रस्ता वाहतूक सुरक्षा अंतर्गत भव्य जनजागृती रॅली
रस्ता वाहतूक सुरक्षा अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला आणि वाहतूक पोलिसांनी विध्यार्थी यांची रॅली काढून सुचणापत्र वाटप करून विद्यार्थी व चालकांना मार्गदर्शन केले. नेशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार भारतात वर्ष 2021 मध्ये 1 लाख 55 हजार 622 लोकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला असून 2 लाख 61 हजार 884 लोक रस्ते अपघातात जखमी झाले आहेत.
आज दि 20 नोव्हेंबर 22 रोजी रस्ते वाहतूक बळींचा जागतिक स्मूर्ती दिन निमित्त वाहतूक अपघात होवू नयेत कोणाचीही प्राणहानी होऊ नये शरीरीक अवयवांचे नुकसान होवून, अपंगत्व येवू नये कौटुंबिक ,आर्थिक नुकसान होवू नये याकरिता वाहतूक नियमांचे पालन करावे ,वाहन हळू चालविणे, मद्यपान करून वाहन चालवू नये याबाबत चालकांना प्रोम्प्लेट वाटप करून मार्गदर्शन करण्यात आले , शाळेतील 500 विधयार्थी व पालक यांनी सदर रॅली पदयात्रे मध्ये सहभाग घेतला तुकाराम चौकातून रॅलीला सुरवात होवून कौलखेड मार्गे RTO कार्यालय येथे समारोप करण्यात आला. तेथे सर्वांना रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा देण्यात आली RTO विभाग व शहर वाहतूक विभाग यांनी विध्यार्थी इतर वाहन चालक यांना मार्गदर्शन केले, तसेचरस्ता अपघातात जे इसम मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व अकोला जिल्हा अपघात मुक्त करणेसाठी प्रतिज्ञा शपथ देण्यात आली,तसेच विद्यार्थी यांनीही पथनाट्य द्वारे अपघात मृत्यू होवू नये याकरिता जनजागृती केली व मार्गदर्शन करण्यात आले
0 टिप्पण्या