महावितरण विज कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
अकोला : महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला असुन तोडगा निघाला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि महावितरणच्या संपकरी कर्मचाऱ्यांची बैठक यशस्वी झाली आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी राज्यभर आजपासून पुकारलेला तीन दिवसांचा संप मागे घेण्यात आला आहे. दिनांक 3 जानेवारीच्या मध्यरात्रीपासूनच संप सुरु करण्यात आला होता. त्यामुळे आज (4 जानेवारी) सकाळपासून राज्यातील अनेक भागात वीजेची समस्या निर्माण होऊन नागरिकांचे हाल होत होते. त्यामुळे सरकारकडून देवेंद्र फडणवीस आणि वीज कर्मचाऱ्यांच्या 32 संघटनांचे प्रतिनिधी यांची तातडीची बैठक झाली. तब्बल अर्धा तास चर्चा झाली. त्यातून तोडगा निघाल्याने अखेर वीज कर्मचाऱ्यांचा संप रोखण्यात सरकारला यश आले आहे. तसेच संप मागे घेतल्याची अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.
0 टिप्पण्या