पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घातले राजेश्वराला साकडे
अकोला ग्रामदेवता राजराजेश्वर परिसराचा विकास करण्यासाठी तसेच राज राजेश्वराची कृपा अकोलेकरांवर कायम राहावी व पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्रात भाजपा नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार येऊ दे असे साकडे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी घातले अकोला जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच आगमन झाल्यावर ग्रामदेवता राजराजेश्वरला त्यांनी नमन केले व विशेष पूजा अर्चना केली यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर राज राजेश्वर परिसर पर्यटक स्थळ घोषित करण्याची मागणी केली होती याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती त्याचा पाठपुरावा करण्याची हमी नामदार विखे पाटील यांनी घेतली व भक्तांना अभिप्रेत कार्य करू असे अभिवचन दिले.
यावेळी किशोर पाटील आमदार वसंत खंडेलवाल जयतमसने विजय अग्रवाल माधव मानकर सजयगोटफोडे उपस्थित होते. यावेळी महेश कापडी पुजारी यांनी विशेष पूजा अर्चना केली यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले आतिषबाजीने नवरात्राच्या पर्वावर त्यांचे पालकमंत्र्यांचे स्वागत भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी केले नामदार विखे पाटील यांनी विकास व कामाचा आढावा घेतला तर अधिकाऱ्यांना या संदर्भात प्रस्ताव तयार करण्याची निर्देश दिले यावेळी संस्थेची गजानन घोंगे एडवोकेट गिरीश देशपांडे चंद्रकांत सावजी लोहाया,भौरदकर आधी उपस्थित होते त्यांनी अनेक भक्तांच्या संदर्भातला अडीअडचणी व संस्थेला अभिप्रेत कार्य माहिती दिली व आमदार सावरकर यांच्या क्रियाशील बद्दल संस्थेच्या वतीने व भक्तांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
0 टिप्पण्या