युवा शेतकऱ्याची रेल्वे समोर येऊन आत्महत्या!
शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही. सतत नापिकीमुळे तर कोणी सावकाराच्या त्रासामुळे तर बँकेच्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. दुसरीकडून राज्य शासनाकडून शेतकऱ्याला जशी पाहिजे तशी मदत मिळत नसल्यामुळे शेतकरी हा आत्महत्येचे पाऊल उचलत चालला आहे.
आज दिनांक 12 जानेवारी रोजी मोरगाव भाकरी येथील युवा शेतकऱ्यांनी सकाळी अकराच्या सुमारास रेल्वे समोर येऊन आपले जीवन यात्रा संपवली. प्राप्त माहिती अनुसार मोरगाव भाकरे येथील होतकरू युवा शेतकरी गजानन रामदास भोंगळे याला सतत नापिकी होत असल्यामुळे तसेच बँकेचे कर्ज वाळत चालल्यामुळे सदर शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत पारस रेल्वे लाईन वर जाऊन स्वतःची जीवन यात्रा संपवली. सदर शेतकरी हा अतिशय होतकरू मनमिळाऊ असल्यामुळे मोरगाव भाकरे गावात आज शोकांत पसरली होती. सत्य लढा प्रतिनिधी गणेश भाकरे मोरगांव भाकरे
0 टिप्पण्या