Ticker

6/recent/ticker-posts

तळागाळातील सामाजिक कार्यकर्ते आणि लोककलाकार यांना पुरस्कारीत करणारा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सोहळा केव्हा होणार ?

"तळागाळातील सामाजिक कार्यकर्ते आणि लोककलाकार यांना पुरस्कारीत करणारा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सोहळा केव्हा होणार ?"


 सामाजिक न्याय विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या योजना सर्वसामान्य लोककलावंत आणि समाजसेवकांना मिळाव्या याबाबत महाराष्ट्रातील आमदारांचे अधिवेशनात मौन्य का ? 


 वाशिम : सांस्कृतिक विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची शासनाद्वारे गेल्या पाच वर्षापासून अंमलबजावणीच हातांना दिसत नाही.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या लोककलाकार आणि समाजसेवकांकडून वेळोवेळी मागणी होत असतांना, कलावंताची ठिकठिकाणी आंदोलने होत असतांनाही, शासकिय कार्यक्रमाची जनजागृती करणाऱ्या लोककलाकारांची, शासनाकडून दखल घेऊन योग्य निर्णयाची कार्यवाही होतांना मात्र दिसत नाही. किंवा महाराष्ट्रातील कोणतेच आमदार लक्ष्यवेधी मांडताना दिसत नाहीत.हे महाराष्ट्रातील लोककलाकार आणि सच्च्या समाजसेवकांचे दुदैवाने शल्य आहे.वेगाने वाढणारी प्रचंड महागाई असतांनाही सांस्कृतिक विभागामार्फत मिळणारे, लोककलावंताचे तुटपुंजे मानधन वाढविण्याची मागणी एकाही आमदाराकडून विधानसभेत होतांना दिसत नाही.किंवा अधिवेशनात प्रस्ताव येत नाही. तसेच गेल्या पाच वर्षापासून ,सच्च्चा सामाजिक कार्यकर्त्यांचा गुणगौरव आणि त्यांना पुढील समाजकार्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने, महापुरुषांच्या स्मृतीप्रित्यर्थ,महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून दिल्या जाणारे,राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार,संत रविदास पुरस्कार,साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार,कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार इत्यादी पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम आणि राज्यस्तरिय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन,सामाजिक कार्यकर्ता संमेलन शासनाकडून गेल्या पाच वर्षापासून प्रलंबीत ठेवण्यात आलेली आहेत.शासनाचे विविध महामंडळ,शासकिय निमशासकिय समित्यांची गेल्या पाच वर्षात पुनर्रचना नाही.आणि यातही महत्वाचे म्हणजे या विषयावर विरोधी पक्षाचे आमदार विधानसभेत अजिबातच आवाज उचलत नाहीत.तर सत्ताधारी आमदार आणि मंत्रीमंडळ निर्णय घेतांना दिसत नसल्याची सध्या महाराष्ट्रात वस्तुस्थिती असल्याचा स्पष्ट घणाघात,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष तथा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी पत्रकारांकडे दिलेल्या निवेदनात केला आहे. तरी महाराष्ट्रातील आमदार आतातरी,यावर विचार करून सार्वत्रिक निवडणूकांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते आणि लोककलाकाराच्या सन्मानार्थ, शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडणार काय ? हे बघावे लागेल.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या