कारंजा तालुक्याच्या तिर्थक्षेत्र विकासाकरीता सत्ताधारी तर सोडाचं, परंतु विरोधी पक्षही पुढे येत नसल्याची खंत. - संजय कडोळे
कारंजा : कारंजा तालुका नैसर्गीक सौंदर्याने नटलेला असून तालुक्यातून वाहणाऱ्या नद्या इतर जिल्ह्यातील भूमीला सुजलाम् सुफलाम् करीत आहेत. त्याशिवाय कारंजा तालुका, दत्त उपासकांच्या जगप्रसिध्द श्री नृसिह सरस्वती स्वामी महाराजाचे अ वर्मातील तिर्थस्थळ असलेला आणि जैनधर्मियांची पवित्र तिर्थस्थळे असणारा, आजुबाजूच्या चारही जिल्ह्यांना जोडणारा,सुप्रसिद्ध बाजारपेठेचा तालुका असल्यामुळे येथे सातत्याने दत्तउपासक,वारकरी, जैनअनुयायी यात्रेकरू व पर्यटकाचीही सातत्याने वर्दळ असते.त्यामुळे अशा सर्वगुणसंपन्न तालुक्याचा विकास होणे ही वर्तमान काळाची गरज आहे.
मात्र हा विकास साधण्याकरीता महाराष्ट्र शासनाने कारंजा नगरीला तिर्थक्षेत्र जाहीर करून येथील विकासाकरीता शासन स्तरावर तिर्थक्षेत्र आराखडा तयार करायला हवा आहे. त्यासोबतच येथील गुणवंत विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची सुविधा व्हावी. या दृष्टिने उच्च महाविद्यालये आणि येथील कामगार, मजूर, सुशिक्षीत बेरोजगारांच्या उदरनिर्वाहाकरीता त्यांच्या रोजगाराच्या दृष्टीने येथे औद्योगीक वसाहत स्थापन करणे अत्यावश्यक आहे.तसेच कारंजा तालुक्यात, वन विभागाचे "सोहळ काळवीट अभयारण्य"असून हे पर्यटकाकरीता खुले होणे जरुरीचे आहे. सोहळ काळवीट अभयारण्य पर्यटक प्रेक्षकांकरीता खुले झाले तर साहजीकच आजुबाजूच्या खेडेगावातील नागरीकांना लघु व्यवसाय सुरु करता येऊ शकतील.ज्यामुळे त्यांच्या विकासाला चालना मिळू शकते. त्यादृष्टीने समाजसेवक संजय कडोळे यांनी विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाकडून,गेल्या दि. 08 डिसेंबर 2023 रोजी सन्माननिय तहसिलदार साहेबांमार्फत शासनाला माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठीया यांचे नेतृत्वात निवेदन दिले आहे. यावेळी निवेदन देतेवेळी माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया, कर्तव्यतत्पर नगरसेवक प्रसन्न पळसकर,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक संजय कडोळे, धडाडीचे युवा कार्यकर्ते राजिक शेख,ज्येष्ठ समाजसेवी प्रदिप वानखडे, सेवानिवृत्त प्राचार्य माणिकराव नागरे, रुग्नसेवाव्रती श्यामभाऊ सवाई, विनायकराव पद्मगीरवार, डॉ.गजानन गावंडे,रोहीत महाजन,यशवंत पद्मगीरवार, रोमील लाठीया, उमेश अनासाने, शाहीर देवमन मोरे,माणिकराव हांडे, युवा समाजसेवी अश्विन जगताप, शांतता समितीचे महादेवराव ठोंबरे,महिला समाजसेवीका सौ.कृपाताई ठाकरे,अँड.सौ. मंगलाताई नागरे,सौ. छायाताई गावंडे, सौ. वंदनाताई ठोंबरे, सौ .शारदाताई भुयार,सौ.मोनाली गणवीर,पत्रकार विनोद गणवीर,वाल्मिक समाज नेते श्यामभाऊ घारु,रामेश्वर डेंडूळे, कैलास हांडे,रमेश ढेणवाल, आनंद सारवण,संजय गोहर, भगवान संदेले, संतोष गोहर, आनंद राजोरीया,महेश अहेरवार, दाऊद मुन्नीवाले इत्यादी उपस्थित होते. समाजसेवक संजय कडोळे यांची ही मागणी कोणत्याही राजकिय स्वार्थाने प्रेरीत नसून, केवळ आणि केवळ जन्मभूमी कारंजा नगरीच्या आणि तालुक्याच्या विकासाकरीता आणि कारंजेकराच्या मुलाबाळांच्या भवितव्याकरीता आहे.त्यामुळे त्यांच्या ह्या मागणीला लोकप्रतिनिधी, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कार्यकर्त्याचा पाठींबा मिळणे आवश्यक आहे.परंतु कुणीही, कारंजा नगरीचा तिर्थक्षेत्र विकास आराखड्याची मागणीची आवश्यक आहे. हे अद्यापही लक्षात घेऊ नये. या विषयावर भाष्य करू नये.याची खंत असल्याचे दुःख समाजसेवक संजय कडोळे यांनी प्रगट केले आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या