Ticker

6/recent/ticker-posts

सर्पमित्र मुन्ना श्रीवासने दिले दहा फुटाच्या रॉक्स इंडियन पायथॉन नावाच्या अजगराला जीवनदान

सर्पमित्र मुन्ना श्रीवासने दिले दहा फुटाच्या रॉक्स इंडियन पायथॉन नावाच्या अजगराला जीवनदान


सापांना जीवनदान देणारे सर्पमित्र अजूनही उपेक्षितच .. का?- अखिल भटकर मुरंबा


अकोला प्रतिनिधी: संतोष माने

मुर्तीजापूर तालुक्यातील मुरंबा ग्रामपंचायत हद्दीतील तुरखेड शिवारातील गजानन ठाकरे यांच्या शेतातील कपासीच्या पिकात 10 फूट अजगर आढळल्याने घबराट निर्माण झाली होती.लगेच शेतकऱ्यांनी डॉक्टरांना भ्रमणध्वनी केला असता,डॉ. बनारसे यांनी सर्पमित्र मूर्तिजापूर चे मुन्ना श्रीवास यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क केला. सर्पमित्राने तात्काळ भेटेल त्या वाहनाने घटनास्थळी जाऊन शिताफिने अजगराला पकडले.व त्यांनी रीतसर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले पकडलेला अजगर वनविभाग अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करून वन विभागाच्या जंगलात सोडून जीवदान दिले.याबद्दल ग्रामपंचायत मुरंबाचे अखिल भटकर व नागरिकांनी सर्पमित्राचे आभार व्यक्त केले.


-----------------------------------------------------
समाजासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून सर्पमित्रांची ओळख आहे.मात्र हा घटकच वनविभागाने दुर्लक्षित केल्याने भविष्यात सर्प मित्रांच्या उपजीविकेचा प्रश्न तर उद्भवणार नाही ना,असा सवाल देखील आता उपस्थित होत आहे.गेल्या 15 ते 20 वर्षांपासून सर्पमित्र म्हणून कार्यरत आहे. वनविभागाकडून कुठल्याही प्रकारचे मानधन मिळत नसून कुठलाही विमा शासनाने काढला नसल्याची खंत आहे.वनविभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे*

- मुन्ना श्रीवास, सर्पमित्र मुर्तीजापुर


-----------------------------------------------------
सर्पमित्र आणि सापाचे अनोखे नाते आहेत.सर्पमित्र लोकवस्ती व शेतात सापडलेल्या सापांना सुरक्षित नैसर्गिक वातावरणात सोडून जीवदान देतात.त्यामुळे जेव्हा साप आढळून येतो. तेव्हा सर्पमित्राला आवर्जून बोलाविल्या जाते.पण सर्पमित्र नेहमीच दुर्लक्षित.. वास्तविक वन्यजीव संवर्धनाची जबाबदारी वन विभागाची असते.परंतु सापांच्या संरक्षणाच्या बाबतीत हा विभाग पूर्णतः उदासीन दिसून येतो. तालुक्यातील सर्पमित्र मात्र प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून हे साप पकडत आहेत.पकडलेल्या सापांना कुठल्याही प्रकारची इजा न होऊ देता. त्या सापांना सुरक्षित स्थळी सोडले जाते.कोणताही मोबदला न घेता सापांच्या प्रती असलेल्या प्रेमापोटी ही मंडळी रात्र दिवस साप वाचविण्याचे काम करत असतात.वन्यजीव संवर्धनावर करोडो रुपये खर्च करणारे सरकार मात्र या सर्पमित्रांना दुर्लक्षितच ठेवत आहे. कोणतेही ठोस पाऊल न उचलता अनेक सर्पमित्रांना साप पकडण्याचा अधिकृत परवाना दिला जातो. मात्र त्यासाठी लागणारी कुठलीही सुरक्षा साधने पुरविली जात नाहीत. ना कुठला विमा न कुठले मानधन अशा परिस्थितीत देखील हे सर्पमित्र निस्वार्थी भावनेने सापांना वाचविण्याचे काम करत आहेत.सर्पमित्रांना शासकीय मदतीची गरज आहे.
- अखिल भटकर,मुरंबा ग्रामपंचायत


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या