प्रभू रामचंद्रांशी राहुल गांधींची तुलना केल्याबद्दल कॉंग्रेसने माफी मागावी
भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर यांची मागणी
नॅशनल हेराल्ड भ्रष्टाचारप्रकरणी जामीनावर मुक्त असलेल्या, वारंवार महापुरुषांची बदनामी करून माफी मागणाऱ्या आणि सतत खोटे बोलून जनतेत संभ्रम पसरविणाऱ्या कर्तृत्वशून्य राहुल गांधींची तुलना महापराक्रमी, सत्यवचनी आणि हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू रामचंद्रांशी करून पुन्हा प्रभू रामचंद्रांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसने देशाची माफी मागावी , अशी मागणी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर यांनी केली आहे. श्रीरामांचे अस्तित्वच नाकारण्यापासून सुरुवात करत आता राहुल गांधींची तुलना प्रभू रामचंद्रांशी करून श्रीरामांचे अवमूल्यन करण्याचा व हिंदूंच्या भावनांची खिल्ली उडविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न म्हणजे गांधी परिवारापुढे गुडघे टेकण्याच्या लाळघोट्या राजनीतीची अधोगती आहे, असेही आ. सावरकर यांनी म्हटले आहे.
आ. सावरकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की , माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची केलेली प्रशंसा म्हणजे गांधी घराण्याचे तळवे चाटण्याच्या स्पर्धेत पुढे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. काँग्रेसचे सर्वच नेते गांधी घराण्यासमोर लाळघोटेपणा करण्यासाठी चढाओढ करत असतात. पण त्याकरिता राहुल गांधींना श्रीरामांची उपमा देणे हा प्रभू रामचंद्रांचा अपमान आहे. सर्व गुणांचा आदर्श असलेल्या प्रभू रामचंद्रांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. श्रीरामांचे अस्तित्व नाकारून हिंदूंच्या भावनांची खिल्ली उडविणाऱ्या, श्रीरामांच्या जन्मस्थळावर प्रश्नचिन्हे उमटविणाऱ्या आणि सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वावर शंका घेणाऱ्या काँग्रेसने राजकारणासाठी हिंदूंच्या पवित्र श्रद्धास्थानांना वेठीस धरून आपल्या कर्तृत्वहीन नेत्यांची तुलना त्यांच्याशी करीत हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अपमान करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. राहुल गांधींची तुलना श्रीरामांशी करून केवळ हिंदूंच्याच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या भावना काँग्रेसने दुखावल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला. याच सलमान खुर्शिद यांनी आपल्या पुस्तकात हिंदुत्व विचारांची तुलना आयसिस आणि बोको हरम या कट्टरवादी मुस्लिम अतिरेकी संघटनांशी केली होती. हिंदुत्वाचा वापर राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता, आणि आता देशात हिंदू एकवटत असल्याचे दिसताच त्यांनाही श्रीरामांची आठवण झाली , असे ते म्हणाले. रामचंद्राचा अपमान करत असताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष व स्वतःला तथाकथी म्हणून घेणारे पक्ष आता गप्प का असाही सवाल आमदार सावरकर यांनी केला
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये सतत पराभवाची मालिका सुरू आहे. भ्रष्टाचाराचा बुजबुजाट झालेल्या आणि अपरिपक्व नेतृत्वामुळे गळती लागलेल्या काँग्रेसच्या अपयशास कारणीभूत असलेल्या राहुल गांधींची तुलना पराक्रमी, अजिंक्य रामचंद्रांशी करणाऱ्या खुर्शिद यांच्या लाळघोटेपणातून काँग्रेस नेत्यांची हतबलता स्पष्ट झाली आहे, पण देशातील हिंदू जनता हे लाळघोटे राजकारण मान्य करणार नाही, अशी खोचक टिपणी आ. सावरकर यांनी केली.
अकोला
भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराला मातुशक्तीचे महत्त्वपूर्ण योगदान असून 51 टक्के मातृ शक्ती भाजपाला मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुजलाम सुफलाम भारत निर्माण कार्यात सक्रिय सहभाग समाज, राष्ट्र परिवार दिशादर्शक कार्य असल्याचे प्रतिपादन माझी मनपा अमरावती सभापती रश्मीताई नावंदर यांनी केले.
भाजपा कार्यालयात सुवासिनीताई धोत्रे यांच्या उपस्थितीत भाजपा महानगर व ग्रामीण महिला आघाडीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून भाजपा महानगर प्रभारी मायाताई उमाटे मंजुषाताई सावरकर कीर्तन ताई इंगळे संगीताताई शिंदे भटके मुक्त आघाडी विदर्भ विभाग संयोजिका रस्मिता जाधव महापौरचनाताई मसने भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, माधुरीताई बडोणे सुलभाताई सोळंके चंदाताई शर्मा कुसुमताई भगत, जयश्रीताई फुंडकर, वैशालीताई शेळके सुमन ताई गावंडे आदी मंचावर विराजमान होते.
संस्कृती संवर्धनाचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात धोत्रे हिंदुस्तानची परंपरा संस्कृती संवर्धन करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून काशी उज्जैन , राम मंदिर तसेच विकासाचे पर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून देशात एक संस्कृती संवर्धनाचे काम व परंपरा कायम ठेवून अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य सुरू असल्याचे प्रतिपादन सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे यांनी केले यावेळी मायाताई उमाटे विजय घडवाल रश्मीताई जाधव संगीता ताई शिंदे यांनी वेगवेगळ्या विषयावर मत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन सारिका जयस्वाल तर आभार प्रदर्शन साधनाताई येवले यांनी केले यावेळी जिल्ह्यातील व महानगरातील विविध क्षेत्रातील मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मकर संक्रांत उत्साहाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच मा जिजाऊ जयंती साजरी करण्यातही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या