गांधीग्राम महिलांची पाण्यासाठी डोक्यावर हांडे घेऊन धडक
पिण्याच्या पाण्यासाठी गांधीग्राम येथील नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. गांधी ग्राम येथील नागरिकांना एक महिण्यापासून पिण्याचे पाणी मिळाले नाही, नाईलाजास्तव पूर्णा नदीचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न व पोटाचे विकार निर्माण झाला आहेत. प्रशासनाने पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
Byte- नरेंद्र सदांशीव
मोर्चात सरपंच सुषमा ठाकरे, नरेंद्र सदांशीव, सदानंद ढोकने, छाया मोहिते, जनाबाई पळसपगार, लक्षमी जाधव, कांता मोहिते, अनिता गवई, मीना मोहिते, पार्वती बाई अढाऊ, आदी बहुसंख्य नागरिक व महिला सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या