Ticker

6/recent/ticker-posts

मी पाहिलेले 'साधी राहणी-उच्च विचारसरनी' ठेवून मैत्री जपणारे पहिलेच एकमेव आमदार भाऊसाहेब अँड.किरणराव सरनाईक  

मी पाहिलेले 'साधी राहणी-उच्च विचारसरनी' ठेवून मैत्री जपणारे पहिलेच एकमेव आमदार भाऊसाहेब अँड.किरणराव सरनाईक                    


 लेखक : नंदकिशोर कव्हळकर.        
सदस्य,अ.भा.मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा नियामक मंडळ मुंबई                  
लोककलावंताच्या न्याय्य हक्का करीता लढणाऱ्या,आमच्या जिल्ह्यातील एकमेव संघटना म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या कारंजा येथील,विदर्भ लोककलावंत संघटनेचा,भव्य असा कलावंत मेळावा आम्हाला कारंजा येथे घेऊन,कलावंताच्या कार्याला मानाचा मुजरा करावयाचा होता.त्यामुळे माझे मित्र संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी व मित्रमंडळी पांडूरंग माने,मोहित जोहरापूरकर,सुभाष पाटील गाडगे,अतुल धाकतोड,रविन्द्र नंदाने, रोहित महाजन,उमेश अनासाने,प्रदिप वानखडे,डॉ. ज्ञानेश्वर गरड,आय के परमार,डॉ. इम्तियाज लुलानिया,रोमिल लाठीया आदींनी,दि.14 सप्टेंबर 2021 रोजी माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून,श्री.कामाक्षा देवी संस्थान सभागृह कारंजा येथे हा कार्यक्रम साजरा करण्याचा बेत आखलेला होता.ते दिवस आजच्या दिवसा सारखे सामान्य मुळीच नव्हते.तर त्यावेळी कोव्हिड 19 कोरोना प्रकोपामुळे,सर्वत्र मास्क सक्ती, संचार बंदी सदृश्य परिस्थिती आणि मुख्य म्हणजे सर्वच धार्मिक स्थळे,मंदिरे,देवालयांची प्रवेश द्वारे विशेषत: बंदच होती. परंतु ह्या अशा बिकट परिस्थिती मध्ये पहिली गोष्ट म्हणजे कार्यक्रमाला स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी मिळवीणे. आणि दुसरं म्हणजे अमरावती विधानपरिषद मतदार संघाचे  भाऊसाहेब,अँड किरणराव सरनाईक यांचा कार्यक्रमाला होकार मिळवीणे.परंतु ती सर्वच जबाबदारी माझे मित्र संजय कडोळे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली.तत्कालिन तहसिलदार धिरजजी मांजरे आणि नायब तहसिलदार विनोद हरणे यांना आपल्या शिस्तबद्ध  कार्यक्रमाची माहिती देवून त्यांची अनुमती मिळवीली.


त्यावेळी नव्यानेच कारंजा शहर पोलीस स्टेशनला आलेले पोलीस निरिक्षक आधारसिह सोनोने यांनी आधी परवानगी नाकारली.परंतु अखेर ती मिळविण्यात संजय कडोळे यशस्वी झालेत.प्रवेशद्वार बंद करूनच सभागृहात कार्यक्रम घेण्याचे ठरले.मग संजय कडोळे यांनी शिक्षक आमदार अँड किरणराव सरनाईक यांचेशी भ्रमणध्वनीवरूनच संवाद साधत, तुम्हाला विदर्भ लोककलावंत मेळाव्याला यायचे असल्याचे कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.मला तर आमदार अँड किरणराव निमंत्रण स्विकारतील याची शंकाच होती.परंतु आमदारांनी लगेच होकार देवून आम्हाला आनंदाचा धक्काच दिला.आणि मेळाव्याचे उद्घाटक लाडके शिक्षक आमदार अँड मा.श्री.भाऊसाहेब किरणराव सरनाईक,कार्यक्रमाचे अध्यक्ष : मराठा सेवा संघ प्रणित संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष हभप श्री. श्रीकृष्ण पाटील राऊत,प्रमुख पाहूणे दैनिक मातृभूमिचे वाशीम आवृत्ती संपादक मा.श्री निलेश सोमाणी.जि.प.चे माजी समाज कल्याण सभापती मा.श्री. जयकिसनभाऊ राठोड,माजी नगराध्यक्ष मा.श्री.दत्तराज डहाके, माजी जि.प.उपाध्यक्ष मा. श्री.देवेन्द्र पाटील ताथोड,शिवसेना शहर प्रमुख मा. श्री.गणेशजी बाबरे,नाट्य परिषद शाखाध्यक्षा मा.श्रीमती सुधाताई चवरे व कार्यक्रम सत्कारमूर्ती म्हणून माझ्या नंदकिशोर कव्हळकर यांच्या उपस्थितीत,विदर्भ लोककलावंत संघटनेचा,कोरोना काळातील 'न भुतो न भविष्यती' अशा प्रकारचा हा मेळावा पार पडला.या मेळाव्याचे साक्षीदार माझे मित्र पत्रकार निलेश सोमाणी, हभप. लोमेश पाटील चौधरी,समिर देशपांडे,अमोल अघम,सुनिल फुलारी,एकनाथ पवार,आरिफभाई पोपटे,मोहम्मद मुन्निवाले इत्यादी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. मेळाव्याचे आकर्षण पंचक्रोशीतील विविध रंगभूषेतील लोककलावंत आणि महिला पुरुष वारकरी भजनी मंडळ सहभागी झाले होते.सदर मेळाव्याचे सुत्रसंचालन,स्वतः महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त असलेले अध्यक्ष संजय कडोळे (पत्रकार) यांनी केले होते.विशेष म्हणजे वारकरी मंडळीनी अँड किरणराव यांना,कोरोना प्रतिबंधाची पर्वा न करता,वारकरी भजनाच्या तालावर वाजत गाजतच, व्यासपिठावर आणले व मेळावा पार पडला.जेव्हा आ.अँड किरणराव यांना माझा वाढदिवस असल्याची गोपनिय माहिती मिळाली तेव्हा मात्र त्यांनी, मित्रमंडळी यांना वाढदिवसाचा केक आणण्याचे सुचवीले.व लगेच पि.ए.यांना सांगून,स्वतःचे गाडीतून शाल,श्रीफळ मागवून,अमरावती विभागीय शिक्षक संघटनेकडून माझा सत्कार केला.त्यावेळी माझ्या सन्मानिय मातोश्री गं.भा. सरस्वताबाई अंबादास कव्हळकर ह्या हयात होत्या.त्यांना,माझ्या अर्ध्यांगीनी सौ.आशा कव्हळकर, कव्हळकर घराण्याचे दिपस्तंभ चि.उदय कव्हळकर,चि.सूरज कव्हळकर यांना व्यासपिठावर बोलवून सर्वांशी प्रेमाने संवाद साधला.सर्वांची विचारपूसही केली.हा मेळाव्याचा  कोरोना प्रतिबंधामुळे एका तासात आटोपणारा कार्यक्रम संपूर्ण दिवसभर चालला.आमच्या कार्यक्रमा करीता,आमदार महोदयांनी त्यांचा पुढील अमरावती दौराच रद्द केला.तेव्हापासून ते प्रत्येक वेळी माझेशी संवाद साधू लागले.वेळोवेळी आमची व आमच्या परिवाराची चौकशी करू लागले.त्यामुळे केव्हा केव्हा तर असे वाटते,अगदी साधी राहणी- उच्च विचार सरणी ठेवून,सर्वाशी मिळून वागणारी ही व्यक्ती कुणी राजकारणी,कुणी व्ही.आय.पी., कुणी आमदार वगैरे नसून, स्वर्गातून पृथ्वीवर अवतरलेला देव माणूसच असावा एवढे मात्र निश्चितच . . !


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या