Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी कर्ज व पीक वीमा धोरणात बदल करा, भूमिपुत्रांचे शिष्टमंडळ माजी कृषीमंत्री शरद पवार यांना भेटले

शेतकरी कर्ज व पीक वीमा धोरणात बदल करा, भूमिपुत्रांचे शिष्टमंडळ माजी कृषीमंत्री शरद पवार यांना भेटले



अकोला— व्यापारी-उद्योजकाप्रमाणे शेतीला सुलभ कर्ज पुरवठा व पीक वीमा धोरणात बदल करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी दिल्ली येथे माजी कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेवुन निवेदन सादर केले. 


       अकोला जिल्ह्यातील शेतकरी सर्वश्री संजय मालोकार,रमेश पाटील लोणाग्रेकर,ज्ञानेश्वर माळी,विलास नाकट व बबनराव कानकिरड यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने कृषी कर्ज व पीक विमा धोरणात बदल करण्यासाठी मा.पंतप्रधान,केंद्रीय कृषीमंत्री,मुख्यमंत्री,राज्याचे मंत्री,खासदार,आमदार अशा सर्व लोकप्रतिनिधीकडे निवेदनाव्दारे पाठपुरावा केला आहे.नाबार्ड या निवेबनाची दखल घेऊन यावर संशोधन करणार असल्याचे कळविले.माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी भूमिपुत्रांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावुन घेतले.त्यानुसार सर्वश्री संजय मालोकार,रमेश पाटील लोणाग्रेकर,ज्ञानेश्वर माळी,विलास नाकट व बबनराव कानकिरड या भूमिपुत्रांनी मा.शरद पवार यांचेसोबत संवाद साधला.समस्त शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुलभ कर्जपुरवठा,सुलभ जलपुरवठा,जलसिंचन व कृषी उद्योगावर भर देण्यासाठी सातत्यपूर्वक निवेदनाद्वारे जनजागर करणार्‍या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.हा प्रश्न शासनदरबारी रेटणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या