अमरावती विभागाचे लाडके अपक्ष असलेले,शिक्षक आमदार अँड. किरणराव सरनाईक यांनी मंत्रीमंडळात स्थान मिळायला हवे -संजय कडोळे.
कारंजा (लाड) : अमरावती विभागातील,अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष, शिक्षकांच्या प्रश्नाची जाण असणारे,शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गंभिर असणारे,भटक्या विमुक्तांचे आणि वाशिम जिल्ह्याच्या विकासाची सर्वांगीण जाण ठेवणारे,वाशिम जिल्हा रुग्नालयाला संत श्री सेवालाल महाराजांचे नाव मिळाले पाहीजे याची लक्ष्यवेधी विधान परिषदेत मांडून, विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशन गाजविणारे,पहिले आमदार ऍड.किरणराव सरनाईक हे मुख्यतः जिल्ह्यातील तळागाळातील आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे जिल्ह्यातील एकमेव असेच नेतृत्व आहे. त्यांना संपूर्ण विभागातील नागरीकांशी संवाद साधणारे नेतृत्व म्हणूनही ओळखले जाते. जनमाणसांना आपलेसे करून घेण्याचा त्यांना चाळीस वर्षाचा दांडगा अनुभव,त्यांचा दांडगा अभ्यास आहे.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नामांकित व ज्येष्ठ विधीज्ञ म्हणूनही ते ओळखले जातात.आणि म्हणूनच अशा आदर्श मराठी नेतृत्वाला ,महाराष्ट्र शासनात शिक्षण मंत्री म्हणून काम करण्याची संधी जर मिळाली तर त्यांच्या अभ्यासू अनुभवाचा निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी,शिक्षक आणि शाळा महाविद्यालयांना फार मोठा लाभ मिळू शकतो. त्यामुळे एकदा भाऊसाहेब अँड. किरणराव सरनाईक यांना अशी संधी मिळायलाच हवी असे मत,त्यांचे चाहते लोककलावंत तथा ज्येष्ठ पत्रकार विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाकडे व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या