Ticker

6/recent/ticker-posts

खारघर प्रकरणातील पुढील सुनावण १ जुलैला, आम आदमी पार्टीच्या तक्रारची दखल

खारघर प्रकरणातील पुढील सुनावण १ जुलैला, आम आदमी पार्टीच्या तक्रारची दखल


खारघर उष्माघात मृत्यू प्रकरणी गुन्हा देखील दाखल न केल्या बद्दल आम आदमी पार्टी महाराष्ट्र तर्फे दाखल केलेल्या केसची १६ जुन, २०२३ रोजी पनवेल कोर्टात युक्तिवाद करण्यात आला पुढील दिनांक १ जुलै, २०२३ रोजी आदेश देण्यात येणार असल्याचे केले जाहीर.



१६ एप्रिल, २०२३ रोजी, खारघर येथे झालेल्या, पदमश्री श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या, शासकीय सोहळा कार्यक्रमात १४ श्री सदस्यांचा उष्माघात / चेंगराचेंगरी मुळे मृत्यू, तसेच अनेकजण जखमी आणि आजारी पडण्याचा अनर्थ झाला. ह्या दुर्घटनेबाबद १८ एप्रिल, २०२३ रोजी, सोहळ्याच्या आयोजकानावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार आप महाराष्ट्र तर्फे खारघर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली. या संदर्भात खारघर पोलीस स्टेशनला स्मरणपत्रे देऊन सुद्धा, खारघर पोलिसाकडून काहीच कृती न झाल्याने, आप महाराष्ट्र तर्फे २४ एप्रिल ला नवी मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून लेखी स्मरणपत्र दाखल केले. पण त्यानंतरही काहीच कृती न झाल्याने, आप महाराष्ट्र ला नाईलाजास्तव पनवेल कोर्टात धाव घ्यावी लागली. हि केस पनवेल कोर्टात दाखल झाली असून, बुधवार ३ मे, २०२३ रोजी व त्यानंतर २६ मे रोजी सुनावणी झाली. ह्या दुर्देवी घटनेबाबद, ठोस कृती न करता, राज्य सरकार एक सदस्यीय कमिटी नेमणे वैगेरे वेळकाढू उपाय अवलंबित आहे. ह्यावरून, सरकार हि दुःखदायक घटना विशष गांभीर्याने घेत नाही हे स्पष्ट होत आहे.


आम आदमी पार्टी महाराष्ट्रच्या वतीने, राज्याचे नेते मा. धनंजय रामकृष्ण शिंदे ह्यांनी तक्रार दाखल केली असून, मुख्य सचिव, सांस्कृतिक विभाग, खारघर पोलीस ठाणे, परिमंडल - २ पनवेल, तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त ह्यांना प्रतिसादक करण्यात आले आहे. अर्जातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे. 
१. देशाचे गृहमंत्री, महाराष्ट्र मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री उपस्थित असलेल्या ह्या कार्यक्रमाला सरकारी तिजोरीतून अंदाजे १३ कोटींचा खर्च दाखविण्यात आला आहे.
२. हवामान खात्या तर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत, ४३ अंश कडक उन्हात लाखो लोकांना ह्या सोहळ्यासाठी बसविण्यात आले. हा सोहळा, केवळ राजकीय फायद्यासाठी, अत्यंत बेजबाबदारपणे, पेंडॉल, प्रथमउपचार आणी पिण्याच्या पाण्याच्या सोयी शिवाय आयोजित करण्यात आला.
३. सरकार तर्फे, मृतांचा आकडा लपवून जबाबदारी झटकण्यासाठी असंवेदनशील विधाने करण्यात आली. मृतांचे पोस्टमॉर्टेम करण्यात सुध्दा हलगर्जी करण्यात आली. 

आम आदमी पार्टी तर्फे पुढील मागण्या करण्यात येत आहेत :
१. या गुन्ह्या संदभात प्रतिसादकानवर तक्रार व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम १५६, १५६ (३) व एकत्रित वाचन कलम १९०, कलम २०० नुसार व भारतीय दंड संहिता १८६० कलम ३०४, ३०८, ३३६, ३३७, ३३८, ११४ नुसार मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आणी इतर गुन्हे दाखल करण्यात यावे.

२. कलम १५६ (३) फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार, न्यायालयाने सदर दुर्घटना गम्भीरपणे घेऊन, पोलिसांना सखोल चौकशी अहवाल न्यालयात दाखल करण्याचे आदेश द्यावेत.

३. मृत्युमुखी पडलेल्या १४ श्री सदस्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी रु. १ कोटी नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच जखमींना रु. १० लाख इतकी नुकसान भरपाई देण्यात यावी. 


ह्या कोर्ट केस साठी, आम महाराष्ट्रची लीगल टीम, ऍड जयसिंग शेरे, ऍड सुवर्णा जोशी हे वरिष्ठ वकील मा. ऍड असीम सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. या संदर्भात पनवेल कोर्टात युक्तिवाद करण्यात आला व काही जजंमेंट देण्यात आला व जज साहेब सुशिला यांनी काही प्रश्न उपस्तित केला मुंबई हायकोर्टे दाखल केलेली पीएलआय चे सध्याचे अहवाल काय आहेत. व एक सदस्यीय समितीचे अहवाल काय आहे. तर वकिला तर्फे उपस्तित प्रश्नाचे उत्तर देण्यात आले. व लेखी अर्ज व्दारे मुंबई हायकोर्टे चा कोणताही आदेश दिलेला नाही. या संदर्भात पनवेल कोर्टात आज सुनावणीची तारीख शुक्रवार दिनांक १६ जून, २०२३ हि होती व पुढील दिनांक १ जुलै, २०२३ देण्यात आलेली आहे. 


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या