स्त्री शक्ती मंच संघटनेच्या पुढाकाराने आदिवासींना दिली जगण्याची उमेद !
कारंजा : दिपावली निमित्ताने मागील महिण्यात मेळघाट परिसरातील आदीवासींना कपडे, अन्नधान्य, मिष्टान्न दिल्या नंतर त्यांच्या निरागस चेहर्यावरील हास्य बघून उत्साही झालेल्या स्त्री शक्ती मंच संघटनेच्या पदाधिकारी आणि मैत्रिणी यांनी परत एकदा स्त्री मंच संघटनेच्या अध्यक्षा सौ शारदा अतुन भुयार यांच्या नेतृत्वात मैत्रीणी व दानशूराकडून मदत साहित्य गोळा करून, नुकतेच दुसऱ्यांदा मेळघाटातील दुर्गम भागात जाऊन गरीबांसाठी प्रेमाची भेट अंतर्गत प्रेमाची भेट म्हणून कपडे, स्वेटर ,शॉल , अन्नधान्य फराळाचे पदार्थ वाटप करण्यात आले. यावेळी स्त्री शक्ती मंच संघटनेच्या अध्यक्षा सौ शारदा अतुल भुयार यांचे सह धडाडीच्या कार्यकर्त्या सौ.भोरे ताई,सौ.वैशाली बन्नोरे, अँड सौ. मंगला नांगरे,सौ.वैशाली दीपक चौरे,सौ.स्नेहल पपीत कहाते,सौ. शुभांगी विवेक जैन, सौ. अनिता राऊत इत्यादी महिलांनी सहकार्य केले. तसेच परिसरातील कर्तव्यावर असलेल्या वनविभाग अधिकारी कर्मचारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.त्यामुळे हा उपक्रम अतिशय उत्तमरित्या पार पडला.
कार्यक्रमाला सेवाव्रती अखिलेश भुयार आणि गणेश चव्हाण यांची मदत मिळाली. असे वृत्त संस्थेच्या वतीने कळविण्यात आले.
0 टिप्पण्या