प्रजासत्ताक दिनाला निघाली कारंजा येथे संविधान सन्मान रॅली
कारंजा :
दि.२६ जानेवारी १९५० रोजी सविधानाची अंमलबजावणी करण्यात आली तो दिन आपण प्रजासत्तादिन म्हणुन सर्वत्र साजरा करतो. याचे औचित्य साधुन या प्रजासकत्ताकदिनी महाविकास आघाडी कारंजाचे वतीने कारंजा शहरात संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या संविधान रॅलीची सुरुवात दुपारी साडे बारा वाजता
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला बाबाराव ठाकरे मा. अध्यक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस वाशीम यांचे हस्ते हारार्पण करून करण्यात आली. पुढे संत गाडगेबाबाचे पुतळ्याचे पुजन श्रीधर पाटील कानकीरड उपाध्यक्ष वाशिम अकोला जिल्हा मध्यवर्ती को ऑपरेटीव्ह बॅंक यांचे हस्ते पुजन व हारार्पण करुन ,पुढे छत्रपती शिवाजी महाराज शहीद भगतसिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी हार अर्पण करून नंतर रॅलीचे महर्षी वाल्मिकी चौकामध्ये रॅलीची सांगता झाली. त्या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना शेतकरी संघटना व इतर पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घेऊन या सभेमध्ये माजी आमदार अनंत कुमार पाटील माजी मंत्री संजय भाऊ देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकिरड हंसराज शेंडे सुनील पाटील दहात्रे महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष सौ वैशालीताई मेश्राम तालुका राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष्या मायाताई लाहे बाबू सिंग नाईक डॉ श्याम जाधव मानोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काशीराम राठोड कारंजा तालुका अध्यक्ष मनोज पाटील कानकिरड सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ रमेश चंदनशिव जिल्हा परिषद सदस्य दत्ता पाटील तुरक बाबाराव पाटील ठाकरे दिलीप भोजराज , माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठीया , राजीक शेख, प्रदिप वानखडे, ॲड संदेश जिंतूरकर काँग्रेसचे शहराध्यक्ष आमिर खान पठाण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रऊफ मामू अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सुभान भाई कामनवाले भारत भगत माजी सरपंच प्रदिप वानखडे कारंजा खरेदी-विक्रीचे संचालक विठ्ठलराव लाड ओबीसी जिल्हाध्यक्ष मनीष भाऊ चिपडे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील रोकडे घनश्याम पाटील शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विलास भाऊ सुरळकर डाॅ अशोक मुंदे मंगरूळपीर तालुका अध्यक्ष भास्कर सुर्वे पाटील सचिन भाऊ परळीकर भास्कर पाटील मुळे पत्रकार हाफिज भाई राजू खान अजय रंगे जहीरभाई समाजसेवक विलास सोनोने विलास राउत गोपाल पाटील येवतकर गणेश पाटील ठाकरे रामबकस डेंडुले राजकुमार लाहोटी गजानन भाउ अमदाबादकर विठ्ठलराव गाडगे गोपाल शर्मा मानोरा राजीक भाई बबलु शेख विजय गागरे तुळशिराम तायडे अशोक वानखडे श्रीकृष्ण पाटील तुरक व महाविकास आघाडीचे शिवसेना काॅग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेसचे सर्व पदाधिकारि व कार्यकर्तै हजर होते मान्यवराकडुन सविधाना बाबत उपस्थिताना मार्गदर्शन करण्यात आले त्यामधे अनंतकुमार पाटील मानोरा श्रीधर पाटील कानकिरड माजी मंञी संजय देशमुख बाबुसिंग नाईक अरविंद लाठीया दिलीप भोजराज हंशराज शेंडे या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले यामधे शेंडे साहेब यांनी आपल्या भाषणात म्हटले की या संविधान दिनी अशी रॅली काढुन संविधानाचा सन्मान केला हा आपल्या कडील कदाचित पहिलाच प्रयत्न आहे अशा शब्दानी आयोजकांचे भरभरुन कौतुक केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीधर पाटील कानकारड यांनी स्विकारले तर प्रास्ताविक भारत भगत यांनी व संचलन घनश्याम पाटील यांनी केले.
दुष्काळग्रस्त शेतक-यांचा सोटा मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकणार
काँग्रेसचा पुढाकार , महाविकास आघाडीचा सहभाग
सुरवातीला ओला व नंतरच्या कोरड्या दुष्काळामुळे संपूर्ण शेतं पीके वाया गेली आणि उरल्या सुरल्या पिकांची अवकाळी पावसामुळे नासाडी झाली. या वर्षीच्या खरीप हंगामात काहीच पिकले नसल्याने प्रशासनानेही ४८ पैसे आणेवारी काढली. मात्र, असे असतांनाही मानोरा तालुक्यासह वाशीम जिल्ह्यात राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला नाही. सरकारच्या या अन्यायाविरुध्द संतप्त शेतकऱ्यांचा सोटा मोर्चा बुधवार दि. ३१ जानेवारीला मानोरा तहसिल कार्यालयावर धडकणार आहे.
काँगेसच्या पुढाकारात निघत असलेल्या शेतकऱ्यांच्या या सोटा मोर्चात मानोरा तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष पूर्ण शक्तीने सहभागी होणार आहे. दि. २६ जानेवारी रोजी मानोरा येथील शिवसेना भवनात संपन्न झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार अनंतकुमार पाटील हे होते. तर शिवसेना (उ.बा.ठा) चे विधानसभा सहसंपर्क प्रमुख अनिल राठोड, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा वाशीम जिल्ह्याचे प्रभारी देवानंद पवार, वाशीम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष बलदेव महाराज, वाशिम जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबूसिंग नाईक, मानोरा कृ.उ.बा.समितीचे सभापती संजय रोठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरचिटणीस श्याम जाधव यांच्यासह मोठया संख्येत महाआघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते. बुधवार दिनांक ३१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पंचायत समिती कार्यालयापासून तहसिल कार्यालयावर सोटा मोर्चा नेण्यात येणार आहे. संतप्त झालेले शेतकरी आपल्या हातात सोटे घेऊनच या मोर्चात सहभागी होणार असून झालेल्या अन्यायाच्या संदर्भात जाब विचारतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार अनंतकुमार पाटील व शिवसेनाचे विधानसभा सहसंपर्क प्रमुख अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनात निघत असलेल्या या मोर्चाचे नेत्रृत्व काँगेस पक्षाचे जिल्हा प्रभारी देवानंद पवार करतील. आज मानोरा तालुक्यात शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. शेतकऱ्यांना दुष्काळाची व अवकाळीची मदत नाही अन् पीकविमाही मिळाला नाही. दिवसा विज पुरवठा खंडीत केला जात असल्याने रात्रीला जीव धोक्यात घालून पिकांना पाणी द्यायला जावे लागत आहे. जंगली डुकरं व रोह्यामुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. अशा अनेक समस्या असतांना सरकार मात्र शेतक-यांच्या विषयावर गंभीरतेने विचार करायला तयार नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांचा हा सोटा मोर्चा निघत आहे. या सोटा मोर्चात शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी, महिला तसेच नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन मानोरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमोल तरोडकर, शिवसेना(उबाठा) तालुका प्रमुख रवि पवार, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काशीराम राठोड यांनी केले आहे.
वाचन संस्कृती टिकवण्याकरिता सार्वजनिक ग्रंथालये महत्वाची केंद्रे -अशोक रामटेके
अकोला :
मानवी जीवनात वाचनाला महत्वाचे स्थान आहे. वाचणामुळे माणूस विचारी बनतो. त्याचे मन सुसंस्कृत होते, माणसाला ज्ञान प्राप्तीसाठी वाचन महत्वाचे आहे, त्याला माहिती ही विविध ग्रंथातून व लेखातून मिळत असते, माणसाला ज्या प्रमाणे भूक भागविण्याकरिता अन्नाची गरज असते, त्याचं प्रमाणे बौद्धिक भूक भागविण्याकरिता विविध ग्रंथांची गरज असते, वाचणामुळे माणसाला जीवनात येणाऱ्या संकटावर मात करण्याकरिता धैर्य प्राप्त होते.
माणसाचा जीवनात वाचनाला महत्व असूनही पाहिजे तेवढी वाचनाविषयीं आवड निर्माण झालेली नाही . कारण आज इंटरनेट, व्हाट्सअप, गुगल, फेसबुक, ई. चे प्रमाण वाढल्यामुळे वाचनाकडे वाचकांचा कल कमी झालेला आहे. तसेच इतरही काही कारणांमुळे जसे निरक्षरता कौटुंबिक वातावरण संगत गुण गरीबी या कारणामुळे आज वाचन संस्कृती मध्ये वाढ झालेली नाही.
घरात पालकांना जर वाचनाची आवड असेल तर ती सवय घरातील मुलांना लागते. व वाचन संस्कृती टिकून राहते ते मोठे पनी चांगले वाचक बनतात कुटुंबातील मोठ्यांचा वाचनाच्या सवयीचा परिणाम मुलांवर होतो. परंतु आजही बहुतांश घरामध्ये मुलांना वाचनाची आवड आई वडिलांकडून लावली जात नाही. त्यामुळे त्यांचा वाचनाकडे कल् कमी राहतो . आजच्या प्रगतीचा काळात ज्ञानचा आस्वाद घेता येण्या करिता ,समाजातील लोकांमध्ये बालकांमध्ये महिलांमध्ये वाचनाची सवय लावणे आवश्यक आहे. परंतु आज आपल्या समाजामध्ये प्रत्येक माणूस भौगोलिक सुखाच्या मागे लागला आहे . त्यामुळे त्याचे वाचणाकडे दुर्लक्ष झाले . त्यामुळे जिल्ह्यात राज्यात देशामध्ये रोज विविध क्षेत्रात काय घडत आहे, त्याची माहिती त्यांना होत नाही.
काही लोकांचे वाचन फक्त वर्तमान पत्रापुरतेच असते. घरामध्ये मोठ मोठे शोभेचे वस्तू मोठ्या किमतीने विकत घेतात. परंतु वाचनाकरिता एखादे पुस्तक, ग्रंथ विकत घेत नाहीत कारण त्यांना ग्रंथाविषयीं आवड नसते. जीवनामध्ये ज्या वस्तूला आपण मोठे किंवा वेगले स्थान देतो तसेच स्थान ग्रंथांना जीवनात दिले पाहिजे ते आपण देत् नाही. त्यामुळे ग्रंथाविषयीं त्यांचा मनामध्ये महत्वाचे स्थान नसते.
सार्वजनिक ग्रंथालयामुळे वाचक हा ग्रंथप्रेमी बनतो . लहानापासून ते मोठ्यापर्यंत ग्रंथांबद्दल प्रेम आणी वाचनाची आवड निर्माण हे सार्वजनिक ग्रंथालये करतात, मानवाला इतिहास कालीन वारसा हा ग्रंथामुळं मिळतो. ग्रंथ हे वाचकांना सुखाचा आनंद मिळवून देतात. वाचनाच्या माध्यमातून वाचकांची बौद्धिक जडणं घडणं करण्याचे सामर्थ्य सार्वजनिक ग्रंथालयामध्ये आहे. वाचन ही.सुजाण व्यक्तींची गरज असते ही गरज भागविण्याची जबाबदारी सार्वजनिक ग्रंथालये पार पाडीत असतात. म्हणजेच ते वाचन संस्कृती चा वारसा टिकून ठेवण्याचे कार्य करीत असतात आज ही आपल्या देशात निरक्षर नागरिक मोठ्या प्रमाणात आहे ही देशापुढील मोठी समस्या आहे . ती दूर करण्याकरिता सर्वजनिक ग्रंथालये मोलाची कार्य करीत असतात. नीरक्षितांना वाचते करून त्यांना अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी ज्ञानाची पानपोयी हे सार्वजनिक ग्रंथालय करीत असतात.
राज्यातील बहुसंख्या लोक हे ग्रामीण भागात राहत असले तरी आज ही अनेक ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक ग्रंथालये सुरु झालेली नाहीत. वास्तविक पाहता ग्रामीण भागातील जनतेला वाचनीय साहित्य उपलब्ध करून देणे. हे अधिक गरजेचे आहे . ज्यामुळे त्यांचा मध्ये वाचनाची आवड निर्माण होईल.राज्यातील ग्रामीण भागातील लोकांना. ज्ञानाची दारे उघडी करून देण्याचा कामात सार्वजनिक ग्रंथालय मोलाचे कार्य करित् आहे. ग्रंथ सहज पणे लोकांचा हाती विनाशुल्क पडले की त्यांचा मध्ये वाचनाची आवड निर्माण होईल . आजही देशामध्ये सार्वजनिक ग्रंथालये मोलाची सेवा देऊन माणसाला सुसंस्कृत बनविण्याचे कार्य करीत आहेत . त्यांना टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची आहे.
कारंजा तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड. निलेश कानकीरड तर उपाध्यक्षपदी ऍड.. ज्योती बाजड.
कारंजा-
कारंजा तालुका वकील संघाच्या 25 जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकी मध्ये एकमताने वकील संघाच्या कार्यकारिणीची निवड होऊन त्यामध्ये अध्यक्ष पदी ऍड. निलेश कानकीरड (पाटील )यांची तर उपाध्यक्षपदी ऍड.ज्योती बाजड यांची अविरोध निवड करण्यात आली.तसेच सचिव पदी ऍड. स्वप्नील वि.नायसे (सावजी ), कोषाध्यक्षपदी ऍड. राहुल जे बांडे तर कार्यकारिणी सदस्यपदी ऍड प्रीती नांदे यांची निवड करण्यात आली.
तालुका वकील संघाच्या नूतन कार्यकारिणी निवडणुकीच्या सम्पन्न झालेल्या बैठकीत ऍड. रवींद्र रामटेके यांनी केलेल्या सूचनेला माजी अध्यक्ष ऍड.सुभान खेतीवाले यांनी अनुमोदन दिले व सर्वानुमते कारंजा तालुका वकील संघाच्या नवीन कार्यकारिणीची अविरोध निवड करीत तालुका विधिज्ञ् मंडळाने आपला पायंडा कायम ठेवला यावेळी ऍड. अरुण खंडागळे ऍड विजय छल्लानी ऍड. डी जी. वाडेकर,ऍड. डी के. पिंजरकर ऍड आतिष चौधरी ऍड. निलेश बोरकर ऍड. खेतीवाले यांनी पुढील काळात निवड समितीने योग्य वाटचाल करून नवीन वर्षाच्या सदीच्छा दिल्या.यावेळी माजी अध्यक्ष यांनी आपला कार्यभार नूतन कार्यकारणींकडे सोपवीला तसेच उपस्थित सर्व वकील मंडळीकडून निवड मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आभार ऍड अनिल पवार यांनी मानले.
प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा दिना निमित्त,श्री कामक्षादेवी संस्थान येथे महाआरती आणि कारसेवक उमेश अनासाने यांचा भव्य सत्कार
कारंजा : प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा दिना निमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत असतांनाच स्थानिक श्री कामाक्षा देवी संस्थानचे अध्यक्ष दिगंबरपंत महाजन यांच्या मार्गदर्शनात, दि 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:00 वाजता,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या अध्यक्षतेखाली,आई कामाक्षा मित्र मंडळाचे सुरज गुल्हाने,श्री कामाक्षा देवी संस्थानचे रोहीत महाजन यांच्या उपस्थितीत,सन 1992 च्या कारसेवेतील श्रीराम भक्त कारसेवक उमेश अनासाने यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन,हारार्पण व महाआरती करण्यात आली. आरती नंतर भाजपाचे शहर अध्यक्ष ललित चांडक यांचेकडून भाविकांना बुंदीच्या लाडवाचा महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.त्यानंतर कारसेवक उमेश अनासाने यांचा शाल ,श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संजय कडोळे यांनी सांगितले, "प्रभू श्रीरामचंद्र हे विश्वातील आदर्श पुरुषोत्तम असून त्यांचे संस्थान अयोध्या जन्मभूमित होणे ही आमच्या पिढीकरीता गौरवाची व भाग्याची गोष्ट आहे. यावेळी गोंधळी दिनेश कडोळे, प्रतिक हांडे , विजय खंडार, सुरेश पांडे व शेकडो महिला पुरुष भाविकांची आवर्जून उपस्थिती होती असे वृत्त रोहीत महाजन यांनी कळवीले आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या