Ticker

6/recent/ticker-posts

संत तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संताजी जगनाडे महाराजांनी केले._डॉ अशोक ओळंबे

संत तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संताजी जगनाडे महाराजांनी केले._डॉ अशोक ओळंबे



अकोला _महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांचे रॅलीचे गांधी रोड जयप्रकाश नारायण चौक येथे भव्य स्वागत करण्यात आले. जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी रचलेल्या अभंगाची गाथा रामेश्वर भट्टानी इंद्रायणीत बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ती अभंगाची गाथा पुनर्लिखित केली. तुकाराम महाराजांचे वंशज गोपाळबाबा मोरे यांनी म्हंटले असल्याचे व  जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संत संताजी जगनाडे महाराजांनी केले असल्याचे प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा डॉ अशोक ओळंबे यांनी सांगीतले.


संताजी महाराजांनी ‘तेलसिंधु, ‘शंकरदीपिका’, ‘योगाची वाट’,‘निर्गुणाचा नावाचे ग्रंथ लिहिले. त्यांनी सिंधु या ग्रंथातून तेलाच्या व्यवसायाची माहिती दिलेली आहे. तेलाच्या व्यवसायातील अनेक रूपके, उपमा,अलंकार व चित्रण त्यांच्या अभंगातून झळकत असे संताजी जगनाडे महाराजांचे वारकरी समाजाप्रती व हिंदू समाजासाठी अफाट कार्य असून प्रेरणादायी असल्याचे डॉ ओळंबे यांनी सांगीतले.यावेळी डॉ राजेंद्र वानखडे,डॉ योगेश साहू गणेश पोलाखडे, गजानन बोराळे, बंडु नायसे,अमर भगत संतोष अबर्ते संजय चौधरी, सचिन बोरेकर, रामचंद्र धनभर,सचिन पाटील संतोष चाटी, गजनान गोलाईत,प्रभाकर वानखडे, सागर बनकर सूरेश पाटील सदानंद निकामे पाटिल,श्रीकांत एखंडे आशुतोष काटे,संजय लाडविकर यांचेसह ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या