नागपूरमध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपातर्फे भव्य स्वागत
नागरिकांनीही सहभागी होण्याचे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर व भाजपा लोकप्रतिनिधींचे यांचे आवाहन
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार दि. ११ डिसेंबर रोजी उपराजधानी नागपूर शहरात येत असून भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचे उत्साहाने भव्य स्वागत करण्यात येईल. नागरिकांनीही मोदीजींचे स्वागत करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांनी केले .
ते म्हणाले की, मा नरेंद्र जी. मोदीजींच्या हस्ते नागपूर शहरातील विविध विकासकामांची उद्घाटने होणार आहेत. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे देशात अनेक विकासकामांचा मोठा लाभ झाला आहे. नागपूर शहरात त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे व लोकप्रतिनिधी तसेच भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उत्सुक आहोत. जनतेनेही मा. मोदीजींचे उत्स्फूर्त स्वागत करावे. ही विनंती खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार रणधीर भाऊ सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भाऊ भारसाकले आमदार हरीश पिंपळेआमदार, वसंत खंडेलवाल भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात माधव मानकर, कुसुम भगत चंदा शर्मा अर्चना मसने, केशव ताथोड संजय जीरापुरे संजय गोडफोडे संजय गोडा रमेश आप्पा खोबरे बळीराम सिरस्कार श्रावण इंगळे मोनीका ताई गावंडे, जयश्री फुंडकर सचिन देशमुख उमेश गुजर हरिनारायण माकोडे केले आहे.
, समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा प्रत्यक्ष कार्यक्रम नागपूर येथे होईल. याखेरीज नागपूर ते शिर्डी मार्गावर लोकसभा मतदारसंघाचे सहआठ ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर हा कार्यक्रम स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन पाहतील. त्या त्या ठिकाणी भाजपाचे मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. माहिती प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला आणि शेतीमालाच्या वाहतुकीला चालना मिळणार आहे. त्यामुळे या भागात उद्योगधंद्यांची वाढ होईल तसेच शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल. तत्कालीन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन या महामार्गाचा आराखडा करून घेतला आणि कामाला सुरुवात केली. त्यांच्यामुळे महामार्गाचे काम झाले. महामार्गाचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल आपण संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. महामार्गाचे काम सुरू झाले त्यावेळी मा. एकनाथ शिंदे संबंधित खात्याचे मंत्री होते. त्यांनी या कामासाठी पूर्ण वेळ दिला. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महामार्गाच्या उरलेल्या बाबी पूर्ण करतानाच तो गोंदियापर्यंत पुढे नेण्याचे जाहीर केले आहे. आपण त्यांचेही आभार मानतो.
ते म्हणाले की. नितीनजी गडकरी यांनी झाल्यानंतर मेट्रो, उड्डाणपूल अशा अनेक योजना मंजूर करून घेतल्या. मा. नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने राज्यात ठिकठिकाणी महामार्गांची कामे पूर्ण होत आहे व त्यामुळे महाराष्ट्राची क्षमता वाढत आहे. आमदार सावरकर म्हणाले.
0 टिप्पण्या