Ticker

6/recent/ticker-posts

खारघर येथील सदोष मनुष्यवध प्रकरणी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा। ..हर्षवर्धन सपकाळ

खारघर येथील सदोष मनुष्यवध प्रकरणी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा। ..हर्षवर्धन सपकाळ 


अकोला --- खारघर येथे दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात १४ श्रीसदस्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर व मनाला वेदना देणारी आहे. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर प्रेम करणारे जवळपास २० लाख श्रीसदस्य राज्यभरातून या कार्यक्रमासाठी आले होते. हा सोहळा राज्य सरकारने आयोजित केला होता तसेच यासाठी तब्बल १३ कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च केले गेले. एवढा मोठा खर्च करुनही लाखो श्रीसदस्यांना मात्र कडक उन्हात तासन तास बसावे लागले, त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून साधे छत लावण्याची तसदी सरकारने घेतली नाही. त्यांना पिण्याचे पाणीही मिळू शकले नाही आणि उष्माघाताने अनेक श्रीसदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. अश्या गंभीर प्रकरणी महाराष्ट्रातील जनतेच्या हीतासाठी 2 दिवशीय विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी आज काँग्रेसचे माजी मंत्री माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन मागणी केली आहे 


                हर्षवर्धन सपकाळ 

यातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे उष्माघाताबरोबर चेंगराचेंगरी झाल्याच्या बातम्याही विविध प्रसार माध्यमातून येत आहेत, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. सरकारला या कार्यक्रमाचे योग्य नियोजन करता आले नाही या . ढिसाळ नियोजनामुळे १४ श्रीसदस्यांचे मृत्यू झाले आहेत व ५०० पेक्षा जास्त श्रीसदस्य उपचार घेत आहेत. हा आकडा यापेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही, सरकार मात्र सत्य परिस्थिती लपवत आहे. खारघरची घटना महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावयास लावणारी आहे. या घटनेतील मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभार आहे. एवढी मोठी घटना
झाल्यावर राज्य सरकार मात्र महाराष्ट्र भूषण श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावरच जबाबदारी ढकलत आहे. या घटनेकडे राज्य सरकार गांभीर्याने पहात नसल्याचे दिसत आहे. मृतांच्या।वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन सरकार यातून आपली सुटका करून घेऊ पहात आहे. जेव्हा की, हा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा आहे., खारघर घटनेप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकार सत्य परिस्थिती।दडवत आहे. ही घटना महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही
घटना झाली आहे असे काँग्रेस चे स्पष्ट मत आहे. या घटनेची सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी व भविष्यात असा प्रकार घडू नये म्हणून सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. त्यासाठी विधीमंडळाचे दोन दिवशीय विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत केली आहे 


या पत्रकार परिषदेत अकोला जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर ,महानगर काँग्रेस अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील वानखडे,मनपा माजी विरोधी पक्षनेते साजीद खान पठाण , पुरुषोत्तम दातकर, राज्य सचिव प्रकाश तायडे , महेंद्र गवई, डॉ सुधीर ढोणे, निखिलेश दिवेकर, तश्वर पटेल, महेंद्र गवई, प्रशांत प्रधान, अंकुश गावंडे, मुजाहिद खान सह काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या