सरकारने प्रस्तावित वीज दरवाढ त्वरित रद्द करावी
मागणीसाठी आप ने केली निदर्शने, मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
अकोला ---शिवसेनेच्या जाहिरनाम्या प्रमाणे ३०० युनिट पर्यंत ३० % दर कमी करणे, आणि २०० युनिट वीज मोफत देणे राज्यातील जनतेला अपेक्षित असतांना राज्यात मात्र महावितरण कंपनीकडून 37 टक्के वीज दरवाढ चा प्रस्ताव ठेवला असून ही दरवाढ 2 वर्षेत करण्याचे नियोजन केले असून राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने हा प्रस्ताव रद्द करावा या मागणीसाठी आज आम आदमी पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे
लॉकडाऊन काळात दि. १ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ केली होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. त्यातच आता वीज कंपन्यांकडून 37 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिट घरगुती वापरात ३०% स्वस्त वीज देवू, तसेच बीजेपी कडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले होते . मागच्या दोन वर्षात देवेंद्र फडणवीस हे विरोधात असतांना त्यांनी वीज दरवाढ व मोफत वीज देण्याबाबत अनेकदा रस्त्यावर येवून आंदोलन केली आहेत. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल सरकार मागच्या आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापरकरणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सरकारने सुद्धा दि. १ जुलै 2022 पासून ३०० युनिट घरघुतीसाठी आणि शेतकऱ्यांना मोफत वीज केली आहे.मात्र आपल्या राज्यात २.५० ते ३.रुपयात प्रतीयुनिट तयार होणारी वीज १२ ते १८ रुपये प्रति युनिट प्रमाणे दर लावून जनतेची लुट होत आहे. ही लुट थांबविण्यासाठी आम आदमी पार्टी हा मुद्दा घेवून राज्यात गेल्या तीन वर्षापासून सातत्याने आंदोलन करीत आहे.मात्र राज्य सरकार राज्यातील जनतेला स्वस्त वीज देण्या ऐवजी दोन वर्षात ३७% वीज दर वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे त्यामुळे या गंभीर मुद्दाकडे मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष देवून प्रस्तावित वीज दर वाढ रद्द करावी , राज्यात दि १ जुलै २०२२ पासून विजेच्या दरात जी १० ते २० % अधिभार लावून वाढ केली ती त्वरित मागे घ्यावी. तसेच ३०% स्वस्त वीज देण्याच्या वचननाम्याची पूर्तता करावी. वीज कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार होत असल्यामुळे विजेचे दर जास्त आहेत. वीज दर कमी राहण्यासाठी वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे, अवाजवी खर्च कमी करून कामाचे नियोजन करण्यात यावे आदी सह इतर मागण्यांसाठी आज अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम आदमी पार्टीने निदर्शने करून मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिले आहे यावेळी अमरावती विभागीय संयोजक तथा राज्य कमिटी सदस्य शेख अन्सार,जिल्हा संयोजक अरविंद कांबळे,जिल्हा प्रवक्ता विजय चक्रे, युवक आघाडी जिल्हा संयोजक अनुराग झुणझुणवाला, तालुकाध्यक्ष विजय भटकर, काजी लायक अली,सुगदेव गोपणारायन,वृषभ अत्तरकर संतोष दाभाडे,,श्रावण रंगारी ,सचिन तेलगी, महेश यादव, गणेश गिरी, देवेंद्र तुपोकर, साजीद भाई आदींसह आप चे कार्यकर्ते उपस्थित होते
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या