गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे सर्वेक्षण करण्याची मागणी
अकोला जिल्हाधिकारी यांना सम्राट अशोक सेनेतर्फे गारपीटग्रस्त पिकाचे सर्वेक्षण करून भरपाई देण्याच्या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले. अवकाळी पावसामुळे व गारपिटमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या पिकाची नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील,पातुर तालुका,बार्शीटाकळी, तेल्हारा, मूर्तीच्यापूर, बाळापुर, आकोट, तालुक्यातील अवकाळी पावसामुळे व गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या, शेतातला हरभरा,गहू, तुर, कांदा, संत्रा व इतर शेतीतील पीक अवकाळी पावसामुळे संपूर्ण उध्वस्त होऊन नुकसान झाले आहे. नुकसान झालेला शेतकरी संकटात आला आहे, बँकेचा कर्ज,सावकाराकडून व्याजाचे पैसे, सोने नाणे सोनाराकडे गहाण ठेवून, उसनवारी करून शेतकऱ्यांनी आपल्या शेत पेरणी करून पिकाची जोपासना देखभाल केली, परंतु अवकाळी पावसाने व गारपीटने शेतकऱ्याची तोंडापुढे आलेला घास हिसकून घेतला आहे. काय करावे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे, जगावं की मरावं हे परिस्थिती शेतकऱ्यापुढे आता उपस्थित झाली, शेतकऱ्यांना कोण न्याय देणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे? मागील वर्षी नुकसान झालं त्याची भरपाई आतापर्यंत मिळालेली नाही,त्यात निसर्ग सुद्धा आता शेतकऱ्यांना संकटात टाकत आहे.
शासनाने तात का नुकसानग्रस्त व गारपीटग्रस्त शेताचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आज संकटात सापडला लवकरात लवकर शेतकऱ्यांना उध्वस्त झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सम्राट अशोक सेने तर्फे निवेदनातून करण्यात आली. यावेळी अध्यक्ष आकाश शिरसाट, कार्यकर्ते पवन दादा वानखडे, नाक्षण भाऊ तेलगोटे,पक्षीराज, आकाश हिवराडे,बंटी सावंत, अक्षय शिरसाट,गोलू शिरसाट, सागर शिरसाट,शेखर पोटदुखे, सौरभ वाहूरवाघ, राहुल मेश्राम यासह शेतकरी आणि कार्यकर्ते या आंदोलनात उपस्थित होते.
0 टिप्पण्या