शेतकरी पुत्राची आत्महत्या : समाजमन सुन्न
बस स्टॉप जवळ निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट
मुर्तीजापुर प्रतिनिधी: संतोष माने
मुर्तीजापुर:तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीतील जामठी बीट सर्कलमधील वाईमाना येथील विकास विलास बरडे (वय अंदाजे २३) या शेतकरी पुत्र युवकाने आज (गुरुवार) 21 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास वाई-माना बस स्टॉप जवळील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे.सध्या खरीप हंगाम संपत आला असून, निसर्गाच्या अवकृपेचा लहरीपणा सुरूच आहे.आता हातातोंडाशी आलेला शेतातील पिकांचा घासावर रोगराईचे सावट सुरु आहेच. सध्या शेतकरी हतबल अशा मनपरिस्थितीतून जात आहे. त्यामध्ये वाई माना येथील शेतकरी कुटुंबात समाजमन सुन्न करणारी दुर्देवी घटना घडली. विकास यांचे वडील विलास विनायक बरडे यांचे नावे मौजे वाई-माना येथे 2 एक्कर शेती आहे.विकासने आत्महत्या का केली. याचे कारण नकळत असल्याने कोणत्या द्विदा मनस्थितीत मृतक सापडल्याने आत्महत्या केली असावी हा पेच निर्माण झाला आहे..घटनास्थळी जामठी बीटचे पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश पिंजरकर संदीप सरोदे हे पोहचून तपास व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात मुर्तीजापूर येथे रवाना करण्यात आले. विकास असा अचानक जाण्याने समाजमन सुन्न झाले आहे. विकासच्या मागे आई-वडील एक भाऊ आणि मोठा परिवार आहे. या प्रकरणी मृतकाचा मोठा भाऊ आकाश विलास बरडे रा.वाई माना यांनी माना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 174 सीआरपीसीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश पिंजरकर संदीप सरोदे करीत आहे.
0 टिप्पण्या