भारत। जोडो यात्रेत मुस्लिमांना दुय्यम स्थान
मुस्लिम संत केले दुर्लक्षित
ऍड नजीब शेख यांचा पत्रकार परिषदेत आरोप
अकोला ---देशात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा महाराष्ट्र राज्य मध्ये आली आहे या दरम्यान शिखांचे गुरुद्वारा ,हिंदूंची मंदिरे,सह इतर धर्मियांचे संत प्रार्थनास्थळ यांना भेटी देत सर्वधर्म भाव जपला असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करीत असतांना ही यात्रा अकोला जिल्ह्यात प्रवेश करतांनाच पातूर येथील शाह बाबू दर्गा हा मुस्लिम समाजातील लोकांचे संत दुर्लक्षित केले तसेच मुस्लिम समाजातील नेते कार्यकर्ते यांना राहुल गांधी यांना भेटण्यासाठी तडफडत असताना ढकलून दिले जात आहेत त्यामुळे भारत जोडो यात्रेत मुस्लिमांना दुय्यम स्थान दिले जात असून मुस्लिम संत ही दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप आज ऍड नजीब शेख यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत केला आहे
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1942 ला काढलेली यात्रे प्रमाणे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा कन्याकुमारी पासून सुरू केली आहे मात्र देशाची ओळख असलेल्या नेत्यांच्या गणवेश नाकारून पाश्चिमात्य संस्कृती चे जतन करून पेहराव केला आहे त्यामुळे भारतीय नेत्याच्या पूर्वजांचा हा अपमान आहे त्यामुळे राहूल गांधी यांनी त्यात सुधारणा करतांनाच आणि भारत जोडो यात्रा करतांना मुस्लिमही या देशाचे नागरिक आहेत आणि राहुल गांधी यांच्या राजकीय पक्षाचे ते वंशपरंपरगत मतदार आहेत मात्र केवळ सुरक्षेचे कारण देऊन मुस्लिम नेते ,कार्यकर्ते यांना राहुल गांधी यांना भेटण्यापासून महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले हे रोखत आहेत तसेच मुस्लिम समाजातील संतांची स्थाने, प्रसिध्द प्रार्थना स्थळे वगळून ही यात्रा अकोला जिल्ह्यातून जात आहे त्यामुळे भारतजोडो यात्रेत मुस्लिमांना दुय्यम स्थान दिले जात आहे तसेच मुस्लिम संत केले दुर्लक्षित असा आरोप ऍड नजीब शेख यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे यावेळी त्यांच्या समवेत एडवोकेट नजीब शेख, मोबिन खान, जाहीद आलम खान, नसीर हुसैनी, मुनव्वर शेख आदींची उपस्थिती होती
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या