद येथील शशिकांत परळीकर, जीएसटी स्टेट टॅक्स ऑफिसर मधुसूदन नागे, हाउसिंग फायनान्स विभागीय ऑफिसर राहुल पाटील, बीएसएनएल अकोलाचे सहाय्यक महाप्रबंधक सुनील वानखडे, ग्रामीण रुग्णालयाच्या अर्चना ठाकरे, नाशिकच्या नगरसेविका समिधा आकबानी, धामणगांव रेल्वेच्या प्रीती सेठिया, बीएसएनएल चे जेटीओ रहेमान शेकूवाले, इंझोरी येथील राजकुमार दिघडे, संगई कॉलेज अंजनगाव येथील विनोद चौधरी, बार्टीच्या समता दूत प्रणिता दसरे,मानोरा येथील जगदीश जोशी, नागपूर येथील स्मिता पांढरीकर, विद्या पवार, अनिल देशमुख, अनुपमा राऊत, सुवर्णा हळदे, प्रमोद मुक्कमवार, माधव पाटील उदय गर्जे रवींद्र काळे, मुख्याध्यापक विजय भड, प्रबोधनात्मक कार्यक्रम करणारे विनोद धोटे आदी विद्यार्थ्यांनी आपण या कॉलेजमुळे कसे मोठे झालोत? व आपल्या काळातील कॉलेजच्या आठवणींना उजाळा दिला व काहिनी गीतगायन,शेरो शायरी केली.
1983 पासून तर 2022 पर्यंत शिकत असलेल्या सर्व वरिष्ठ महाविद्यालक्यातील 601 माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी बहुतांशी विद्यार्थी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी संघटना कोषाध्यक्ष सुरेश गुगलिया सदस्य हेमंत जोशी, विलास खामकर,शुध्दोधन तायडे,संतोष देऊळकर, सौरभ तोमर व बहुसंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते.25 ते 30 वर्षानंतर भेटी झाल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव होते. संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी येथील मुख्याध्यापक विजय भड यांनी केले तर आभार सदस्य ॲड.सुमंत बंडाळे यांनी मानले. असे वृत्त मिळाल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या