Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा गांधींनी निसर्गोपचाराचा संदेश दिला— शिरीष धोत्रे

महात्मा गांधींनी निसर्गोपचाराचा संदेश दिला— शिरीष धोत्रे


आरोग्यदर्शन दिनदर्शिका विमोचन


अकोला —आपले आरोग्य अबाधित राखायचे असेल तर निसर्गोपचार ही त्यावर गुरुकिल्ली आहे. महात्मा गांधींनी निसर्गोपचाराचा संदेश भारतीयांना दिला होता असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांनी केले . 
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्था रणपिसेनगर चे वतीने काढण्यात आलेल्या 'आरोग्य दर्शन ' दिनदर्शिकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार होते. 
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपच्या संस्थेचे अध्यक्ष गोवर्धनदादा खवले यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या विविध उपक्रमाची व आरोग्य दर्शन दिनदर्शिका विमोचनामागील भूमिका विषद केली.
कमीत कमी खर्चात व सहज उपलब्ध असलेल्या निसर्गोपचारातून आपण आपले आरोग्य संवर्धन करू शकतो त्यासाठी निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार झाला पाहिजे असे प्रतिपादनही शिरीष धोत्रे यांनी केले .
 कुटुंबात एक तरी निसर्गोपचार डॉक्टर असला पाहिजे . निसर्गोपचाराच्या माध्यमातून समृद्ध कुटुंब—समृद्ध देश बनवता येईल असे प्रतिपादन महादेवराव भुईभार यांनी अध्यक्षीय भाषणातुन केले.
 कार्यक्रमाचे संचालन प्रा. बबनराव कानकीरड यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. काशिनाथ दाते गुरुजी यांनी केले. कार्यक्रमाला सर्वश्री डॉ. हिरासिंह ठाकूर, सुनील मालोकार,राजेंद्र भुईभार, भाजपाचे जिल्हा सचिव अनिल गावंडे , गजानन पाटील गावंडे ,अभिमन्यू पाटील वक्ते, रामभाऊ रोडे ,पुंडलिकराव गवई,आकाश इंगळे व प्रा. मोहन खडसे यांचे सह निसर्गोपचार डाॅक्टर व सर्वोदयी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते . राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या