पीला परिधान धारण किए मकर संक्रांति
अकोला-: स्थानीय खाटू श्याम रामदेव बाबा मंदिर बायपास में अकोला पुरोहित संघ की सभा 14 जनवरी रात्रि08:44 बजे होने वाली मकर संक्रांति को लेकर संपन्न हुई.
इस मकर संक्रांति का पुण्य काल 15 जनवरी रविवार को सूर्योदय से सूर्यास्त तक रहेगा. अतः मकर संक्रांत 15 जनवरी को रहेगी. मकर संक्रांति का आगमन दक्षिण दिशा से चलकर उत्तर दिशा की तरफ जा रही है ईशान्य कोण की तरफ देख रही है पीले वस्त्र धारण कर पायस (खीर) खा रही है. कस्तूरी का तिलक है जाई का फुल की सुगंध ले रही है. प्रमुख वाहन व्याघ्र है उप वाहन घोड़ा है, कंकण, मोतियों का अलंकार है कुमारी अवस्था बैठी हुई है, शस्त्र गदा है, जाति से भूत है, वार नाम राक्षसीका नक्षत्र नाम मंदाकिनी है.
संक्रांति फल -: ईशान्य दिशा के देशों के लिए हानी कारक बाघ कम होंगे दूध और दूध से बने पदार्थ मिठाइयां गाय भैंस का घी चावल महंगे होंगे मोती महंगे होंगे चांदी स्वर्ण महंगा होगा चने की आवक कम होगी महंगा होगा, सुंदर स्त्रियों स्वर्ण धारण करने वाली स्त्रियों के लिए हानिकारक ,मध्य प्रदेश बंगाल इत्यादि में राजनीतिक उथल-पुथल. पारदी जंगली चोर उचक्के तथा नेताओं के लिए लाभदायक. समाज में मांगलिक कार्यों की भरमार रहेगी. महंगाई कम होने के आसार. केसर महंगा होगा दुर्लभ होगा .जंगली जानवरों की तस्करी बढ़ेगी, पानी से नुकसान, चित्रा नक्षत्र में जन्मे मनुष्य की हानि. राक्षसी प्रवृत्ति के मनुष्य को नुकसान, पशुपालकों के लिए दुखदाई, वात पित्त कफ से जन्म लेने वाले रोग समाज में फैलेंगे. राजनीति में भारी असंतोष , बैठकर व्यापार करने वाले व्यापारियों, अधिक बैठने वाले सामान्य जन के लिए हानिकारक,30 मुहूर्त होने से संक्रांति का फल साधारण रहेगा. पीली वस्तुएं, खीर, चावल दूध, सौभाग्य वस्तु, स्वर्ण चांदी कासा पीतल, सूर्य मूर्ति, तिल गुड, अनाज, पीली कंबल स्वेटर, पीले फल, केसर योग्य जरूरतमंद नीतिमत्ता रखने वाले सात्विक ब्राह्मण को दान करें, गरीब और गाय को यथा योग्य वस्तु दान करें. सूर्य मूर्ति इत्यादि दान करें. संक्रांति फलादेश के लिए बृहद ज्योतिष वाराणसी, मुहूर्त चिंतामणि, तथा महाराष्ट्रीयन पंचांग का प्रयोग किया गया. सभा में सर्वश्री पंडित सांवरमल जी तिवारी, श्याम झा,अशोक छंगानी, रतन तिवारी, विमल व्यास, मोहन शर्मा, प्रमोद तिवारी, गौरव व्यास, धीरज तिवारी, रजनीकांत जाडा, श्याम अवस्थी, सौरभ छंगानी, सुमित तिवारी एवं पंडित रवि कुमार शर्मा उपस्थित थे.
महागाई कमी होणार मकर संक्रांतीचे ' परिणाम
अकोला-: बायपास जवळ स्थित खाटू श्याम रामदेव बाबा मंदिरात अकोला पोरहीत्य संघांची सभा मकर संक्रांतीला घेऊन संपन्न झाली. यंदा 14 जानेवारी शनिवार रोजी रात्री08:44 वाजता सूर्यनारायण मकर राशि मध्ये संक्रमण करीत आहे तर मकर संक्रांति 15 जानेवारी रविवार ज्या दिवशी राहणार. शनिवार चित्रा नक्षत्र बालवकरण रात्रीच्या प्रथम प्रहर सुकर्मा योग. संक्रांति वाहन वाघ उप वाहन घोडा पिवळ्या रंगाचे वस्त्र, केशरा तिलक, हातात गदा, पायस( खीर) भक्षण करीत आहे, जाईचे फुल सुहासार्थ धारण केले आहे, कंकण मोती अलंकार जातीने सर्प( भूत), वयाने कुमारी, बसलेली अवस्था, वारणाव राक्षसीका, नक्षत्र नाव मंदाकिनी, मुहूर्त 30, दक्षिण दिशा कडून येते व उत्तर कडे जाते, ईशान्य दिशेकडे पहात आहे, पात्र चांदीचे आहे.
संक्रांतीचे फळ-: वात कफ पित्त पासून समाजात रोग वाढतील, राजनीतिक वातावरण असंतोष जनक, पाण्याने नुकसान, नेता चोर नास्तिक दुष्ट बुद्धी लोकांचे सुख वृद्धी, भिल्ल आदिवासी जंगलात राहणारे यांना सौख्यदायक, घरोघरी मंगल कार्य होतील, महागाई कमी होतील फक्त जीवनावश्यक वस्तूंची, .स्वर्ण चांदी केसर हळद दूध मिठाई तूप दही ताक दूध पावडर चावल बेसन चना साखर हे महाग होऊन मीलावट चे परिणाम वाढतील, मोती महाग होईल, जनावर पाळणारे यांना त्रास, बसून व्यापार करणारा ला त्रास, दक्षिण कडे राहणाऱ्या गरीब कामगार लोकांना सुख दायक, अविवाहित लोकांमध्ये असंतोष, जंगली जानवर यांची तस्करी वाढतील, सत्ताधारी भरपूर पैसा गोळा करतील. समाज भौतिक भोग वृत्ती कडे लक्ष देईल.
दान वस्तू-: चांदी स्वर्ण पिवळे वस्त्र केसर हळद तिळगुळ, कासा पितळ, पिवळे उन वस्त्र, साखर तांदूळ, खीर, गाईचे तूप, सौभाग्य वस्तू, फळ, सूर्य मूर्ती, योग्य निष्ठावान सात्विक दयाळू देवभक्त एकदम योग्य ब्राह्मणांना सर्व वस्तू दान द्यावी, निर्धन गरीब गाई यांना सुद्धा दानधर्म करावा, पवित्र नदी तलाव समुद्र गंगा नर्मदा स्नान करावे. मकर संक्रांतीचे फलादेश इत्यादीसाठी मुहूर्त चिंतामणी, बृहद ज्योतिष सार वाराणसी व महाराष्ट्रीयन पंचांग सार घेण्यात आले. सभेत सर्वश्री पंडित श्याम झा, सावर मल तिवारी, अशोक छगाणी, गौरव व्यास विमल व्यास, प्रमोद तिवारी, सुमित तिवारी, रतन तिवारी, मोहन शर्मा, रजनीकांत जाडा, श्याम अवस्थी, सौरभ छगाणी, धीरज तिवारी एवं पंडित रवी कुमार शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.
विदर्भ-मराठवाड्याची वाटचाल
अनुशेषाकडून कालबद्ध विकासाकडे !
सरकारच्या विकास मोहिमेचे भाजपा कडून स्वागत
अकोला
आ
जपर्यंत केवळ सरकारी उपेक्षेमुळे विकास, सिंचन आणि कृषी क्षेत्राच्या समस्यांनी ग्रासलेल्या विदर्भ, मराठवाडा या अनुशेषग्रस्त भागांना प्रथमच विकासाची चाहूल लागली असून शिंदे-फडणवीस सरकारने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जाहीर केलेल्या विविध योजनांमुळे या भागाच्या विकासास चालना मिळणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीने सातत्याने अन्याय करून रोखलेल्या विकासाच्या वाटा आता मोकळ्या झाल्याने राज्यात खऱ्या अर्थाने विकासाभिमुख वाटचाल सुरू झाली आहे, अशी भावना 'भाजपा' चे आमदार रणधीर सावरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकार असताना त्यावेळचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यास नकार दिला होता , याची आठवणही आमदार सावरकर.. यांनी करून दिली आहे.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपुरात घेण्यामागे या भागातील अनुशेषाच्या मुद्द्यांवर तोडगा काढून विकासास चालना द्यावी हाच उद्देश होता. पण आजवर केवळ राजकीय हेवेदावे आणि कुरघोडीच्या राजकारणातच हिवाळी अधिवेशने गाजविली गेली, आणि समस्यांची सतत उपेक्षा झाली. उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारने तर दोन वर्षे नागपुरात अधिवेशनही घेतले नाही. यावरूनच महाविकास आघाडीची विदर्भावरील अन्यायाची भावना स्पष्ट होते. दोन वर्षांनंतर प्रथमच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विदर्भ-मराठवाड्यासाठी विविध योजना जाहीर करून शिंदे-फडणवीस सरकारने अन्याय दूर करण्यास सुरुवात केली आहे, असे ते म्हणाले. ‘विदर्भ मजबूत तर महाराष्ट्र मजबूत’ ही मुख्यमंत्र्यांची घोषणा विदर्भास दिलासादायक असून धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपये बोनस, विदर्भासाठी पर्यटन सर्किट, नवे खनिज धोरण, समतोल विकासासाठी नवी समिती, समृद्धी महामार्ग, नागपूर, वर्धा येथील नियोजित लॉजिस्टिक हब, शक्तिपीठ महामार्ग, गोसीखुर्दचा पर्यटन प्रकल्प, लोहखनिज प्रकल्प व नवे खनिज धोरण, शेतमालाच्या मूल्य साखळ्या तयार करण्याचे धोरण, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प, पारशिवनी येथील रखडलेल्या पेंच प्रकल्पास वेग, तलावांची दुरुस्ती, जलयुक्त शिवार योजनेस गती, नवे वस्त्रोद्योग धोरण, अशा विकास योजनांची घोषणा करून शिंदे-फडणवीस सरकारने अनुशेषाकडून विकासाकडे वाटचालीची पायाभरणी केली आहे, अशा शब्दात भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी समाधान व्यक्त केले.
ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात विदर्भ, मराठवाड्याच्या अनुशेषात भर पडलीच, पण संपूर्ण महाराष्ट्राचेच विकासचक्र उलटे फिरले. कोविडचे निमित्त करून घरबसल्या राज्यकारभार करणाऱ्या वसुली सरकारमुळे अनुशेषग्रस्त भागास सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले. याची भरपाई करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने या भागाच्या विकासासाठी ठोस उपाययोजना सुरू केल्याने, नव्या दमाने विकासाचे वारे वाहू लागतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र या तीनही वैधानिक विकास मंडळांचे पुनर्गठन आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेस गती देऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटींच्या शिखरावर नेण्यासाठी सुरू केलेले कालबद्ध प्रयत्न यांतून सरकारची विकासाची दृष्टी स्पष्ट झाली आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या