Ticker

6/recent/ticker-posts

वसंत देसाई स्टेडियम येथे नमो चषक नोंदणी अभियाना

वसंत देसाई स्टेडियम येथे नमो चषक नोंदणी अभियाना


आज भाजप अकोलाच्या वतीने स्थानिक वसंत देसाई स्टेडियम येथे नमो चषक नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने आ. रणधीरभाऊ सावरकर उपस्थित होते.नमो चषकच्या माध्यमातून अकोला लोकसभा क्षेत्रामध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात येणार असुन अभियानाची नोंदणी २५ डिसेंबर ते १० जानेवारी पर्यंत करण्यात येणार असुन १२ जानेवारी ते २६ जानेवारी या काळामध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.


याप्रसंगी भाजप महानगराध्यक्ष जयंतराव मसने,माजी महापौर विजयजी अग्रवाल, महानगर सरचिटणीस ॲड. देवाशिष काकड, युवा मोर्चा अध्यक्ष पवन महल्ले,ॲड कुणाल शिंदे,अभिषेक भगत,हर्ष चौधरी, हेमंत सटवाले आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोर मागटे पाटील


अकोला भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोर मागटे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल तेजराव थोरात, अनुप धोत्रे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर प्रभारी जयंत डेहनकर वरिष्ठ पक्ष नेत्यांची चर्चा करून अकोट शहर भाजपा अध्यक्ष म्हणून व्यापारी व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत मन की बात कार्यक्रमाचे जिल्हा सहसंयोजक हरीश टावरी यांची निवड केली आहे. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस युवा मोर्चा व्यापारी आघाडी व विविध पदावर त्यांनी काम केले असून पक्षाने त्यांना शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली असून त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे शैक्षणिक धार्मिक राजकीय सामाजिक क्षेत्राशी त्यांचा संबंध आहे.

राजस्थानी समाजाच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष सदैव उभा


अकोला कर्नाटक मधील काँग्रेस सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार राजस्थानी समाजाविरुद्ध मोहीम खेळून त्यांना बेंगलोर कर्नाटक मधून राजस्थान मध्ये पाठवण्याची मोहीम सुरू केली असून द्वेष निर्माण करण्याचा काम केला असून राजस्थानी समाजाचा देश निर्माण योगदान पाहता उद्योग जगतात व विविध सामाजिक कार्यामध्ये राजस्थानी समाजाची योगदान पाहता अशा प्रकारचा कार्यक्रम सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून याविषयी सुप्रिया सुळे गट व उद्धव ठाकरे सेना गप्प का एकीकडे कर्नाटकामध्ये राजस्थानी समाज तर तामिळनाडूमध्ये उत्तर प्रदेश बिहार मधील नागरिकाविषयी द्वेष निर्माण करून देशांमध्ये अराजकता निर्माण करण्याचा जाती-जातीमध्ये भेद पाळण्याचा प्रकार काँग्रेस व त्यांचे सहकारी पक्ष करत असून या प्रकाराचा जाहीर निषेध करून भारतीय जनता पक्ष व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार व देशाचे गृहमंत्री अमित शहा दखल घेऊन हा प्रकार सहन केल्या जाणार नाही असा इशारा भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी दिला आहे. राजस्थानी मारवाडी समाज धार्मिक सामाजिक आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राहून उद्योग क्षेत्रामध्ये भरारी केली आहे ‌ समाजाला दिशा देण्याचे काम करते त्या समाजाविषयी केवळ भाजपाला पाठिंबा दिला यामुळे असा प्रकार करण्याचा प्रयत्न होत असेल तर हा प्रकार विशेष निंदनीय असून याविषयी भाजपा या काँग्रेसच्या विरोधात व त्यांच्या सहकारी पक्षाच्या विरोधात आवाज बुलंद करेल व राजस्थानी समाजाच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष उभा राहील अशी ग्वाही आमदार रणधीर सावरकरांनी यांनी दिली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या