Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गोपीनाथ मुंडे यांची जयंती

भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गोपीनाथ मुंडे यांची जयंती



अकोला
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्ष, त्याग त्याग तसेच सर्वांना सोबत घेऊन समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करण्याचा संकल्प घेऊन पक्षाची बांधिलकी ठेवून ओबीसी समाजासाठी संघर्षशील व्यक्तिमत्व यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात पक्षाचा विस्तारात त्यांचा महत्त्वाचा योगदान लक्षात घेऊन त्यांना अभिवादन नमन करणे त्यांचे विचार अंगीकार करणे ही प्रत्येक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.



भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आज जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम होत असून भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला यावेळी बळीराम सिरस्कार, अनुप धोत्रे अमोल साबळे रमण जैन, माधव मानकर, श्रीकृष्णमोरखडे चंद्रशेखर पांडे गुरुजी, संजय गोडफोडे गणेश तायडे , जयंत मसने अंबादास उमाळे संतोष पांडे गणेश अंधारे देवाशिष काकड अमोल गीते अमोल गोगे संजय जीरापुरे संजय गोडा, अभिषेक बांगर, सचिन देशमुख उमेश गुजर रमेश आप्पा खोबरे विवेक भरणे राजेश बेले शंकरराव वाकोडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी विजय अग्रवाल यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासामधील अनुभव कथन करून प्रेम करणारा व कार्यकर्त्यांना मोठा करणारा नेत्यांचा आदर्श पक्ष विस्तारासाठी उपयोगी ठरते अशीही यावेळी सांगून त्यांनी आपण त्यांच्या सहवासा लाभणारे कार्यकर्ते असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे संचालन माधव मानकर यांनी तर प्रास्ताविक चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी केले यावेळी बळीराम सिरस्कार यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले

अकोला – 
अकोला अकोट मार्गावरील पुर्णा नदीवरील गोपालखेड गावांजवळील पुलाच्‍या  पोच  मार्गासाठी जमीन संपादनासाठी शेतक-यांकडून उपविभागीय अधिकारी यांना संमतीपत्र सादर. आमदार रणधीर सावरकर यांनी जमीन संपादन करण्‍यासाठी शेतकरी शिष्‍टमंडळ व जिल्‍हाधिकारी यांच्‍या  सोबत आवश्‍यक  समन्‍वयासाठी बैठक घेवून केलेल्‍या  पाठपुराव्‍याला शेतक-यांच्‍या प्रतिसाद तसेच जिल्‍हाधिकारी व जिल्‍हा प्रशासनाच्‍या सकारात्‍मक भुमिकेकेला यश मिळाल्‍याने पोच मार्ग बांधकामाचा मार्ग सुकर झाला आहे.


सामान्‍य  नागरीक, विद्यार्थी, रूग्‍ण तसेच शैक्षणिक सुविधा आणी  बाजारपेठेत जाणारे शेतकरी यांच्‍या समस्‍या लक्षात घेवून मौजे गोपालखेड येथील शेतक-यांनी अकोला अकोट मार्गावरील गोपालखेड येथील पुलाच्‍या  पोच रस्‍त्‍याच्‍या बांधकामासाठी कराव्‍या लागणा-या भुसंपादनासाठी सामाजिक संवेदना व मानवीय दृष्‍टीकोनाचा परिचय देत सरळ मार्गाने जमीन खरेदी करण्‍यासाठी संमतीपत्र दिले आहे. माजी केंद्रीय राज्‍यमंत्री खासदार संजयभाऊ धोत्रे जिल्‍हयाचे पालकमंत्री तथा  राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री मा.  देवेंद्रजी फडणवीस हे  शेतक-यांनप्रती न्‍यायप्रिय असल्‍याने शेतक-यांना शासनाकडून पाचपट मोबदला देतील असा  विश्‍वास व्‍यक्‍त करीत आपली रास्‍त  अशी   मागणी सुध्‍दा संबंधीत शेतक-यांनी शासनाकडे केली आहे. अकोला-अकोट रस्‍ता रामा २०४ वर पुर्णा नदीवरील साखळी क्रमांक १०४/६ मध्‍ये मोठ्या पुलाचे पोचमार्गासह बांधकाम करण्‍याकरीता मौजे गोपालखेड येथील ४.१७ हे.आर. जमीन संपादीत करण्‍यात आली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्‍त्‍याच्‍या अलाईनमेंट मध्‍ये  बदल  झाल्‍याने नव्‍याने जमीन संपादनाची परिस्‍थीती उद्भवली होती. त्‍यामुळे नव्‍याने जमीन संपादनासाठी शेतक-यांचा कडाडून विरोघ होता. परंतु सदर पुलाचे बांधकाम करणे अपरिहार्य असल्‍याने जमीन संपादनासाठी संबंधीत शेतक-यांचे प्रतिनिधी यांची जिल्‍हाधिकारी,  महसुल विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्‍या समवेत आमदार रणधीर सावरकर यांनी बैठक घेवून प्रशासनाला तसेच शेतक-यांना मार्ग काढण्‍याची विनंती केलेली होती. शेतक-यांची जमीन अलीकडेच झालेल्‍या जमीनीची खरेदी विक्रीची किंमत तसेच बाजारभाव या बाबाी लक्षात घेवून सरळ  खरेदीद्वारे शेतक-यांना मोठ्या प्रमाणात मोबदला देण्‍यात  यावा अशा सुचना आ. रणधीर सावरकर यांनी जिल्‍हाधिकारी निमा अरोरा यांना दिल्‍या. पुलाचे पोच  मार्गासाठी नव्‍याने संपादीत करावयाच्‍या ४.२० हे.आर. जमीनीची संयुक्‍त  मोजनी करण्‍यात येवून नव्‍याने भुसंपादन प्रकरण नोंदविण्‍यात  आले  असून, सरळ खरेदीचे भुसंपादन करण्‍याबाबत प्रस्‍तावाची कार्यवाही सुरू करण्‍यात  आलेली आहे. आज  (दिनांक १२/१२/२०२२) रोजी मौजे गोपालखेड येथील २७ शेतक-यांच्‍या वतीने विजय मोडक, गजानन हरिचंद्र मार्के, बाबाराम मोडक, निलेश मोडक, अजय मोडक, सुनिल मोडक, सारंगधर मार्के आदिंनी सदर भुसंपादनासाठी आवश्‍यक  समंतीपत्र उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांना सादर करण्‍यात आलेले  आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या  बेजाबदार व ढिसाळ कारभारामुळे पुर्वी नाममात्र रकमेत संपादीत केलेली जमीन शासनाने मुळ  शेतक-यांना परत  करण्‍यात  यावी. अशी  मागणी शेतक-यांनी केली असता हा  विषय शासनाकडे मांडून शेतक-यांना न्‍याय देण्‍यासाठी नागपूर येथे होवू घातलेल्‍या आगामी  हिवाळी अधिवेशनात लावून घरून  शेतक-यांना न्‍याय देण्‍यात येईल. असे आ. रणधीर सावरकर यांनी आश्‍वस्‍त केले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या