युवती गायब होण्याचे प्रकार राज्यासाठी गंभीर- सुनील फाटकर, उपाध्यक्ष
गृह विभाग खात्याचे अपयश- चंद्रशेखर चिंचोलकर जिल्हा परिषद सदस्य
सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे👆 स्पर्श करा
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अशा दोन्ही गोष्टी योग्य पद्धतीने राबवल्या जात आहेत असं वारंवार सरकारकडून सांगितलं जातं आहे. अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात रोज सरासरी ७० मुली गायब होत आहेत. जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातून ५ हजार ५१० मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
यावर अकोल्यातील अधिकारी वर्गांनी ही गंभीर बाब असल्याचे स्पष्ट केले. मुली गायब होण्यात / पळून जाण्यास जबाबदार प्रशासन जबाबदार असल्याचे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले. राज्याच्या संदर्भात ही गंभीर बाब असून याकडे तात्काळ शासनाने पोलीस प्रशासनाने व गृह मंत्रालयाने लक्ष घालून हरवलेल्या मुलींचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात यावे व त्यांच्या पालकांना न्याय द्यावा. गृह विभाग खात्याचे हे अपयश म्हणावे लागेल, अशा प्रतिक्रिया लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या