आम्हाला शिवबा, ज्योतिबा आणि बाबासाहेबांच्या विचारांची सत्ता आणायची आहे- ऐड.बाळासाहेब आंबडेकर
अकोला
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुजोर व उन्माद असलेली सत्ता उलथवून टाकली व रयतेचे स्वराज निर्माण केले. ज्यामध्ये शेतकऱ्यांना, स्त्रियांना व वंचितांना स्वाभिमानाचे जीवन मिळाले होते. वर्तमानातील प्रस्थापित राजकारण्यांना शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांची सत्ता घालवून स्वतःची स्वार्थी व भांडवलदारी सत्ता निर्माण करायची आहे.
ऐड. प्रकाश आंबेडकर
सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे👆 स्पर्श करा
आम्ही याचा जोरदार विरोध करू , संघर्ष करू, आणि त्यासाठी मोठा लढा उभा करू व आम्ही शिवबा ज्योतिबा आणि बाबासाहेबांच्या विचारांची सत्ता पुन्हा प्रस्थापित करू आणि या कल्याणकारी राजकीय सत्तेचे आम्ही विश्वस्थ म्हणून काम करू असे प्रतिपादन बाळासाहेब आंबेडकर यांनी आज केले. ते आज अकोला येथे ओ बी सी संवाद बैठकीत बोलत होते . या वेळी प्रा अंजलीताई आंबेडकर व युवा नेते
सुजातदादा आंबेडकर यांनी समयोचित भाषण केले. बैठकीची प्रस्तावना प्रदीप वानखडे यांनी तर सूत्र संचालन ज्ञानेश्वर सुलताने व आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष प्रमोद
देंडवे यांनी केले. या बैठकीला मोठ्या प्रमाणात ओ बी सी युवक, महिला आणि बांधव उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या