Ticker

6/recent/ticker-posts

किसान समृद्धी सेवा केंद्र अकोल्यात सुरू 

किसान समृद्धी सेवा केंद्र अकोल्यात सुरू 


अकोला
आंतरराष्ट्रीय नेते व देशाची यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा उत्पादनाला डबल भाव मिळून देण्याचा अभिवचन दिला असून त्या दिशेने केंद्र सरकार प्रयत्नशील असून शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक योजना सुरू करून शेतकऱ्याचा आर्थिक बचत सोबत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही शेतकऱ्यांचा सन्मान राहील व एका ठिकाणी सर्व वस्तू मिळावी यासाठी देशभरात तसेच अकोला जिल्ह्यात 155 कृषी केंद्र मध्ये किसान समृद्धी सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेऊन हे सरकार सर्वसामान्यांचा सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयासाने महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले गोवर्धन शर्मा यांनी आज माणेक टॉकीज समोरील नेहा सागर इंटरप्राईजेस कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची संवाद साधताना ते बोलत होते.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजेंद्र गिरी हे होते तर हरीश आलीमचदाणी, संतोष पांडे हरिभाऊ काळे, मनोज शाहू, रमेश करिअर कृष्णा शर्मा, कैलास रण पिसे, राजू गोंदेकर, अजय पांडे विकी ठाकूर, विनोद सिंग ठाकूर कृष्णा पांडे, प्रवीण मानकर आधी प्रामुख्याने उपस्थित होते.
पक्ष व राष्ट्र तसेच समाजासाठी सदैव तत्पर राहणारे आमदार गोवर्धन शर्मा यांनी शेतकऱ्यांची व नागरिकांची संवाद साधला आपली प्रकृती बरी नसतानासुद्धा पक्षाचे आदेश व पक्षाप्रती असलेले प्रेम जबाबदारी या नात्याने तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देश सुजलाम सुफलाम करण्याचा संकल्प समर्थन देण्यासाठी आज उपस्थित राहून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनेची माहिती दिली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या