Ticker

6/recent/ticker-posts

लोकसभा निवडणुकीच्या आ खळ्ळगामी महासंग्रामासाठी भाजपाची संघटना बळकट करा, लक्ष्य ५१ टक्के मते

लोकसभा निवडणुकीच्या आ खळ्ळगामी महासंग्रामासाठी भाजपाची संघटना बळकट करा, लक्ष्य ५१ टक्के मते


राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी आणि प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन मन की बात कार्यक्रमात सर्वांना सोबत घेऊन कार्यरत व आमदार सावरकर
 
अकोला
लोकसभेच्या २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीत होणाऱ्या महासंग्रामासाठी ‘अभी नही तो कभी नही’ या जिद्दीने कामाला लागावे. सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत आणि निवडणुकीत ५१ टक्के मते मिळविण्यासाठी संघटना बळकट करावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी मा. सी. टी. रवी तसेच प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले.


भारतीय जनता पार्टीचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व जिल्हा संघटन सरचिटणीसांची एक दिवसीय बैठक नागपूर येथे सोमवारी झाली. या बैठकीच्या उद्घाटनसत्रात मा. नेते बोलत होते. यावेळी भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवैय्या आणि ओमप्रकाश धुर्वे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, संजय केणेकर, रणधीर सावरकर आणि विजय चौधरी उपस्थित होते.

मा. सी. टी. रवी म्हणाले की, महाविकास आघाडीला लोक महावसुली आघाडी म्हणत असत. पण आता राज्यात विकासाचे डबल इंजिन असलेले सरकार आले आहे. विकासाचे राजकारण सुरू झाले आहे. पण भाजपाने आत्मसंतुष्ट होण्याचे कारण नाही. आपला संघर्ष अजूनही चालू आहे. सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचतील यासाठी कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेला वारंवार सांगत राहिले पाहिजे. यासाठी संघटनात्मक जाळे बळकट करायचे आहे. ते म्हणाले की, आगामी २०२४ च्या निवडणुकीत महासंग्राम आहे. त्यासाठी पक्षाने संघटना सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात योजना निश्चित करून काम करण्याची गरज आहे.


भाजपाचे हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि विकास हे धोरण आहे. हिंदुत्व हा केवळ भाजपाचा नाही तर देशाचा आत्मा आहे. देशावर जेव्हा जेव्हा संकट आले त्यावेळी महाराष्ट्राने योगदान दिले आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.

मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यातील विविध जिल्ह्यांचा प्रवास करताना आपल्याला आढळले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर जनतेमध्ये पक्षासाठीचा पाठिंबा वाढला असून कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. पण आगामी निवडणुकीत आपली ५१ टक्क्यांची लढाई आहे. आपल्याला पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवायची आहेत व त्यासाठी भाजपाची संघटना मजबूत करायची आहे. आगामी निवडणुकीत जेथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उमेदवार असतील तेथेही भाजपाच्या संघटनेचा पाठिंबा त्यांना उपयोगी पडेल. त्यामुळे पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आक्रमक रितीने कृतीशील भूमिकेत जावे लागेल. अभी नही तो कभी नही या जिद्दीने काम करावे लागेल.

मा. मुरलीधर मोहोळ यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटनसत्रा नंतर झालेल्या सत्रांमध्ये मा. श्रीकांत भारतीय यांनी जी ट्वेंटीच्या भारताच्या अध्यक्षपदाचे महत्त्व, मा. विजय चौधरी यांनी एक भारत, श्रेष्ठ भारत, मा. संजय केनेकर यांनी नव मतदार नोंदणी, मा. रणधीर सावरकर यांनी बूथ स्तरावर मन की बातचे कार्यक्रम आणि मा. माधवी नाईक यांनी फ्रेंड्स ऑफ बीजेपी याविषयी मार्गदर्शन केले. प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी शोकप्रस्ताव मांडला मन की बात कार्यक्रम घर घर पोहोचवा आमदार सावरकर
. यावेळी आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी मन की बात 25 डिसेंबर रोजी शानवा कार्यक्रम असून या कार्यक्रमात विचार व्यक्त करताना विधानसभा पोट प्रमुख क्रमांक शक्ती केंद्रप्रमुख या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करावा पंतप्रधान यांनी मन की बात देश वाचन सोबत संवाद साधला मात्र नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून करोडो नागरिकांची संवाद साधून त्यांच्या चांगल्या कामाच्या जन जन पर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम केला आहे तो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जयंती दिनानिमित्त मन की बात या कार्यक्रम प्रत्येक मंडळी हा वाढविण्या बुतनिहाय शक्ति केंद्र उपकेंद्रावर ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे आवाहन करून सोशल मीडिया व वृत्तपत्रात वेगवेगळ्या माध्यमात याचा प्रचार प्रसार करावा अशी आव्हान प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी केले. मनकीबात माध्यमातून सरकार आणि जनता संवाद साधण्याचा काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून जात-पात धर्म पेक्षा राष्ट्र निर्माण असं काम महत्त्वाचं असून प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या कामांचा प्रशंसा देशाचे पंतप्रधान करून त्यांच्या कार्याला प्रसिद्धी सोबत त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी प्रत्येकाला राष्ट्रभक्ती सोबत स्वदेशीचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारत निर्माण वाटचाल करत असून याचा प्रचार प्रसार व कार्यक्रमास संदर्भात सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याची गरज असल्याची प्रतिपादक प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी केले व वेगवेगळ्या मन की बात या कार्यक्रमाची अनुभव त्यांनी यावेळी सांगितले.


पक्ष विस्तारासोबत राष्ट्र निर्माण योगदान घेण्यासाठी भाजपा प्रयत्नशील 
अकोला
सामाजिक, भौगोलिक आर्थिक विकासासोबत प्रत्येकाचा सन्मान करून त्यांच्या भावनेचा आदर करून त्यांच्या कर्तुत्वाचा लाभ पक्ष विस्तारासोबत राष्ट्र निर्माण योगदान घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष चा विस्तार होत असून समाजातील सर्व घटक भारतीय जनता पक्षाची जुळत असून अकोला जिल्ह्यात भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढ होऊन 51% मताधिक्की मिळवण्याचा संकल्प घेऊन भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता कार्यरत असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस व अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी केले.
भारतीय जनता पक्षामध्ये अकोला पूर्व ती पूर्व विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजेश बेले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माधव मानकर अनिल गावंडे अंबादास उमाळे, जयंत मसने शंकरराव वाकोडे, देवेंद्र देवर दिनेश काळे गुरुदास गावंडे दीपक देवर रुपेश गावंडे मिलिंद देशमुख बाबुलाल कागटे मोहन पागृत चंदू खडसे, आधी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी आलियाबाद या परिसरातील व पंचकोशीतील विविध पक्षातील सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सदस्य कारले यांचा मान्यवरांच्या हस्ते स्वागतअमोल पागृत, गजानन पागृत, अवि पागृत, संजूभाऊ पागृत, दिगांबर पागृत, श्रीकृष्ण म्हैसने, योगेश पागृत दिगंबर पागृत अनंता सांगून वेडे सुरेश नळेकर गोपाल पागृत राम पागृत शत्रुघ्न पगृत महेश पागृत उमेश पागृत आकाश नळेकर गहिनीनळेकर अनंता पागृत पंढरी पागृत या सर्व मंडळींनी आदरणीय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी अकोला जिल्हा संपूर्ण गावकऱ्यांनी प्रवेश घेतला करण्यात आले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या